शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

११ तालुक्यांत भूजल पातळीत घट

By admin | Updated: February 10, 2016 00:08 IST

सन २०१५ च्या जून ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस होऊनही भूजल पातळी घटण्याचा वेग यंदाही कायम आहे.

अमरावती : सन २०१५ च्या जून ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस होऊनही भूजल पातळी घटण्याचा वेग यंदाही कायम आहे. अंजनगाव तालुक्यात सर्वाधिक १.६९ मीटरची घट नोंदविण्यात आली.जानेवारी अखेर भूजल सर्वेक्षण विभागामार्फत नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील जमिनीतील पाण्याच्या पातळीत सरासरी ०.७८ मीटरने घट झाल्याचे स्पष्ट होते. ११ तालुक्यात भूगर्भातील जलपातळी घटली असून धामणगाव रेल्वे आणि तिवसा तालुक्यात किंचितशी वाढ नोंदविण्यात आली आहे. जिल्हा भूजल व सर्वेक्षण यंत्रणेद्वारे सरासरी पर्जन्यमान, पर्जन्यमानातील फरक, निरीक्षण, विहिरीवरून भूजलपातळीत झालेल्या फरकांचे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाच्या अभ्यासानुसार जिल्ह्यातील भूगर्भात असलेल्या जलपातळीत घट झाली आहे. (प्रतिनिधी)१४८ विहिरींच्या निरीक्षणांतीचा निष्कर्ष जानेवारी २०१६ अखेर ११ तालुक्यातील भूगर्भ जलपातळी मध्ये ०.७८ मीटरने सरासरी घट आढळून आली. जिल्ह्यातील १४८ विहिरींतील पाण्याची पातळी वर्षातून चारदा मोजली जाते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१५ दरम्यान सरासरी ९२ टक्के पर्जन्यमान झाले. त्यापार्श्वभूमीवर भूगर्भातील जलपातळीत नोंदविलेली घट पाहता उपसा नियंत्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याची परिस्थिती महाराष्ट्रातील भूजल व विकास अनुसंघाने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१५ मध्ये राज्यभरातील विविध तालुक्यांत सरासरी पर्जन्यमानात २५ ते ५० टक्के घट झाली. परिणामी भूजल पातळी एक ते तीन मीटरने खाली गेली. राज्यात ३५५ तालुक्यांपैकी १ ७६ तालुक्यांत २ मीटरपर्यंत व ११२ तालुक्यात भूजल पातळीतील घट तीन मीटरपेक्षा अधिक आहे. यामुळे तीव्र पाणी टंचाई भासत आहे.