शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

शेतसाहित्य वाटप करण्यात दिरंगाई

By admin | Updated: July 15, 2015 01:17 IST

आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मागील महिन्यात आचारसंहिता लागू झाली.

आचासंहितेचा फटका : पंचायत समितीत धूळ खातचंद्रपूर : आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मागील महिन्यात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळेच बैलबंड्या वाटपाची प्रक्रिया रखडली असून सध्या शेकडो बैलबंड्या पंचायत समितीच्या आवारातच धूळ खात पडल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलबंडी वाटप केली जाते. ९० टक्के राज्य शासन, तर १० टक्के लाभार्थ्यांना भराव्या लागतात. बैलबंड्या मिळविण्याची पद्धत साधीसोपी आहे. अनुदानी ९० टक्के मिळत असल्याने गेल्या काही वर्षापासून समाजकल्याण विभागाच्या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. २०१४-१५ या सत्रासाठी समाजकल्याण विभागाने अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून बैलबंड्यासाठी अर्ज मागविले होते. शेकडो लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले. त्यातून ३०९ लाभार्थी पात्र ठरले. ही प्रक्रिया मार्च, एप्रिल महिन्यात पार पडली. बैलबंड्या आल्यावर त्यांचे वितरण पंचायत समितीस्तरावर होणार होते. मात्र, याचा कालावधी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. जून महिन्यात आचारसंहिता लागली. आचारसंहितेत साहित्याचे वाटप करता येत नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या या बैलबंड्या पंचायत समितीच्या आवारात धूळखात पडल्या.खरिपाच्या हंगामात बैलबंड्या मिळतील, अशी अपेक्षा लाभार्थ्यांना होती. मात्र, अजूनही या बैलबंड्याचे वाटप करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्याचा दौरा केला. त्यात त्यांना या बैलबंड्या ठिकठिकाणी पडून दिसल्या. त्यांनी त्या वाटप करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अजूनही त्यांना वितरीत केल्या नाहीत. (स्थानिक प्रतिनिधी)