शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

जिल्ह्यात डेंग्यूचे थैमान, पाच रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: November 3, 2016 00:06 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यूसदृश रोगाने थैमान घातले आहे.

अमरावती : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यूसदृश रोगाने थैमान घातले आहे. महिनाभरात डेंग्यूसदृश तापाचे शंभरावर रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच रूग्णांचा मृत्यू झाला. रूग्णांचा मृत्यू हा डेंग्यूमुळेच झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळा संपल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढली. मध्यंतरी उकाडा निर्माण झाला होता. आता थंडीचा जोर हळुहळू वाढत आहे. हवामानाच्या बदलामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन' बळावले असून त्यातून विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पसरलेली अस्वच्छता व घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराईचा प्रसार वेगाने होत असल्याचे चित्र आहे. दूषित पाणी व उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सर्दी, खोकला व तापाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयांमध्ये दररोज तापाचे शेकडो रूग्ण उपचाराकरिता दाखल होत आहेत. त्याचप्रमाणे तापाच्या उपचाराकरिता खासगी रूग्णालयातही मोर्ठी गर्दी वाढली आहे. महिन्याभरात इर्विन रूग्णालयात डेंग्यूसदृश तापाने बाधित शेकडो रूग्ण दाखल केले गेले. त्यांची रक्तनमुना तपासणी केल्यावर त्यापैकी दहा रूग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले आहेत. मात्र, रूग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याने पाच रूग्ण दगावलेत. ही बाब आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे नागरिकांनी डासांचा प्रादुर्भाव रोखण्यावर व परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष पुरवावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. डेंग्यूविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक राऊत यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी सपर्क होऊ शकला नाही. तापाने चिमुरडीचा मृत्यूअप्पर वर्धा कॉलनीतील रहिवासी खुशी प्रवीण ढवळे ही ११ वर्षिय मुलगी तापाने फणफणत होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, मंगळवारी तिला अचानक उलट्यांचा त्रास जाणवल्याने तत्काळ इर्विन रुग्णालयात आणण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.टायफाईडचे ७१ रुग्ण पॉझिटिव्हमागील आठवड्यात इर्विनच्या बाह्यरूग्ण विभागात विविध आजारांनी ग्रस्त ५ हजार ६५८ रुग्णांच्या नोंदी झाल्या आहे. त्यामध्ये ३७७ रुग्ण तापाच्या उपचाराकरिता दाखल करण्यात झाले आहेत. या रुग्णांची रक्तनमुने तपासणी करण्यात आली असता तब्बल ७१ रुग्ण टायफाईड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. महिनाभरात शंभरावर रुग्ण दाखल : आठवडाभरात ७१ ‘टायफाईड पॉझिटिव्ह’मागील महिन्यात डेंग्यूसदृश आजाराचे शंभरावर रुग्ण दाखल झाले. त्यांची रक्तनमुने तपासणी करण्यात आल्यावर दहा रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याचे आढळून आले. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डेंग्यूचे डास सकाळच्या वेळी चावतात. त्यामुळे नागरिकांनी घराच्या आवारात साचलेल्या पाण्याचा निचरा त्वरित करावा. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी, इर्विन रुग्णालय.