शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

विद्यापीठात पुनर्मूल्यांकन निकालास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:32 IST

उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देप्रवेशाबाबत विद्यार्थी चिंतीत : आधी नापास, नंतर पास; परीक्षा शुल्काचा भार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र, कालावधीपेक्षा अधिक अवधी झाला असताना पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम प्रवेशाची चिंता सतावू लागली आहे.उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची नियमावली आहे. थोडा विलंब झाला की विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारून पुनर्मूल्यांकनाचे अर्ज घेतले जातात. असे असताना विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन होण्यास बराच वेळ लागत असल्याची ओरड विद्यार्थ्यांसह पालकांची आहे. अगोदरच परीक्षेचे निकाल विलंबाने जाहीर करण्यात आले. आता पुनर्मूल्यांकनास विलंब लागत असल्याने पुढील अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल अथवा नाही, याबाबत विद्यार्थी चिंतातूर झाले आहेत. मलकापूर तालुक्यातील काही विद्यार्थ्यांना बी.कॉम. प्रथम वर्षात पहिल्या सेमिस्टरच्या इंग्रजी विषयात नापास करण्यात आले होते. मात्र, पुनर्मूल्यांकनात याच विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाले असून, ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचा आर्थिक भार विद्यार्थ्यांना नाहकपणे सोसावा लागत आहे. उन्हाळी परीक्षेत झालेल्या मूल्यांकनात अनेक त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. अमरावती विभागातील यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून पुनर्मूल्यांकनाच्या निकालाबाबत तोडगा निघत नसल्याची ओरड आहे.निकालानंतर १० दिवसांत घेता येईल प्रवेशपुनर्मूल्यांकनाचे ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर १० दिवसांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, ही बाब विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. तशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ