शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

निर्णयक्षमता असलेला धडाकेबाज नेता हरपला

By admin | Updated: December 2, 2014 22:57 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठनेते बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे मंगळवारी मुंबई येथील रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते मुख्यमंत्री असलेल्या कार्यकाळात त्यांच्या

प्रतिक्रिया : बॅरि. अंतुलेसोबत अमरावतीतील अनेकांचा स्रेहाचा संबधअमरावती: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठनेते बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे मंगळवारी मुंबई येथील रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते मुख्यमंत्री असलेल्या कार्यकाळात त्यांच्या सोबतीने काम केलेल्या जिल्ह्यातील गणमान्य व्यक्तींच्या प्रतिक्रिया ‘लोकमत’ने जाणून घेतल्या. महाराष्ट्राने एक अभ्यासू आणि प्रचंड निर्णयक्षमता असलेला धडाकेबाज नेता गमावल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.डायनामिक मुख्यमंत्री होते : भैयासाहेब ठाकूरबॅरि. अंतुले हे महाराष्ट्राला लाभलेले डायनामिक मुख्यमंत्री होते. दिलेला शब्द ते पाळायचे मग त्याची कितीही किंमत मोजावी लागली तरी त्याची पर्वा नव्हती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात मी आमदार होतो. धडाडीचा आणि हमखास निर्णय घेणारा असा नेता गेल्याने समाजाची आणि देशाची मोठी हाणी झाली, अशी प्रतिक्रिया माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांनी दिली.समस्यांची जाण असलेला नेता हरपला : वसुधा देशमुखबॅरि. अंतुले यांनी विदर्भातील लहान गावांना तालुक्याचा दर्जा दिल्यानेच विदर्भाचा विकास साधता आला. शहिदांचा त्यांनी सन्मान केला. प्रत्येक शहिदांच्या गावात त्यांचे स्मारक व वाचनालये सुरु केलीत. निराधारांना न्याय देण्यासाठी संजय गांधी योजना अंमलात आणली. त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळातच मला पाणीपुरवठा मंडळाचे अध्यक्षपद देऊन अमरावतीतील पाणी समस्या निकाली काढली. तळागाळातील जनतेच्या समस्यांची जाण असणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया माजीमंत्री वसुधा देशमुख यांनी दिली.क्रांतिकारक मुख्यमंत्री होते : यशवंतराव शेरेकरबॅरि. अंतुले हे महाराष्ट्राला लाभलेले क्रांतिकारक मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक लोकपयोगी क्रांतिकारक निर्णय घेतले. एवढ्यावरच न थांबता ते अंमलातही आणलेत. इंदिरा गांधी यांच्या संकटकाळी त्यांनी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात संजीवनी दिली. फाटका माणूसही त्यांच्याकडे काम घेऊन गेला तर ते तातडीने त्याचे काम करायचे. अशा नेत्यासोबत आमदार व मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्ष व देशाची हाणी झाली, अशी प्रतिक्रिया माजीमंत्री यशवंतराव शेरेकर यांनी दिली.महाराष्ट्रातील कर्तबगार नेतृत्व -सुरेंद्र भुयारबॅरि. अंतुले हे महाराष्ट्रातील कर्तबगार नेतृत्व होते. त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकिर्द अतिशय चांगली राहिली. विदर्भ विकासाबाबत त्यांनी अनेक निर्णय घेतले. गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना त्यांनी अंमलात आणल्या. त्यांच्या कार्यकाळात आमदार म्हणून मला अनेक चांगले अनुभव आले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हाणी झाली, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सुरेंद्र भुयार यांनी दिली.काँग्रेस पक्षात पोकळी झाली-बबलू देशमुखबॅरि. अंतुले यांच्या निधनाने काँग्रेस पक्षात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी सामान्य जनतेसाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. ते काँग्रेस पक्षाचे सच्चे पाईक होते. त्यांच्या निधनाने जिल्हा काँग्रेस कमिटीत शोककळा पसरली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली.