शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

शेतसाहित्य वाटप करण्यात दिरंगाई

By admin | Updated: July 15, 2015 01:17 IST

आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मागील महिन्यात आचारसंहिता लागू झाली.

आचासंहितेचा फटका : पंचायत समितीत धूळ खातचंद्रपूर : आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मागील महिन्यात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळेच बैलबंड्या वाटपाची प्रक्रिया रखडली असून सध्या शेकडो बैलबंड्या पंचायत समितीच्या आवारातच धूळ खात पडल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलबंडी वाटप केली जाते. ९० टक्के राज्य शासन, तर १० टक्के लाभार्थ्यांना भराव्या लागतात. बैलबंड्या मिळविण्याची पद्धत साधीसोपी आहे. अनुदानी ९० टक्के मिळत असल्याने गेल्या काही वर्षापासून समाजकल्याण विभागाच्या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. २०१४-१५ या सत्रासाठी समाजकल्याण विभागाने अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून बैलबंड्यासाठी अर्ज मागविले होते. शेकडो लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले. त्यातून ३०९ लाभार्थी पात्र ठरले. ही प्रक्रिया मार्च, एप्रिल महिन्यात पार पडली. बैलबंड्या आल्यावर त्यांचे वितरण पंचायत समितीस्तरावर होणार होते. मात्र, याचा कालावधी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. जून महिन्यात आचारसंहिता लागली. आचारसंहितेत साहित्याचे वाटप करता येत नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या या बैलबंड्या पंचायत समितीच्या आवारात धूळखात पडल्या.खरिपाच्या हंगामात बैलबंड्या मिळतील, अशी अपेक्षा लाभार्थ्यांना होती. मात्र, अजूनही या बैलबंड्याचे वाटप करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्याचा दौरा केला. त्यात त्यांना या बैलबंड्या ठिकठिकाणी पडून दिसल्या. त्यांनी त्या वाटप करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अजूनही त्यांना वितरीत केल्या नाहीत. (स्थानिक प्रतिनिधी)