शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना करता येणार नाही सासूरवाडीच्या गावांचा विकास

By admin | Updated: May 29, 2015 00:33 IST

केंद्र शासनाच्या खासदार आदर्शग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्शग्राम योजनेची घोषणा राज्य शासनाने नुकतीच केली होती.

जितेंद्र दखने   अमरावतीकेंद्र शासनाच्या खासदार आदर्शग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्शग्राम योजनेची घोषणा राज्य शासनाने नुकतीच केली होती. एका विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदाराला सन २०१९ पर्यंत तीन ग्रामपंचायतींना ‘आदर्शग्राम’ म्हणून विकसित करावे लागणार आहे. या योजनेनुसार विधानसभा व राज्यसभेच्या एकूण ३६६ सदस्यांच्या माध्यमातून सुमारे एक हजार ९८ गावांचा कायापालट अपेक्षित आहे. मात्र, ही गावे निवडताना आमदारांना स्वत:चे गाव अथवा सासूरवाडीच्या गावाची निवड करता येणार नाही, असे धोरण वरिष्ठ पातळीवर ठरविण्यात येत आहे. त्यामुळे सासुरवाडीच्या गावांचा विकास करण्याचे आमदारांचे मनसुबे आता पूर्ण होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आदर्शगाव योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आदर्शगाव योजना कार्यान्वित केली. त्यानुसार ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने योजनेची मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका आमदाराला मतदारसंघातील तीन ग्रापं २०१९ पर्यंत आदर्श करावयाच्या आहेत. ग्रामपंचायतींची निवड करताना गावाची लोकसंख्या किमान १ हजार असणे आवश्यक आहे. आमदारांना स्वत:चे किंवा पत्नीचे गाव यासाठी निवडता येणार नाही, असे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. शहरी मतदारसंघ असणाऱ्या आमदारांना नजीकच्या एका ग्रामपंचायतीची निवड करता येईल.विधान परिषद सदस्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची निवड करता येईल.विकास करताना विविध योजनांची अंमलबजावणी करावी लागेल. आमदार निधीचा वापर करता येईल. शासनाकडून अतिरिक्त निधी दिला जाणार आहे. ग्रामविकास विभाग समन्वय साधणार आहे.