शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मालूर फॉरेस्टवासीयांचा पुनर्वसनास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

हरिसाल वनपरिक्षेत्रांतर्गत चौराकुंड गट ग्रामपंचायतीत येणारे मालूर फॉरेस्ट हे गाव पुनर्वसित भागात मोडते. तेथील नागरिकांना पुनर्वसित करण्याच्या हालचाली तीन ते चार महिन्यांपासून सुरू झाल्या. त्याकरिता चौराकुंड ग्रामपंचायतीने मालूर फॉरेस्ट येथे ग्रामसभा घेतली.

ठळक मुद्देआदिवासी आक्रमक : प्रकल्प अधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोन क्षेत्रालगतच्या गावांची पुनर्वसन प्रक्रिया प्रशासनाने आरंभली आहे. त्यात ग्रामसभेने मालूर फॉरेस्ट या गावातील नागरिकांना अन्य गावांत पुनर्वसित करण्यासंदर्भाचा ठराव शासनाकडे पाठविला. मात्र, त्या ग्रामस्थांनी अन्य गावांत जाण्यास नकार दिला, असून शुक्रवारी शेकडो ग्रामस्थ प्रकल्प कार्यालयावर धडकले. नागरिकांच्या स्वाक्षऱ्या पुनर्वसनास होकार म्हणून देण्यात आल्या नाहीत, तर ग्रामसभेच्या उपस्थितीचा कोरम पूर्ण करण्याकरिता घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्याकडे केला.हरिसाल वनपरिक्षेत्रांतर्गत चौराकुंड गट ग्रामपंचायतीत येणारे मालूर फॉरेस्ट हे गाव पुनर्वसित भागात मोडते. तेथील नागरिकांना पुनर्वसित करण्याच्या हालचाली तीन ते चार महिन्यांपासून सुरू झाल्या. त्याकरिता चौराकुंड ग्रामपंचायतीने मालूर फॉरेस्ट येथे ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण, त्यांची चमू व गावकरी उपस्थित होते. त्या ग्रामसभेत पुनर्वसनाच्या ठरावाला निवडक नागरिकांनी पसंती दर्शविली. तर अनेक नागरिकांकडून विरोध करण्यात आला होता. तथापि, ग्रापं प्रशासनाने पुनर्वसनाचा ठराव बहुमताने पारित झाल्याची नोंद घेऊन तो प्रशासनास पाठविला. परंतु, ठराव पारित करताना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेला नागरिकांची उपस्थिती असलेल्या स्वाक्षरी घेतलेल्या रजिस्टरची झेरॉक्स वन व महसूल प्रशासनाला दिल्याचा आरोप पुनर्वसनाला विरोध करणाºया नागरिकांनी केला आहे. आम्हाला पुनर्वसन नकोच या मागणीकरिता गावातील २२५ नागरिकांच्या स्वाक्षरीचे लेखी निवेदन घेऊन अनेक ग्रामस्थ प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी मिताली सेठी यांच्याकडे धडकले. आमच्या गावातील मूलभूत सोई सुविधा बंद करू नये, आम्हाला पुनर्वसन नको, अशी मागणी केली.पुनर्वसन ही प्रक्रिया ऐच्छिक असून गावातील ज्या नागरिकांना पुनर्वसन हवे असेल त्यांनी शासनाकडून मिळणारा लाभ घेऊन पुनर्वसित व्हावे. ज्यांना जायचे नसेल त्यांचेवर वनविभागाकडून जबरदस्ती केली जाणार नाही. उलट त्यांना नरेगाच्या कामावर रोजगार दिला जाईल.- दीपाली चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, हरिसालग्रामपंचायत प्रशासनाने गावकऱ्यांची दिशाभूल केली. आम्ही सभेला उपस्थित होतो. त्यावर स्वाक्षरी केल्या. पुनर्वसनाच्या ठरावाला आम्ही विरोध केला. आमचा विरोध कायम असेल.- चिंताराम रिंगा मावस्कर,गावकरी, फारेस्ट मालूरनागरिकांचे निवेदनानुसार, शासन निर्देशानुरुपच पुनर्वसन प्रक्रिया राबविण्यात येईल. तेथील नागरिक मूलभूत सोईसुविधेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- मिताली सेठी,प्रकल्प अधिकारी, धारणी

टॅग्स :forest departmentवनविभाग