शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

स्मार्ट सीटीत शहराचा विकास; खेडे मात्र भकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:49 IST

रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत.

ठळक मुद्देव्यथा वडुरा गावाची : स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही विकासापासून कोसो दूर

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत.वडुरा या गावातील ग्रामपंचायतीची इमारत पुरातन असून, शिकस्त झाली आहे. भिंतीला तडे गेले असून, ती केव्हा कोसळेल याचा नेम नाही. पावसाचे पाणी गळू नये म्हणून छताला प्लास्टिकचे कव्हच लावले आहे. येथूनच या गावाच्या दुर्दशेची खरी सुरूवात होते. तेथील लोकसंख्या १,३२७ असून, गावात ४८४ कुटुंबे राहतात. त्यांची उपजिविका शेती व शेतमजुरीवरच अवलंबून आहे. त्यात पारधी बेड्यावरील ९० टक्के लोक केवळ मजुरीवर अवलंबून आहेत.येथील इंदिरा आवास झोपडपट्टीत अजून विद्युत पोल नसल्याने पथदिव्यांची सोय नाही. नागरिकांनी व ग्रामपंचायतीने केबल टाकून पथदिवे लावण्याचा प्रयत्न केला. पण, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोल शिवाय पथदिवे लावता येत नाही या सबबीखाली ते काढून नेले. त्यामुळे तेथील रस्त्यावर अंधार आहे व रस्त्याने पायदळही चालणे कठीण झाले आहे. या गावातील नाल्यांचे बांधकाम बरेच जुने व अरूंद असल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नाली बांधकामासाठी निधीची गरज आहे. मधुकरराव शेटे यांच्या घरापासून ते गोठाण नाला आणि गोविंदराव चोखट यांच्या घरापासून ते पुलाच्या नाल्यापर्यंत नाली बांधकाम गरजेचे आहे. येथील कोंडवाड्याच्या भिंती कोसळल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडाले. येथून महाविद्यालयात जाणारे विद्यार्थ्यांना व १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी गावात येणाºया विद्यार्थ्यास बसेसची सोय नाही. येथील वीजपुरवठा लोणी (टाकळी) विद्युत केंद्रावरून होतो. भारनियमनाव्यतिरिक्त कृषीधारकांना वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होत नाही आदी समस्यांनी या गावाला वेढले आहे. पाच वर्षांपासून ओ.बी.सींना घरकूल मिळाले नाही. येथील भीमराव सहारे हे निवाºयाअभावी समाज मंदिरात वास्तव्याला आहेत. गजानन सहारे (अपंग), शंकर ठाकरे, ज्ञानेश्वर राऊत, रतन नेवारे, जयंताबाई राऊत, भाऊराव राऊत यांचे कुटुंब कुडाच्या घरात राहतात, असे दत्ता बेलोरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.ग्रामपंचायतीचे बांधकाम, इंदिरा आवास प्लॉटमध्ये विद्युत पुरवठ्यासाठी पोल, शेतात जाणारे पांदण रस्ते तयार करण्यासाठी विविध निधीची आवश्यकता आहे.- कुंजलता बेलोरकर,सरपंच, वडुरागावातील रस्ते व स्मशानभूमीत जाणाºया रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा व पारधी बांधवांसाठी पूरक व्यवसाय व रोजगाराची संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी.- चंचलाबाई सातंगे,उपसरपंच, वडुराग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी आहे. त्यातून पाणीपुरवठा, वीज देयके, कर्मचारी वेतन व नाल्या सफाई यावर खर्च होतो. मोठी विकासकामे निधीशिवाय होऊ शकत नाहीत.- नीतेश गेडाम,ग्रामसेवक, वडुरा