शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत चोरीसाठी चोरट्यांच्या सीमा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:39 IST

रेल्वे गाड्यांत चोरी करण्यासाठी चोरट्यांनी आपल्या सीमा निश्चित केल्यात, हे वाचून जरा आश्चर्य होईल. पण, ते खरे आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या आशीर्वादाने हा प्रकार बिनधास्तपणे सुरू असून, रेल्वे गाड्यांत आतापर्यंत झालेल्या घटनांत एकही चोरी उघडकीस आणण्याचे धाडस रेल्वे पोलिसांनी दाखविले नाही, हे विशेष.

ठळक मुद्देमोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ : नवख्या टोळीकडून चोरीचे धाडस, रेल्वे पोलीस अनभिज्ञ
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे गाड्यांत चोरी करण्यासाठी चोरट्यांनी आपल्या सीमा निश्चित केल्यात, हे वाचून जरा आश्चर्य होईल. पण, ते खरे आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या आशीर्वादाने हा प्रकार बिनधास्तपणे सुरू असून, रेल्वे गाड्यांत आतापर्यंत झालेल्या घटनांत एकही चोरी उघडकीस आणण्याचे धाडस रेल्वे पोलिसांनी दाखविले नाही, हे विशेष.रेल्वे गाड्यात हल्ली रेल्वे प्रवास असुरक्षित झाला आहे. रेल्वे पोलीस नेमके कसे कर्तव्य बजावतात, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. रेल्वेची मालमत्ता, प्रवासी सुरक्षिततेसाठी प्रशासनाने बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. मात्र, धावत्या गाड्यांमध्ये चेन स्नेचिंग, साहित्यांची चोरी, मोबाईल चोरी, उचलेगिरीचे प्रकार हे नित्याचीच बाब आहे. नवजीवन एक्सप्रेसने गांजा तस्करी होत असल्याचे सर्वश्रूत असूनही रेल्वे पोलीस ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा कारभार करीत आहे. गांजा कोण, कोठून, कसा आणतो, याची इत्थंभूत माहिती रेल्वे पोलिसांना असताना ठोस कारवाई का नाही? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. बडनेरासह अकोला, वर्धा, पुलगाव येथील नवख्या चोरट्यांनी रेल्वे गाड्यांना लक्ष केले आहे. यात काही बालकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. बडनेरा ते अकोला आणि बडनेरा ते वर्धा, अकोला ते भुसावळ, वर्धा ते नागपूर असे चोरट्यांनी रेल्वे गाड्यात चोरींसाठी स्वत:हून सीमा आखून घेतल्या आहेत. चोरट्यांच्या या सीमेबद्दल रेल्वे पोलीस अवगत आहे. मात्र, त्यांना चोरट्यांकडून ‘रसद’ मिळत असल्याने ‘ते’ सुद्धा चुप्पी साधून आहेत. पोलिसांच्या अभयानेच चोरटे प्लॅटफार्मवरून रेल्वे गाड्यात ‘अंजाम’ देण्यासाठी प्रवास करतात. सहा महिन्यांत बडनेरा रेल्वे स्थानकावर गाडी सुरू होताच चेन स्नेचिंगचा चार घटना घडल्या आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसात तक्रारादेखील झाल्यात.मोबाईल चोरीसाठी नवख्या टोळीचे पदार्पणरेल्वे गाड्यात प्रवाशांकडील महागडे मोबाईल क्षणात उडविण्याची किमया करणारे नवख्या टोळीने पदार्पण केले आहे. १२ ते २५ वयोगटातील काही युवकांसह बालकांचाही यात समावेश असल्याची माहिती आहे. प्रवाशाकडील साहित्य चोरी करण्यात त्यांचा हातखंडा असून, मोबाईल चोरण्यास ते पटाईत आहे. मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने वाढ होत असताना रेल्वे पोलिसांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.चोरीच्या घटनांची पोलिसात तक्रार नोंदविली जात नाहीलांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. रेल्वेत ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची घटना घडते, त्याबाबत दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्याद नोंदविणे कठीण जाते. अशातच प्रवासी हे बाहेरील असल्याने ते आपल्याकडील साहित्य, कुटुंबीयांना सोडून पोलिसात तक्रार नोंदविण्यास जाऊ शकत नाही. त्यामुळे रेल्वे गाड्यांत अनेक चोरीच्या घटना घडूनदेखील तक्रारीअभावी पोलिसात नोंद केली जात नाही. त्यामुळे रेल्वे गाड्यांत चोरीच्या घटनांमध्ये नियमित वाढ होत आहे. याला आळा घालणे गरजेचे झाले आहे.रेल्वे स्थानकाच्या सीमेवर चोरट्यांवर पाळत ठेवण्यासाठी साध्या पोषाखात पोलीस तैनात करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एक मोबाईल चोर पडकला असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. चोरीची तक्रार प्राप्त होताच त्या दिशेने तपास करून चोरट्यांना जेरबंद केले जाते.- पी. व्ही. चक्रे, पोलीस निरीक्षक, बडनेरा रेल्वे