शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर राज्यातील शाळांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST

पान ३ अमरावती : महाराष्ट्रातील ४८८ जिल्हा परिषद शाळांचा ५०० कोटी रुपये खर्चून आदर्श शाळा म्हणून विकास करण्याची शालेय ...

पान ३

अमरावती : महाराष्ट्रातील ४८८ जिल्हा परिषद शाळांचा ५०० कोटी रुपये खर्चून आदर्श शाळा म्हणून विकास करण्याची शालेय शिक्षण विभागाची योजना प्रगतिपथावर असताना आता दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर राज्यातील सरकारी शाळांच्या विकासाचा आणखी एक प्रयोग राबविण्याचा विचार आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी शाळांच्या विकासाकरिता ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागातर्फे एक अभ्यासगट त्याकरिता दिल्लीला धाडण्यात येणार आहे.

दिल्लीतील सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांच्या धर्तीवर मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड आदी महापालिका शाळांचा विकास करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हा विषय मागे पडला.

दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राज्यातील ४८८ सरकारी शाळा आदर्श म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत ४८८ शाळांच्या विकासासाठी ४९४ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यात शाळांमधील भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता विकासावरही भर दिला जाणार आहे.

//////

बॉक्स १

अभ्यासगट जाणार दिल्लीला

शालेय शिक्षण विभागाची ही योजना आकाराला येत असताना ग्रामविकास विभागानेही दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी पुढाकार घ्यायचे ठरविले आहे. दिल्लीतील अशा सरकारी शाळांचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षक आदींचा समावेश असलेला एक अभ्यासगट दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. या अभ्यासगटाने अहवाल ग्रामविकास मंत्र्यांना सादर करायचा आहे.

///////

अभ्यास कसला?

दिल्लीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी-शिक्षकांकरिता असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार-विचार सुधारण्यासाठी व अंगी शिस्त बाणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचा अभ्यास हा गट करेल. दिल्लीतील केजरीवाल सरकारने खासगी शाळांप्रमाणे सरकारी शाळांचे रूप पालटले. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये डिजिटल वर्ग, सुसज्ज खेळाच्या सुविधा, जलतरण तलाव पाहायला मिळतात. या शाळांमध्ये गुणवत्ता विकास होऊन निकालाचा टक्काही वाढला आहे.