शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

शेतसाहित्य वाटप करण्यात दिरंगाई

By admin | Updated: July 15, 2015 01:17 IST

आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मागील महिन्यात आचारसंहिता लागू झाली.

आचासंहितेचा फटका : पंचायत समितीत धूळ खातचंद्रपूर : आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मागील महिन्यात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळेच बैलबंड्या वाटपाची प्रक्रिया रखडली असून सध्या शेकडो बैलबंड्या पंचायत समितीच्या आवारातच धूळ खात पडल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलबंडी वाटप केली जाते. ९० टक्के राज्य शासन, तर १० टक्के लाभार्थ्यांना भराव्या लागतात. बैलबंड्या मिळविण्याची पद्धत साधीसोपी आहे. अनुदानी ९० टक्के मिळत असल्याने गेल्या काही वर्षापासून समाजकल्याण विभागाच्या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. २०१४-१५ या सत्रासाठी समाजकल्याण विभागाने अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून बैलबंड्यासाठी अर्ज मागविले होते. शेकडो लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले. त्यातून ३०९ लाभार्थी पात्र ठरले. ही प्रक्रिया मार्च, एप्रिल महिन्यात पार पडली. बैलबंड्या आल्यावर त्यांचे वितरण पंचायत समितीस्तरावर होणार होते. मात्र, याचा कालावधी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. जून महिन्यात आचारसंहिता लागली. आचारसंहितेत साहित्याचे वाटप करता येत नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या या बैलबंड्या पंचायत समितीच्या आवारात धूळखात पडल्या.खरिपाच्या हंगामात बैलबंड्या मिळतील, अशी अपेक्षा लाभार्थ्यांना होती. मात्र, अजूनही या बैलबंड्याचे वाटप करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्याचा दौरा केला. त्यात त्यांना या बैलबंड्या ठिकठिकाणी पडून दिसल्या. त्यांनी त्या वाटप करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अजूनही त्यांना वितरीत केल्या नाहीत. (स्थानिक प्रतिनिधी)