शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

स्मार्ट सीटीत शहराचा विकास; खेडे मात्र भकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:49 IST

रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत.

ठळक मुद्देव्यथा वडुरा गावाची : स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही विकासापासून कोसो दूर

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत.वडुरा या गावातील ग्रामपंचायतीची इमारत पुरातन असून, शिकस्त झाली आहे. भिंतीला तडे गेले असून, ती केव्हा कोसळेल याचा नेम नाही. पावसाचे पाणी गळू नये म्हणून छताला प्लास्टिकचे कव्हच लावले आहे. येथूनच या गावाच्या दुर्दशेची खरी सुरूवात होते. तेथील लोकसंख्या १,३२७ असून, गावात ४८४ कुटुंबे राहतात. त्यांची उपजिविका शेती व शेतमजुरीवरच अवलंबून आहे. त्यात पारधी बेड्यावरील ९० टक्के लोक केवळ मजुरीवर अवलंबून आहेत.येथील इंदिरा आवास झोपडपट्टीत अजून विद्युत पोल नसल्याने पथदिव्यांची सोय नाही. नागरिकांनी व ग्रामपंचायतीने केबल टाकून पथदिवे लावण्याचा प्रयत्न केला. पण, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोल शिवाय पथदिवे लावता येत नाही या सबबीखाली ते काढून नेले. त्यामुळे तेथील रस्त्यावर अंधार आहे व रस्त्याने पायदळही चालणे कठीण झाले आहे. या गावातील नाल्यांचे बांधकाम बरेच जुने व अरूंद असल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नाली बांधकामासाठी निधीची गरज आहे. मधुकरराव शेटे यांच्या घरापासून ते गोठाण नाला आणि गोविंदराव चोखट यांच्या घरापासून ते पुलाच्या नाल्यापर्यंत नाली बांधकाम गरजेचे आहे. येथील कोंडवाड्याच्या भिंती कोसळल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडाले. येथून महाविद्यालयात जाणारे विद्यार्थ्यांना व १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी गावात येणाºया विद्यार्थ्यास बसेसची सोय नाही. येथील वीजपुरवठा लोणी (टाकळी) विद्युत केंद्रावरून होतो. भारनियमनाव्यतिरिक्त कृषीधारकांना वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होत नाही आदी समस्यांनी या गावाला वेढले आहे. पाच वर्षांपासून ओ.बी.सींना घरकूल मिळाले नाही. येथील भीमराव सहारे हे निवाºयाअभावी समाज मंदिरात वास्तव्याला आहेत. गजानन सहारे (अपंग), शंकर ठाकरे, ज्ञानेश्वर राऊत, रतन नेवारे, जयंताबाई राऊत, भाऊराव राऊत यांचे कुटुंब कुडाच्या घरात राहतात, असे दत्ता बेलोरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.ग्रामपंचायतीचे बांधकाम, इंदिरा आवास प्लॉटमध्ये विद्युत पुरवठ्यासाठी पोल, शेतात जाणारे पांदण रस्ते तयार करण्यासाठी विविध निधीची आवश्यकता आहे.- कुंजलता बेलोरकर,सरपंच, वडुरागावातील रस्ते व स्मशानभूमीत जाणाºया रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा व पारधी बांधवांसाठी पूरक व्यवसाय व रोजगाराची संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी.- चंचलाबाई सातंगे,उपसरपंच, वडुराग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी आहे. त्यातून पाणीपुरवठा, वीज देयके, कर्मचारी वेतन व नाल्या सफाई यावर खर्च होतो. मोठी विकासकामे निधीशिवाय होऊ शकत नाहीत.- नीतेश गेडाम,ग्रामसेवक, वडुरा