शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जाधव घराण्यातील वंशजही परक्रामीच!  खरा इतिहास पुढे आलाच नाही - शिवाजीराजे जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 21:30 IST

मांसाहेब जिजाऊंचे वडील लखुजी जाधव यांच्यासह त्यांची तीन मुले आणि नातवाची हत्या निजामाने केली. लखुजी जाधवांनंतरच्या पिढीतील वंशजही पराक्रमीच होते. तथापि, इतिहासकारांनी पराक्रमाचा हा इतिहास पुढे येऊ दिला नाही, अशी खंत या घराण्याचे १३ वे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी येथे व्यक्त केली. 

- संदीप मानकर

अमरावती : मांसाहेब जिजाऊंचे वडील लखुजी जाधव यांच्यासह त्यांची तीन मुले आणि नातवाची हत्या निजामाने केली. लखुजी जाधवांनंतरच्या पिढीतील वंशजही पराक्रमीच होते. तथापि, इतिहासकारांनी पराक्रमाचा हा इतिहास पुढे येऊ दिला नाही, अशी खंत या घराण्याचे १३ वे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी येथे व्यक्त केली. राजमाता जिजाऊ यांच्या जाधव कुटुंबातील सदस्यांची हत्या झाली त्यावेळी मांसाहेबांनी त्यांचे भाचे संताजी ऊर्फ सुर्जनसिंह यांना सोबत नेले होते. त्याकाळी कुठलाही हत्ती चवताळला, तर त्याला तलवारीने काबूत करण्याचे हे पराक्रमी काम संताजी यांचा मुलगा शंभूसिंह करीत होते. शंभूसिंहांनी साडेतीनशे मावळे सोबत घेऊन बाजीप्रभू देशपांडेंसोबत पावनखिंडीत बलिदान दिले. पण, त्यांचे नाव इतिहासकार विसरले. छत्रपती शिवाजी राजे, संभाजी राजे यांच्यानंतर मराठ्यांचे नेतृत्व संपल्याचा समज मुघलांचा झाला होता. परंतु, सिंदखेडराजा येथील सेनापती धनाजीराव जाधव व संताजी घोरपडे यांच्या अफाट पराक्रमामुळे औरंगजेबाच्या सैन्यावर दहशत निर्माण झाली होती. या जोडीने महाराष्ट्रात मुघलांना आठ वर्षे झुंजवत ठेवले. त्यांनी यावेळी पिलाजी जाधवांच्या पराक्रमाचाही उल्लेख केला. सिंदखेडराजाबद्दल आम्ही ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन सांगतो, त्यावेळी हे खरे आहे काय, असे विचारले जाते. इतिहासकारांच्या कृत्यामुळे इतकी वाईट स्थिती आज आपल्यावर आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव यांनी त्याकाळी १४०० एकर जमिनीत तलाव बांधून शेतकºयांसाठी सिंचनाची व्यवस्था केली. आजही तो तलाव मोेठ्या अभिमानाने उभा आहे, अी माहिती त्यांनी दिली. रामसिंग भट नावाचे लखुजी जाधवांचे भट होते. त्यांनी लिहून ठेवलेले  पुरावे उपलब्ध आहेत. ज्यावेळी राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, त्यावेळी हत्तीवरून लोेकांना साखर वाटण्यात आली होती. आजच्या प्रगत युगात आम्ही स्त्रीभू्रणहत्या करतो. त्या काळात मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात होता. जिजाऊ नसत्या तर शिवाजीराजे असते काय, असा सवाल करून खरा इतिहास नव्या पिढीसमोर यायला हवा. तरुणांनी पुढे येऊन इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Amravatiअमरावती