शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

डिसेंबरमध्ये मुंबई रेल्वे प्रवासात उडणार गोंधळ

By admin | Updated: November 27, 2015 00:34 IST

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी राहणार आहे.

विशेष गाडी सोडण्याची मागणी : चैत्यभूमीवर ये- जा करणाऱ्यांची गर्दी

अमरावती : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी राहणार आहे. त्यामुळे १ ते १० डिसेंबरदरम्यान मुंबई रेल्वे प्रवासात गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, या आशयाची मागणी रिपाइंचे महानगर उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी केली आहे.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, खासदार आनंदराव अडसूळ, मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाप्रबंधक, भुसावळ आणि नागपूर विभागाचे प्रबंधकांना निवेदन सादर करुन विदर्भातील आंबेडकरी अनुयायांची अभिवादनासाठी उसळणाऱ्या गर्दीबाबतची वस्तुस्थिती रिपाइंचे अशोक नंदागवळी यांनी मांडलीे. बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी महिला, पुरुषांसह आबालवृद्धाचाही समावेश राहतो. आंबेडकरी अनुयायांची या काळात होणाऱ्या गर्दीमुळे नियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ज्या प्रवाशांचे आरक्षण असताना त्यांना सुखरुप प्रवास करता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांची दादर येथील चैत्यभूमिवर होणारी गर्दी लक्षात घेता यंदा १ ते १० डिसेंबर या कालावधीत मुंबई ये- जा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची सोय करावी, असे नंदागवळी यांचे म्हणने आहे. नागपूर आणि अमरावती रेल्वे स्थानकावरुन या १० दिवसांच्या कालावधीत किमान चार विशेष गाड्या सोडल्या तर नियमीत प्रवाशांना त्रास होणार नाही. अन्यथा मुंबईकडे ये- जा करणाऱ्या प्रवाशांना १ ते १० डिसेंबर या कालावधीत प्रचंड त्रास घेवून प्रवास करावा लागेल. रेल्वे गाड्यात आरक्षण असताना नियमीत प्रवाशांना त्यांच्या आरक्षित जागेवर प्रवास करता येत नाही. (प्रतिनिधी)