शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

तीन लाख हेक्टर उद्‌ध्वस्त २१४.३६ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली व उसंत घेतली. त्यानंतर जुलै महिन्यापासून रिपरीप सुरु झाली. ती अजूनही सुरू आहे. या कालावधीत मूग, उडदासह सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीची मोठ्या प्रमाणात बोंडगळ झाली. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा खरिपातील अर्धेअधिक पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल । मूग, उडीद, सोयाबीनसह संत्रा बागांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पेरणीनंतर सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कीड,रोगांचा प्रादुर्भाव होवून जून ते सप्टेंबर या कालावधीत २ लाख ९१ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रामधील खरिपाची पिके व फळपिकांचे ३३ टक्कयांवर नुकसान झालेले आहे. या बाधित क्षेत्राला ह्यएनडीआरएफह्णच्या निकषाप्रमाणे मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी २१४ कोटी ३६ लाख ९२ हजार २५० रुपयांच्या मागणीचा अहवाल शासनाला पाठविला आहे.यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली व उसंत घेतली. त्यानंतर जुलै महिन्यापासून रिपरीप सुरु झाली. ती अजूनही सुरू आहे. या कालावधीत मूग, उडदासह सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीची मोठ्या प्रमाणात बोंडगळ झाली. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा खरिपातील अर्धेअधिक पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सातत्याने तक्रार झाल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संयुक्त सर्वेक्षणासह पंचनाम्याचे आदेश यंत्रणेला दिले. याबाबतचा अहवाल चार दिवसांपूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे आदेशदेखील तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.जिल्ह्यात यंदा १० तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केलेली आहे. सर्वाधिक पाऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेला आहे. पिकांच्या वाढीच्या व फुलोराच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला. त्यापूर्वी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन कंपन्यांद्वारा शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने २५ हजारांवर हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीची वेळ ओढावली होती. त्यामुळे शासन मदतीसह पिकांना विमा भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी आहे.३०२०६० शेतकऱ्यांच्या जिरायत क्षेत्राखालील २७७१७०.३५ हेक्टर क्षेत्रामधील पिकांसाठी १८८,४७,५८,३८० रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे.३२३ शेतकऱ्यांच्या ११७.६३ हेक्टरमधील बागायत पिकांचे १५,८७,८७० रुपयांचे नुकसान झालेले आहे.२०२१३ शेतकऱ्यांच्या १४२९७ हेक्टरमधील फळपिकांचे २५,७३,४६,००० रुपयांचे नुकसान झालेले आहे३२२५९६ शेतकऱ्यांच्या २९१५८४.९७ हेक्टरमधीळ पिकांचे २१४,३६,९२,२५० रुपयांचे नुकसान झालेले आहे.इतर पिकांचेही नुकसानयंदाच्या खरीप हंगामात ज्वारी २६२६ हेक्टर, तूर १५७९ हेक्टर, मका १८०८ हेक्टर, धान ३८१८ हेक्टर या पिकांसाठी ६८०० रुपये हेक्टर, यासोबतच केळीचे ११३ हेक्टर, भाजीपाला १.४५ हेक्टर, ऊस २.५५ हेक्टरल १३,५०० रुपये हेक्टर व संत्रा १४,०९७ हेक्टर, मोसंबी १९९ हेक्टरला १८,००० रुपये हेक्टरप्रमाणे अपेक्षित निधीची मागणी शासनाकडे केलेली आहे.

टॅग्स :agricultureशेती