शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे

By admin | Updated: May 31, 2015 00:04 IST

मोर्शी-वरुड तालुक्यात शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. कर्जदार शेतकऱ्यांकडे भाडोत्री गुंड पाठवून ...

राजू शेट्टी : गडकरींनी करावा खुलासा, पत्रपरिषदेत मागणीवरूड : मोर्शी-वरुड तालुक्यात शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. कर्जदार शेतकऱ्यांकडे भाडोत्री गुंड पाठवून वसूलीचे सत्र सुरु आहे. यातूनच शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्यासही मागेपुढे पाहणार नाही. राज्यात विरोधी पक्ष मूग गिळून बसला आहे. आता आम्हीच सत्ताधारी आणि आम्हीच विरोधी असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी दबावगट तयार करुन विविध योजना मंजूर करणे आवश्यक आहे. विकास कामाला आमचा विरोध नाही. परंतु उद्योगाच्या नावाखाली आवाज नाही, सरकार शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे उभारत असेल तर ते थडगे कुणासाठी याचा खुलासा ना. नितीन गडकरी यांनी करावा असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.ते पुढे म्हणाले, आमचे सरकार घोटाळेबाज नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी सोफियाला दिले. परंतु शेतकऱ्याला काय मिळाले. आय.आर.बी.चा टोल नाका वारेमाप वसूली करीत आहे. शासनाने वरुड मोर्शीतील वाहनधारकांना सर्व्हिस रस्ता टाकून द्यावा, अन्यथा टोलमुक्त करावे असेही त्यांनी सांगितले . दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला . कर्जाच्या वसूलीसाठी येणाऱ्या फायनान्स कंपनीच्या गुंडांवर कुठलीही कारवाई होत नाही. उलट शेतकऱ्यांना तगाद्यामुळे आत्महत्या करावी लागते. आता स्वाभीमानी शेतकरी संघटना हे खपवून घेणार नाही असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले. भूमिअधिग्रहनाबाबत बोलतांना ते म्हणाले, शेतकरी विरोधी धोरणाला सरकारला कधीही पाठिंबा देणार नाही. उद्योगपतींना देण्यात येणाऱ्या जमिनीसाठी भूमिअधीग्रहण कायदा आणू पाहत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही . कर्ज मुक्ती संषर्घ यात्रा सुरुच राहणार असून शेतऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शांत राहणार नाही. ना. नितीन गडकरी यांचे जरी समर्थन असले तरी आमचा स्वत:चा पक्ष आहे आमची ध्येय धोरण असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेतून बाहेर पडावे लागले तरी चालेल असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. यावेळी सदाभाऊ खोत तसेच वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविंकात तुपकर सुध्दा उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)