शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी फौजदारीस पोलिसांचा नकार

By admin | Updated: September 11, 2015 00:35 IST

तहसीलनजीकच्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळेधारकांशी नियमबाह्य करारनामे केल्याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी दाखल करण्यास नकार दर्शविला आहे.

गाळेधारक दोषी नाहीत : पोलीस-महापालिका आयुक्तांमध्ये चर्चाअमरावती : तहसीलनजीकच्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळेधारकांशी नियमबाह्य करारनामे केल्याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी दाखल करण्यास नकार दर्शविला आहे. यात गाळेधारकांची फसवणूक झाली असून ते दोषी नाहीत. केवळ महापालिका कर्मचारी जबाबदार आहेत, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर आणि महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यामध्ये चर्चा पार पडली.महापालिका उपायुक्त चंदन पाटील यांनी चार दिवसांपूर्वी खत्री कॉम्प्लेक्समध्ये बनावट करारनामे केल्याप्रकरणी ४० जणांवर फौजदारी दाखल करण्यासाठी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दिली होती.तत्कालीन बाजार परवाना अधीक्षकाचा प्रतापअमरावती : पोलिसांनी करारनामे, कागदपत्रे तपासली असता यात ३१ गाळेधारकांची महापालिकेचे तत्कालीन बाजार व परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी फसवणूक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जयस्वाल यांनी संकुलातील गाळेधारकांचे करारनामे संपण्यापूर्वीच २५ वर्षांकरिता करारनामे करुन दिले आहेत. गाळेधारकांची मुदत २०२० पर्यंत असताना गंगाप्रसाद जयस्वाल यांनी गाळेधारकांना येथील उपनिबंधक कार्यालयात नेऊन परस्पर करारनामे करुन दिले. वास्तविक मुदत संपण्यापूर्वी करारनामे करून द्यावेत, अशी मागणी अर्ज सादर करून गाळेधारकांनी महापालिकेकडे केली नव्हती. गंगाप्रसाद जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन गाळेधारकांकडून पैसे घेऊन हे करारनामे करुन दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यात कंत्राटदार खत्री व गंगाप्रसाद जयस्वाल हे खरे दोषी असून स्वतंत्र तक्रार आल्यास तशी कारवाई करता येईल, असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यास सत्य बाहेर येईल, असाही सूर उमटू लागला आहे. खत्री कॉम्प्लेक्समध्ये परस्पर करारानामे करुन दिल्याप्रकरणी पहिल्या टप्प्यात १४ ते १५ कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान झाल्याची माहिती आहे.महापालिका प्रशासनाने खत्री कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अपहार प्रकरणी एकच तक्रार दाखल करून सर्वांना आरोपी करण्याची तयारी चालविली होती. मात्र गाळेधारक दोषी नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. एकीकडे करार संपला नसताना प्रशासनाच्यावतीने जयस्वाल यांनी पुढील २५ वर्षासाठी गाळेधारकांना करारनामा करून दिल्याची बाब समोर आली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.