शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

थकबाकीदार शेतकरी पुनर्गठनापासून वंचित

By admin | Updated: September 1, 2015 00:08 IST

नाबार्ड योजनेंतर्गत सन २००४ मध्ये सन १९९९ ते २००४ या पाच वर्षांच्या कालावधीत सतत दोन वर्षे दुष्काळ घोषित केलेल्या ...

शासनाने केला विश्वासघात : जिल्ह्यात सतत नापिकी, शेतकरी हैराणप्रभाकर भगोले चांदूररेल्वेनाबार्ड योजनेंतर्गत सन २००४ मध्ये सन १९९९ ते २००४ या पाच वर्षांच्या कालावधीत सतत दोन वर्षे दुष्काळ घोषित केलेल्या गावातील शेतकऱ्यांकडील संपूर्ण येणे कर्ज व त्या कर्जावरील संपूर्ण व्याज एकत्र करुन थकीत कर्जाचे समान पाच वर्षांच्या किस्त पाडून बँकांनी पुनर्गठन केले. या योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील २३८ गावांतील पात्र सहकारी संस्थांचे ५४०६ शेतकऱ्यांकडील १०७६ लाख रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन केले होते. परंतु रिझर्व्ह बँक रेगुलेशन अ‍ॅट कायदा १९४९ कलम ३५(अ) नुसार २० नोव्हेंबरच्या आदेशान्यवये अमरावती जिल्ह्यातील सर्व ६६८ सहकारी संस्थेचे कर्जवाटप बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे राज्य शासनाने २००५ मध्ये विदर्भातील आत्महत्याग्रस्त ६ जिल्ह्यांत विदर्भ पॅकेज जाहीर करुन त्याअंतर्गत सहकारी बँकेला १०७६ लाख कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाल्यामुळे पुनर्गठन थकबाकीदार सभासदांना नवीन कर्जवाटप केले. अमरावती जिल्ह्यातील १९८१ गावातील पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याच्या कारणावरून दुष्काळ घोषित करुन विविध उपाययोजना जाहीर केल्या होत्या. विविध योजनेंतर्गत शासनाच्या धोरणानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज वसुल करुन कर्जाचे तीन वर्षांच्या समान हप्त्यात रुपांतर करुन शेतकऱ्यांना केलेल्या कर्जवाटपामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचे ओझे वाढून त्या कर्जावर १२ टक्के प्रमाणे व्याज आकारणी करण्यात आल्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज भरणे शक्य न झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे.