शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

विद्यापीठात पुनर्मूल्यांकन निकालास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:32 IST

उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देप्रवेशाबाबत विद्यार्थी चिंतीत : आधी नापास, नंतर पास; परीक्षा शुल्काचा भार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र, कालावधीपेक्षा अधिक अवधी झाला असताना पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम प्रवेशाची चिंता सतावू लागली आहे.उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची नियमावली आहे. थोडा विलंब झाला की विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारून पुनर्मूल्यांकनाचे अर्ज घेतले जातात. असे असताना विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन होण्यास बराच वेळ लागत असल्याची ओरड विद्यार्थ्यांसह पालकांची आहे. अगोदरच परीक्षेचे निकाल विलंबाने जाहीर करण्यात आले. आता पुनर्मूल्यांकनास विलंब लागत असल्याने पुढील अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल अथवा नाही, याबाबत विद्यार्थी चिंतातूर झाले आहेत. मलकापूर तालुक्यातील काही विद्यार्थ्यांना बी.कॉम. प्रथम वर्षात पहिल्या सेमिस्टरच्या इंग्रजी विषयात नापास करण्यात आले होते. मात्र, पुनर्मूल्यांकनात याच विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाले असून, ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचा आर्थिक भार विद्यार्थ्यांना नाहकपणे सोसावा लागत आहे. उन्हाळी परीक्षेत झालेल्या मूल्यांकनात अनेक त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. अमरावती विभागातील यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून पुनर्मूल्यांकनाच्या निकालाबाबत तोडगा निघत नसल्याची ओरड आहे.निकालानंतर १० दिवसांत घेता येईल प्रवेशपुनर्मूल्यांकनाचे ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर १० दिवसांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, ही बाब विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. तशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ