शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

विद्यापीठात पुनर्मूल्यांकन निकालास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:32 IST

उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देप्रवेशाबाबत विद्यार्थी चिंतीत : आधी नापास, नंतर पास; परीक्षा शुल्काचा भार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र, कालावधीपेक्षा अधिक अवधी झाला असताना पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम प्रवेशाची चिंता सतावू लागली आहे.उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची नियमावली आहे. थोडा विलंब झाला की विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारून पुनर्मूल्यांकनाचे अर्ज घेतले जातात. असे असताना विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन होण्यास बराच वेळ लागत असल्याची ओरड विद्यार्थ्यांसह पालकांची आहे. अगोदरच परीक्षेचे निकाल विलंबाने जाहीर करण्यात आले. आता पुनर्मूल्यांकनास विलंब लागत असल्याने पुढील अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल अथवा नाही, याबाबत विद्यार्थी चिंतातूर झाले आहेत. मलकापूर तालुक्यातील काही विद्यार्थ्यांना बी.कॉम. प्रथम वर्षात पहिल्या सेमिस्टरच्या इंग्रजी विषयात नापास करण्यात आले होते. मात्र, पुनर्मूल्यांकनात याच विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाले असून, ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचा आर्थिक भार विद्यार्थ्यांना नाहकपणे सोसावा लागत आहे. उन्हाळी परीक्षेत झालेल्या मूल्यांकनात अनेक त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. अमरावती विभागातील यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून पुनर्मूल्यांकनाच्या निकालाबाबत तोडगा निघत नसल्याची ओरड आहे.निकालानंतर १० दिवसांत घेता येईल प्रवेशपुनर्मूल्यांकनाचे ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर १० दिवसांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, ही बाब विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. तशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ