शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सीटीत शहराचा विकास; खेडे मात्र भकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:49 IST

रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत.

ठळक मुद्देव्यथा वडुरा गावाची : स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही विकासापासून कोसो दूर

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत.वडुरा या गावातील ग्रामपंचायतीची इमारत पुरातन असून, शिकस्त झाली आहे. भिंतीला तडे गेले असून, ती केव्हा कोसळेल याचा नेम नाही. पावसाचे पाणी गळू नये म्हणून छताला प्लास्टिकचे कव्हच लावले आहे. येथूनच या गावाच्या दुर्दशेची खरी सुरूवात होते. तेथील लोकसंख्या १,३२७ असून, गावात ४८४ कुटुंबे राहतात. त्यांची उपजिविका शेती व शेतमजुरीवरच अवलंबून आहे. त्यात पारधी बेड्यावरील ९० टक्के लोक केवळ मजुरीवर अवलंबून आहेत.येथील इंदिरा आवास झोपडपट्टीत अजून विद्युत पोल नसल्याने पथदिव्यांची सोय नाही. नागरिकांनी व ग्रामपंचायतीने केबल टाकून पथदिवे लावण्याचा प्रयत्न केला. पण, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोल शिवाय पथदिवे लावता येत नाही या सबबीखाली ते काढून नेले. त्यामुळे तेथील रस्त्यावर अंधार आहे व रस्त्याने पायदळही चालणे कठीण झाले आहे. या गावातील नाल्यांचे बांधकाम बरेच जुने व अरूंद असल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नाली बांधकामासाठी निधीची गरज आहे. मधुकरराव शेटे यांच्या घरापासून ते गोठाण नाला आणि गोविंदराव चोखट यांच्या घरापासून ते पुलाच्या नाल्यापर्यंत नाली बांधकाम गरजेचे आहे. येथील कोंडवाड्याच्या भिंती कोसळल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडाले. येथून महाविद्यालयात जाणारे विद्यार्थ्यांना व १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी गावात येणाºया विद्यार्थ्यास बसेसची सोय नाही. येथील वीजपुरवठा लोणी (टाकळी) विद्युत केंद्रावरून होतो. भारनियमनाव्यतिरिक्त कृषीधारकांना वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होत नाही आदी समस्यांनी या गावाला वेढले आहे. पाच वर्षांपासून ओ.बी.सींना घरकूल मिळाले नाही. येथील भीमराव सहारे हे निवाºयाअभावी समाज मंदिरात वास्तव्याला आहेत. गजानन सहारे (अपंग), शंकर ठाकरे, ज्ञानेश्वर राऊत, रतन नेवारे, जयंताबाई राऊत, भाऊराव राऊत यांचे कुटुंब कुडाच्या घरात राहतात, असे दत्ता बेलोरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.ग्रामपंचायतीचे बांधकाम, इंदिरा आवास प्लॉटमध्ये विद्युत पुरवठ्यासाठी पोल, शेतात जाणारे पांदण रस्ते तयार करण्यासाठी विविध निधीची आवश्यकता आहे.- कुंजलता बेलोरकर,सरपंच, वडुरागावातील रस्ते व स्मशानभूमीत जाणाºया रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा व पारधी बांधवांसाठी पूरक व्यवसाय व रोजगाराची संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी.- चंचलाबाई सातंगे,उपसरपंच, वडुराग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी आहे. त्यातून पाणीपुरवठा, वीज देयके, कर्मचारी वेतन व नाल्या सफाई यावर खर्च होतो. मोठी विकासकामे निधीशिवाय होऊ शकत नाहीत.- नीतेश गेडाम,ग्रामसेवक, वडुरा