शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्प उभारणीसाठी धोरण निश्चित

By admin | Updated: January 11, 2017 00:15 IST

राज्यातील विविध शहरांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प राबविले जात आहेत.

पोलीस प्रशासनावर जबाबदारी : मार्गदर्शक तत्त्वे जाहीरअमरावती : राज्यातील विविध शहरांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातील एकवाक्यतेचा अभाव पाहता हे प्रकल्प राबविण्यासाठी गृहविभागाने निश्चित असे धोरण ठरविले असून काही मार्गदर्शक तत्त्वे विहित करण्यात आली आहेत. सार्वजनिक सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, अतिरेकी कारवाया रोखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण, वाहतूक नियंत्रण तसेच संवेदनशील भागांवर नियंत्रण ठेवण्यसाठी सीसीटीव्ही संनिरीक्षण यंत्रणा बसविल्या जाते. या प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजना, आमदार फंड तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. तथापि सीसीटीव्ही संनियंत्रण यंत्रणा बसविण्याबाबत निश्चित असे धोरण नसल्याने प्रकल्प अंमलबजावणीत एक वाक्यता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यात आली आहेत. ज्या सीसीटीव्ही प्रकल्पामध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा ज्या प्रकल्पाची किंमत ५ कोटीपेक्षा अधिक असेल अशा प्रकल्पांचा विनंती प्रस्ताव संबंधित पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांनी तयार करून तो पोलीस महासंचालक मुंबईमार्फत गृह विभागतर्फे सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्प राबविण्यासाठी स्थानिक प्रकल्प समितीवा पाठविण्यात येईल. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीसह महापालिका आयुक्त, वाहतूक पोलीस प्रमुख, सीईओ आणि पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांनी नामनिर्देशित केलेला अधिकारी राहील.कॅमेऱ्याची ठिकाणे, प्रकार, जोडणी पोलीस, वाहतूक विभाग आणि महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद यांच्या गरजा विचारात घेऊन पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी कॅमेरे बसविण्याची ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. अति वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख वाहूक जंक्शन, गुन्ह्याची गुन्हेप्रवण ठिकाणे, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे, धार्मिक मिरवणुकीचे मार्ग, प्रमुख संरचना (जसे उड्डाणपूल, पूल, विजनिर्मिती केंद्र, वितरणाची ठिकाणे, धरणे, पाणीपुरवठा व पंप केंद्रे, जल शुद्धीकरण संयंत्रे, थोर व्यक्तीचे पुतळे इत्यादी) आणि शहराचे प्रवेश व निर्गमन नाके यांना प्राधान्य दिले जावे, तसेच महत्त्वाच्या शासकीय इमारतीकडे जाणारे मार्ग यांचाही समावेश असावा, असे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहे.