शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख हेक्टर उद्‌ध्वस्त २१४.३६ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली व उसंत घेतली. त्यानंतर जुलै महिन्यापासून रिपरीप सुरु झाली. ती अजूनही सुरू आहे. या कालावधीत मूग, उडदासह सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीची मोठ्या प्रमाणात बोंडगळ झाली. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा खरिपातील अर्धेअधिक पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल । मूग, उडीद, सोयाबीनसह संत्रा बागांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पेरणीनंतर सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कीड,रोगांचा प्रादुर्भाव होवून जून ते सप्टेंबर या कालावधीत २ लाख ९१ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रामधील खरिपाची पिके व फळपिकांचे ३३ टक्कयांवर नुकसान झालेले आहे. या बाधित क्षेत्राला ह्यएनडीआरएफह्णच्या निकषाप्रमाणे मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी २१४ कोटी ३६ लाख ९२ हजार २५० रुपयांच्या मागणीचा अहवाल शासनाला पाठविला आहे.यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली व उसंत घेतली. त्यानंतर जुलै महिन्यापासून रिपरीप सुरु झाली. ती अजूनही सुरू आहे. या कालावधीत मूग, उडदासह सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीची मोठ्या प्रमाणात बोंडगळ झाली. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा खरिपातील अर्धेअधिक पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सातत्याने तक्रार झाल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संयुक्त सर्वेक्षणासह पंचनाम्याचे आदेश यंत्रणेला दिले. याबाबतचा अहवाल चार दिवसांपूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे आदेशदेखील तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.जिल्ह्यात यंदा १० तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केलेली आहे. सर्वाधिक पाऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेला आहे. पिकांच्या वाढीच्या व फुलोराच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला. त्यापूर्वी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन कंपन्यांद्वारा शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने २५ हजारांवर हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीची वेळ ओढावली होती. त्यामुळे शासन मदतीसह पिकांना विमा भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी आहे.३०२०६० शेतकऱ्यांच्या जिरायत क्षेत्राखालील २७७१७०.३५ हेक्टर क्षेत्रामधील पिकांसाठी १८८,४७,५८,३८० रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे.३२३ शेतकऱ्यांच्या ११७.६३ हेक्टरमधील बागायत पिकांचे १५,८७,८७० रुपयांचे नुकसान झालेले आहे.२०२१३ शेतकऱ्यांच्या १४२९७ हेक्टरमधील फळपिकांचे २५,७३,४६,००० रुपयांचे नुकसान झालेले आहे३२२५९६ शेतकऱ्यांच्या २९१५८४.९७ हेक्टरमधीळ पिकांचे २१४,३६,९२,२५० रुपयांचे नुकसान झालेले आहे.इतर पिकांचेही नुकसानयंदाच्या खरीप हंगामात ज्वारी २६२६ हेक्टर, तूर १५७९ हेक्टर, मका १८०८ हेक्टर, धान ३८१८ हेक्टर या पिकांसाठी ६८०० रुपये हेक्टर, यासोबतच केळीचे ११३ हेक्टर, भाजीपाला १.४५ हेक्टर, ऊस २.५५ हेक्टरल १३,५०० रुपये हेक्टर व संत्रा १४,०९७ हेक्टर, मोसंबी १९९ हेक्टरला १८,००० रुपये हेक्टरप्रमाणे अपेक्षित निधीची मागणी शासनाकडे केलेली आहे.

टॅग्स :agricultureशेती