शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी फौजदारीस पोलिसांचा नकार

By admin | Updated: September 11, 2015 00:35 IST

तहसीलनजीकच्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळेधारकांशी नियमबाह्य करारनामे केल्याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी दाखल करण्यास नकार दर्शविला आहे.

गाळेधारक दोषी नाहीत : पोलीस-महापालिका आयुक्तांमध्ये चर्चाअमरावती : तहसीलनजीकच्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळेधारकांशी नियमबाह्य करारनामे केल्याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी दाखल करण्यास नकार दर्शविला आहे. यात गाळेधारकांची फसवणूक झाली असून ते दोषी नाहीत. केवळ महापालिका कर्मचारी जबाबदार आहेत, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर आणि महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यामध्ये चर्चा पार पडली.महापालिका उपायुक्त चंदन पाटील यांनी चार दिवसांपूर्वी खत्री कॉम्प्लेक्समध्ये बनावट करारनामे केल्याप्रकरणी ४० जणांवर फौजदारी दाखल करण्यासाठी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दिली होती.तत्कालीन बाजार परवाना अधीक्षकाचा प्रतापअमरावती : पोलिसांनी करारनामे, कागदपत्रे तपासली असता यात ३१ गाळेधारकांची महापालिकेचे तत्कालीन बाजार व परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी फसवणूक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जयस्वाल यांनी संकुलातील गाळेधारकांचे करारनामे संपण्यापूर्वीच २५ वर्षांकरिता करारनामे करुन दिले आहेत. गाळेधारकांची मुदत २०२० पर्यंत असताना गंगाप्रसाद जयस्वाल यांनी गाळेधारकांना येथील उपनिबंधक कार्यालयात नेऊन परस्पर करारनामे करुन दिले. वास्तविक मुदत संपण्यापूर्वी करारनामे करून द्यावेत, अशी मागणी अर्ज सादर करून गाळेधारकांनी महापालिकेकडे केली नव्हती. गंगाप्रसाद जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन गाळेधारकांकडून पैसे घेऊन हे करारनामे करुन दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यात कंत्राटदार खत्री व गंगाप्रसाद जयस्वाल हे खरे दोषी असून स्वतंत्र तक्रार आल्यास तशी कारवाई करता येईल, असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यास सत्य बाहेर येईल, असाही सूर उमटू लागला आहे. खत्री कॉम्प्लेक्समध्ये परस्पर करारानामे करुन दिल्याप्रकरणी पहिल्या टप्प्यात १४ ते १५ कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान झाल्याची माहिती आहे.महापालिका प्रशासनाने खत्री कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अपहार प्रकरणी एकच तक्रार दाखल करून सर्वांना आरोपी करण्याची तयारी चालविली होती. मात्र गाळेधारक दोषी नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. एकीकडे करार संपला नसताना प्रशासनाच्यावतीने जयस्वाल यांनी पुढील २५ वर्षासाठी गाळेधारकांना करारनामा करून दिल्याची बाब समोर आली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.