शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठन मृगजळच !

By admin | Updated: July 1, 2015 00:34 IST

शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असला

शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग : मागील वर्षीच्या कर्जदारांचेच कर्जात रुपांतरजितेंद्र दखने अमरावतीशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी फारसे काही पडले नाही. याबाबत साशंकताच आहे. कारण जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार ८२७ शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख ३८ हजार ७६१ शेतकरी हे मागील पाच वर्र्षांपासून थकबाकीदार आहेत. याबाबत प्रशासन म्हणण्यानुसार, कर्जाचे पुनर्गठन हे मागील वर्षीच्या कर्जदार शेतकऱ्यांचेच होईल. त्यापूर्वीच्या नाही. त्यामुळे व शासनाकडून पुनर्गठनासाठी मंजूर व वाटप करण्यात येणाऱ्या रकमेतही फरक असून अद्याप तब्बल ५० टक्के रक्कम अपाप्त असल्याने अनेक शेतकरी वंचित राहण्याचीच शक्यता आहे. शासनाने कर्ज पुनर्गठणासाठी अमरावती जिल्ह्यासाठी १६९५.४४ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. थकीत रक्कम द्यावी५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी स्वरुपात ३९४ कोटी रुपये देण्याचे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. सोबतच २०१४ मधील नैसर्गिक आपत्तीने बाधित मदतीपैकी ४० टक्केच मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे उर्वरित ६० टक्के रक्कम देण्यात यावी. अर्ज करणे आवश्यक कर्ज रूपांतरणासाठी संबंधित बँकेकडे शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बँकेशी करार करून दिल्यानंतरच कर्ज पुनर्गठन आणि त्यानंतर नवीन कर्जाची उचल शेतकऱ्यांना करता येणार आहे. कर्जाची परतफेड पाच वार्षिक हप्त्यांत करावी लागणार आहे. यापैकी पहिला हप्ता ३० जून २०१५ ला देय राहणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.थकीत कर्जदारांनाच खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. पण त्यांनाच कर्ज मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. त्याचा सातबारा कोरा करुन नव्याने कर्ज द्यावे. - प्रवीण काडगाळे,शेतकरी.रिझर्व्ह बँकेने सरसकट कर्ज वाटपाची सूचना दिल्यास आदेशानुसार बँकांना सूचना देता येईल. मात्र सध्या रिझर्व बँकेच्या जुन्या सूचनेनुसार कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. अनंत खोरगडे, जिल्हा अग्रणी बँक.मागील वर्षी ज्यांनी कर्ज घेतले अशा चालू खातेदारांचेच कर्ज पुनगर्ठन होणार आहे. त्यांना मागील व यंदाचे मिळून कर्ज फेडावे लागेल. आत्महत्येची नोंद झालेल्या लाभ मिळेल. सुरेश बगळे, तहसीलदार.