शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मालूर फॉरेस्टवासीयांचा पुनर्वसनास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

हरिसाल वनपरिक्षेत्रांतर्गत चौराकुंड गट ग्रामपंचायतीत येणारे मालूर फॉरेस्ट हे गाव पुनर्वसित भागात मोडते. तेथील नागरिकांना पुनर्वसित करण्याच्या हालचाली तीन ते चार महिन्यांपासून सुरू झाल्या. त्याकरिता चौराकुंड ग्रामपंचायतीने मालूर फॉरेस्ट येथे ग्रामसभा घेतली.

ठळक मुद्देआदिवासी आक्रमक : प्रकल्प अधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोन क्षेत्रालगतच्या गावांची पुनर्वसन प्रक्रिया प्रशासनाने आरंभली आहे. त्यात ग्रामसभेने मालूर फॉरेस्ट या गावातील नागरिकांना अन्य गावांत पुनर्वसित करण्यासंदर्भाचा ठराव शासनाकडे पाठविला. मात्र, त्या ग्रामस्थांनी अन्य गावांत जाण्यास नकार दिला, असून शुक्रवारी शेकडो ग्रामस्थ प्रकल्प कार्यालयावर धडकले. नागरिकांच्या स्वाक्षऱ्या पुनर्वसनास होकार म्हणून देण्यात आल्या नाहीत, तर ग्रामसभेच्या उपस्थितीचा कोरम पूर्ण करण्याकरिता घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्याकडे केला.हरिसाल वनपरिक्षेत्रांतर्गत चौराकुंड गट ग्रामपंचायतीत येणारे मालूर फॉरेस्ट हे गाव पुनर्वसित भागात मोडते. तेथील नागरिकांना पुनर्वसित करण्याच्या हालचाली तीन ते चार महिन्यांपासून सुरू झाल्या. त्याकरिता चौराकुंड ग्रामपंचायतीने मालूर फॉरेस्ट येथे ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण, त्यांची चमू व गावकरी उपस्थित होते. त्या ग्रामसभेत पुनर्वसनाच्या ठरावाला निवडक नागरिकांनी पसंती दर्शविली. तर अनेक नागरिकांकडून विरोध करण्यात आला होता. तथापि, ग्रापं प्रशासनाने पुनर्वसनाचा ठराव बहुमताने पारित झाल्याची नोंद घेऊन तो प्रशासनास पाठविला. परंतु, ठराव पारित करताना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेला नागरिकांची उपस्थिती असलेल्या स्वाक्षरी घेतलेल्या रजिस्टरची झेरॉक्स वन व महसूल प्रशासनाला दिल्याचा आरोप पुनर्वसनाला विरोध करणाºया नागरिकांनी केला आहे. आम्हाला पुनर्वसन नकोच या मागणीकरिता गावातील २२५ नागरिकांच्या स्वाक्षरीचे लेखी निवेदन घेऊन अनेक ग्रामस्थ प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी मिताली सेठी यांच्याकडे धडकले. आमच्या गावातील मूलभूत सोई सुविधा बंद करू नये, आम्हाला पुनर्वसन नको, अशी मागणी केली.पुनर्वसन ही प्रक्रिया ऐच्छिक असून गावातील ज्या नागरिकांना पुनर्वसन हवे असेल त्यांनी शासनाकडून मिळणारा लाभ घेऊन पुनर्वसित व्हावे. ज्यांना जायचे नसेल त्यांचेवर वनविभागाकडून जबरदस्ती केली जाणार नाही. उलट त्यांना नरेगाच्या कामावर रोजगार दिला जाईल.- दीपाली चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, हरिसालग्रामपंचायत प्रशासनाने गावकऱ्यांची दिशाभूल केली. आम्ही सभेला उपस्थित होतो. त्यावर स्वाक्षरी केल्या. पुनर्वसनाच्या ठरावाला आम्ही विरोध केला. आमचा विरोध कायम असेल.- चिंताराम रिंगा मावस्कर,गावकरी, फारेस्ट मालूरनागरिकांचे निवेदनानुसार, शासन निर्देशानुरुपच पुनर्वसन प्रक्रिया राबविण्यात येईल. तेथील नागरिक मूलभूत सोईसुविधेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- मिताली सेठी,प्रकल्प अधिकारी, धारणी

टॅग्स :forest departmentवनविभाग