शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मृग बहराचे ‘डिस्टन्सिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

संत्राउत्पादक जिल्ह्याच्या १४ तालुक्यांतील एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. चार वर्षांपासून अपेक्षित उत्पन्नाला मुकलेल्या आणि दुष्काळाने होरपळलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांना निदान यावर्षी तरी सुगीची अपेक्षा होती.

ठळक मुद्देअत्यल्प उत्पादन : सतत पाचव्या वर्षी उत्पादन माघारले, भाव जबरदस्त

देवेंद्र धोटे।लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा शहीद : मे महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे संत्राबागांचा ताण तुटल्याने आणि वरून पूर्वमोसमी पाऊस आल्याने आस लावून बसलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांचा यावर्षी भ्रमनिरास झाला. मृग बहरानेही कोरोनाकाळात ‘डिस्टन्सिंग’ पाळत हुलकावणी दिल्याने जवळपास ९० ते ९५ टक्के क्षेत्रातील संत्राबागा बहराविना आहेत.संत्राउत्पादक जिल्ह्याच्या १४ तालुक्यांतील एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. चार वर्षांपासून अपेक्षित उत्पन्नाला मुकलेल्या आणि दुष्काळाने होरपळलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांना निदान यावर्षी तरी सुगीची अपेक्षा होती. गतवर्षीच्या हंगामात शेवटच्या टप्प्यात लॉकडाऊनमुळे थोडे फार नुकसान झाले तरीही कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’युक्त संत्राफळे प्रकाशझोतात आली. बाजारात वाढलेल्या मागणीमुळे उत्पन्नात भर पडेल, असा शेतकºयांना अंदाज होता. मात्र, ऐनवेळी बहराने हुलकावणी दिल्याने चिंतेचे सावट पसरले आहे.बहराच्या काळात दरवर्षी साधारणपणे दीड ते दोन हजार रुपये प्रतिहजार दराने व्यापारी सौदे करतात. यंदा मृग बहराचे उत्पादन अत्यल्प झाल्याने यावर्षी अभूतपूर्व बाजारभाव मिळत आहे. प्रतिहजार ४५०० रुपये दराने व्यापाºयांनी संत्री खरेदी केली. बळीराजा सांगेल तो दर द्यायला व्यापारी तयार असला तरी बागेत फळेच नाहीत. यामुळे ‘देव आला द्यायला, पण पदर नाही घ्यायला’ अशी शेतकºयांची परिस्थिती झाली आहे.चार वर्षांत नापिकीमुळे कफल्लक झालेल्या संत्राउत्पादक शेतकºयांना यावर्षीच्या नियोजन खर्चाची चिंता सतावत आहे.निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या संत्राउत्पादक शेतकºयांच्या मृग बहरात न आलेल्या संत्राबागांचे सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.- रमेश जिचकार, संचालक, महाराष्ट्र राज्य संत्राउत्पादक संघयावर्षी चांगल्या भाव आहेत. मुबलक संत्री असती, तर चार वर्षात झालेले नुकसान भरून निघाले असते. आता चालू वर्षाचे व्यवस्थापन अशक्य आहे.- देवेंद्र ढोरेसंत्राउत्पादक, बेनोडा शहीद

टॅग्स :agricultureशेती