शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:17 IST

चांदूर बाजार : अनेक वर्षांपासून प्रलंबित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी मांडून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू ...

चांदूर बाजार : अनेक वर्षांपासून प्रलंबित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी मांडून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या विभागीय मेळाव्यात बोलताना दिले.

चांदूर बाजार येथे एका मंगल कार्यालयाच्या सभागृहात ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा विभागीय मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार पटेल होते. उद्घाटन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. ग्रामपंचायतीच्या सेवकाने कामचुकारपणा केला, तर त्याचा फटका गावातील सर्व नागरिकांना बसतो, याचे भान असावे. मी सामान्य माणसांच्या समस्यांवर लढा देत आलो आहे. १० ऑगस्ट २०२० रोजी कामगार विभागाने काढलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अधिसूचना वित्त विभागाकडून येत्या २६ जानेवारीच्या आत लागू करण्यासाठी प्रयत्न करू तसेच ग्रामपंचायत कर्मचारी महामंडळ स्थापन करून मंत्रिमंडळात प्रतिनिधी नेमण्याच्या कार्यवाहीसाठी करण्यासाठी समिती गठित करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे ना. कडू म्हणाले.

मंचावर पंचायत समिती सभापती वनमाला गणेशकर, उपसभापती नितीन टाकरखेडे, मार्गदर्शक प्रदीप बंड, कर्मचारी संघटनेचे प्रकाश मारोटकर, युनियनचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार, कार्याध्यक्ष काजी अल्लाउद्दीन, गिरीश दाभाडकर, आदी उपस्थित होते. माणिकराव पवार, आकाश गुडसुंदरे, गोपाल वानखडे, नीलेश कडू, पांडुरंग लोखंडे यांच्यासह तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. संचालन पल्लवी चौधरी, प्रास्ताविक मणिक पवार, तर आभार प्रदर्शन अरविंद कुचे यांनी केले. या मेळाव्याला २१ जिल्ह्यांतून ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.