शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

मृग बहराचे ‘डिस्टन्सिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

संत्राउत्पादक जिल्ह्याच्या १४ तालुक्यांतील एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. चार वर्षांपासून अपेक्षित उत्पन्नाला मुकलेल्या आणि दुष्काळाने होरपळलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांना निदान यावर्षी तरी सुगीची अपेक्षा होती.

ठळक मुद्देअत्यल्प उत्पादन : सतत पाचव्या वर्षी उत्पादन माघारले, भाव जबरदस्त

देवेंद्र धोटे।लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा शहीद : मे महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे संत्राबागांचा ताण तुटल्याने आणि वरून पूर्वमोसमी पाऊस आल्याने आस लावून बसलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांचा यावर्षी भ्रमनिरास झाला. मृग बहरानेही कोरोनाकाळात ‘डिस्टन्सिंग’ पाळत हुलकावणी दिल्याने जवळपास ९० ते ९५ टक्के क्षेत्रातील संत्राबागा बहराविना आहेत.संत्राउत्पादक जिल्ह्याच्या १४ तालुक्यांतील एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. चार वर्षांपासून अपेक्षित उत्पन्नाला मुकलेल्या आणि दुष्काळाने होरपळलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांना निदान यावर्षी तरी सुगीची अपेक्षा होती. गतवर्षीच्या हंगामात शेवटच्या टप्प्यात लॉकडाऊनमुळे थोडे फार नुकसान झाले तरीही कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’युक्त संत्राफळे प्रकाशझोतात आली. बाजारात वाढलेल्या मागणीमुळे उत्पन्नात भर पडेल, असा शेतकºयांना अंदाज होता. मात्र, ऐनवेळी बहराने हुलकावणी दिल्याने चिंतेचे सावट पसरले आहे.बहराच्या काळात दरवर्षी साधारणपणे दीड ते दोन हजार रुपये प्रतिहजार दराने व्यापारी सौदे करतात. यंदा मृग बहराचे उत्पादन अत्यल्प झाल्याने यावर्षी अभूतपूर्व बाजारभाव मिळत आहे. प्रतिहजार ४५०० रुपये दराने व्यापाºयांनी संत्री खरेदी केली. बळीराजा सांगेल तो दर द्यायला व्यापारी तयार असला तरी बागेत फळेच नाहीत. यामुळे ‘देव आला द्यायला, पण पदर नाही घ्यायला’ अशी शेतकºयांची परिस्थिती झाली आहे.चार वर्षांत नापिकीमुळे कफल्लक झालेल्या संत्राउत्पादक शेतकºयांना यावर्षीच्या नियोजन खर्चाची चिंता सतावत आहे.निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या संत्राउत्पादक शेतकºयांच्या मृग बहरात न आलेल्या संत्राबागांचे सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.- रमेश जिचकार, संचालक, महाराष्ट्र राज्य संत्राउत्पादक संघयावर्षी चांगल्या भाव आहेत. मुबलक संत्री असती, तर चार वर्षात झालेले नुकसान भरून निघाले असते. आता चालू वर्षाचे व्यवस्थापन अशक्य आहे.- देवेंद्र ढोरेसंत्राउत्पादक, बेनोडा शहीद

टॅग्स :agricultureशेती