शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

डिसेंबरमध्ये मुंबई रेल्वे प्रवासात उडणार गोंधळ

By admin | Updated: November 27, 2015 00:34 IST

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी राहणार आहे.

विशेष गाडी सोडण्याची मागणी : चैत्यभूमीवर ये- जा करणाऱ्यांची गर्दी

अमरावती : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी राहणार आहे. त्यामुळे १ ते १० डिसेंबरदरम्यान मुंबई रेल्वे प्रवासात गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, या आशयाची मागणी रिपाइंचे महानगर उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी केली आहे.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, खासदार आनंदराव अडसूळ, मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाप्रबंधक, भुसावळ आणि नागपूर विभागाचे प्रबंधकांना निवेदन सादर करुन विदर्भातील आंबेडकरी अनुयायांची अभिवादनासाठी उसळणाऱ्या गर्दीबाबतची वस्तुस्थिती रिपाइंचे अशोक नंदागवळी यांनी मांडलीे. बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी महिला, पुरुषांसह आबालवृद्धाचाही समावेश राहतो. आंबेडकरी अनुयायांची या काळात होणाऱ्या गर्दीमुळे नियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ज्या प्रवाशांचे आरक्षण असताना त्यांना सुखरुप प्रवास करता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांची दादर येथील चैत्यभूमिवर होणारी गर्दी लक्षात घेता यंदा १ ते १० डिसेंबर या कालावधीत मुंबई ये- जा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची सोय करावी, असे नंदागवळी यांचे म्हणने आहे. नागपूर आणि अमरावती रेल्वे स्थानकावरुन या १० दिवसांच्या कालावधीत किमान चार विशेष गाड्या सोडल्या तर नियमीत प्रवाशांना त्रास होणार नाही. अन्यथा मुंबईकडे ये- जा करणाऱ्या प्रवाशांना १ ते १० डिसेंबर या कालावधीत प्रचंड त्रास घेवून प्रवास करावा लागेल. रेल्वे गाड्यात आरक्षण असताना नियमीत प्रवाशांना त्यांच्या आरक्षित जागेवर प्रवास करता येत नाही. (प्रतिनिधी)