शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:08 IST

पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तिवसा, भातकुली, अमरावती या तालुक्यांतच नव्हे, तर जिल्हाभरात सोयाबीनसह अन्य पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : यशोमती ठाकू र, वीरेंद्र जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तिवसा, भातकुली, अमरावती या तालुक्यांतच नव्हे, तर जिल्हाभरात सोयाबीनसह अन्य पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे ऐन शेंगा लागण्याच्या काळात सोयाबीन झाडांनी माना टाकल्या आहेत. कमी पावसात येणारे पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. परंतु, मृग नक्षत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा पावसाने ओढ दिली. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्या पावसावर तग धरून असलेले सोयाबीन आता पिवळे पडूृन सुकत चालले आहे. पिकांची स्थिती पाहून शेतकरी हवालदील होत आहेत. शेंगा भरल्या नसल्याने हे नगदी पीक शेतकºयांच्या हातून निसटले आहे. तिवसा तालुक्यातील २२ हजार १५३ हेक्टरवरील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात यावे व शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप यांनी केली. सोमवारी आठवड्याचा प्रारंभ असल्याने कुठल्याही बैठकीला झेडपी अधिकाºयांना बोलविण्यात येऊ नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आमदारद्वयांंनी केली. यावेळी झडेपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, रमेश काळे, हरिभाऊ मोहोड, नितीन दगडकर, नरेंद्र विघ्ने, वीरेंद्र जाधव, नौशाद पठाण, इम्रान खान, दिलीप काळबांडे, अभिजित मानकर, विष्णू राठोड, पिंटू गुडधे, ऐनुल्ला खान, पंकज देशमुख, नंदू खडसे, मुकद्दरखाँ पठाण, साहेबराव ठाकरे आदी उपस्थित होते.मृग, उडिदाची खरेदी सुरू करामूग व उडीद बाजार समितीत दाखल होण्यास दोन आठवडे झाले. दोन्ही शेतमालाची मोठी आवक आहे. मात्र, व्यापारी मागतील त्या दरात शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे. शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २५०० रुपये नुकसान होत आहे. पणनमंत्री मात्र हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी आॅक्टोबरच्या मुहूर्तावर ठाम आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी आमदारद्वयांनी केली.सोयाबीन पडले पिवळेतिवसा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात सोयाबीनसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दमदार दिसणारे सोयाबीनचे पीक पिवळे पडून सुकत चालले आहे. त्यामुळे शेतकºयांचे हातचे नगदी पीक गेले आहे. दोन वर्षांच्या दुष्काळाने होरपळल्यानंतर मागील वर्षी शेतमालाला मिळालेला मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावी, अशी मागणी आमदारद्वयांंनी केली आहे.खोलापूरच्या मतदार यादीतून नावे गहाळभातकुली तालुक्यातील खोलापूर येथील जवळपास ७०० मतदारांची नावे यादीत नसल्याची तक्रार आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांच्यावतीने केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज संस्थेची मतदार यादी व विधानसभा, लोकसभा निवडणुकीची मतदार यादी यात फरक आहे. सदर मतदारांनी २०१४ च्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला. मात्र, तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदारांकडून याची तपासणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले.जिल्हाभरात सोयाबीनचे पीक हातून गेले आहे. शेतकºयांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्वरित सर्वेक्षण करा. नुकसानभरपाई द्या. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा. मूग व उडीदाची खरेदी केंद्र सुरू करा.- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसाविविध शेतांमध्ये सोयाबीन पिकाची अचानक पाहणी केली. पाहणीत नुकसान स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अहवाल शासनाकडे पाठवून, सर्र्वेेक्षणाबाबतचा निर्णय घेतला जाईल.- अभिजित बांगरजिल्हाधिकारीसोयाबीनचे नुकसान प्रचंड आहे. मूग व उडिदाची शासकीय खरेदी केंद्र सुरू केली नाहीत. ते त्वरित सुरू करावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगाव रेल्वे