शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:17 IST

चांदूर बाजार : अनेक वर्षांपासून प्रलंबित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी मांडून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू ...

चांदूर बाजार : अनेक वर्षांपासून प्रलंबित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी मांडून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या विभागीय मेळाव्यात बोलताना दिले.

चांदूर बाजार येथे एका मंगल कार्यालयाच्या सभागृहात ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा विभागीय मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार पटेल होते. उद्घाटन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. ग्रामपंचायतीच्या सेवकाने कामचुकारपणा केला, तर त्याचा फटका गावातील सर्व नागरिकांना बसतो, याचे भान असावे. मी सामान्य माणसांच्या समस्यांवर लढा देत आलो आहे. १० ऑगस्ट २०२० रोजी कामगार विभागाने काढलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अधिसूचना वित्त विभागाकडून येत्या २६ जानेवारीच्या आत लागू करण्यासाठी प्रयत्न करू तसेच ग्रामपंचायत कर्मचारी महामंडळ स्थापन करून मंत्रिमंडळात प्रतिनिधी नेमण्याच्या कार्यवाहीसाठी करण्यासाठी समिती गठित करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे ना. कडू म्हणाले.

मंचावर पंचायत समिती सभापती वनमाला गणेशकर, उपसभापती नितीन टाकरखेडे, मार्गदर्शक प्रदीप बंड, कर्मचारी संघटनेचे प्रकाश मारोटकर, युनियनचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार, कार्याध्यक्ष काजी अल्लाउद्दीन, गिरीश दाभाडकर, आदी उपस्थित होते. माणिकराव पवार, आकाश गुडसुंदरे, गोपाल वानखडे, नीलेश कडू, पांडुरंग लोखंडे यांच्यासह तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. संचालन पल्लवी चौधरी, प्रास्ताविक मणिक पवार, तर आभार प्रदर्शन अरविंद कुचे यांनी केले. या मेळाव्याला २१ जिल्ह्यांतून ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.