शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर राज्यातील शाळांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST

पान ३ अमरावती : महाराष्ट्रातील ४८८ जिल्हा परिषद शाळांचा ५०० कोटी रुपये खर्चून आदर्श शाळा म्हणून विकास करण्याची शालेय ...

पान ३

अमरावती : महाराष्ट्रातील ४८८ जिल्हा परिषद शाळांचा ५०० कोटी रुपये खर्चून आदर्श शाळा म्हणून विकास करण्याची शालेय शिक्षण विभागाची योजना प्रगतिपथावर असताना आता दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर राज्यातील सरकारी शाळांच्या विकासाचा आणखी एक प्रयोग राबविण्याचा विचार आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी शाळांच्या विकासाकरिता ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागातर्फे एक अभ्यासगट त्याकरिता दिल्लीला धाडण्यात येणार आहे.

दिल्लीतील सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांच्या धर्तीवर मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड आदी महापालिका शाळांचा विकास करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हा विषय मागे पडला.

दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राज्यातील ४८८ सरकारी शाळा आदर्श म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत ४८८ शाळांच्या विकासासाठी ४९४ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यात शाळांमधील भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता विकासावरही भर दिला जाणार आहे.

//////

बॉक्स १

अभ्यासगट जाणार दिल्लीला

शालेय शिक्षण विभागाची ही योजना आकाराला येत असताना ग्रामविकास विभागानेही दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी पुढाकार घ्यायचे ठरविले आहे. दिल्लीतील अशा सरकारी शाळांचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षक आदींचा समावेश असलेला एक अभ्यासगट दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. या अभ्यासगटाने अहवाल ग्रामविकास मंत्र्यांना सादर करायचा आहे.

///////

अभ्यास कसला?

दिल्लीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी-शिक्षकांकरिता असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार-विचार सुधारण्यासाठी व अंगी शिस्त बाणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचा अभ्यास हा गट करेल. दिल्लीतील केजरीवाल सरकारने खासगी शाळांप्रमाणे सरकारी शाळांचे रूप पालटले. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये डिजिटल वर्ग, सुसज्ज खेळाच्या सुविधा, जलतरण तलाव पाहायला मिळतात. या शाळांमध्ये गुणवत्ता विकास होऊन निकालाचा टक्काही वाढला आहे.