शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे स्वनिधीतून कर्जवाटप

By admin | Updated: July 19, 2016 00:17 IST

राज्य शासनाकडून कर्जाचा पुरवठा न झाल्याने जिल्ह्यातील कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये,

अंमलबजावणी सुरू : १५ शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण अमरावती: राज्य शासनाकडून कर्जाचा पुरवठा न झाल्याने जिल्ह्यातील कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, याकरिता जिल्हा मध्यवर्ती सहसारी बँकेने स्वनिधीतून कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सोमवारी बँकेच्या मुख्य शाखेत जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांना अर्ज पुनर्गठणाचे धनादेश बॅकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आले आहेत.जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी अडचणीत मदतीचा हात दिला आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचा भार कायम आहे. शेतकऱ्यांना शासनाने कर्ज माफी द्यावी, यासाठी सतत मागणी शासन दरबारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली. परंतु शासनाने कर्ज माफी न देता कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले. परिणामी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी करण्यात आल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. कुठलाही शेतकरी कर्जवाटपासून वंचित राहू नये. परिणामी वंचित शेतकऱ्यांचा पेरणीचा हंगाम निघून जाऊ नये याकरिता जिल्हा बँकेच्या स्वनिधीतून कर्जवाटपाचा निर्णय बँक व्यवस्थापनाने घेतला. बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख, बँकेचे संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठनाचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये अमोल जहाकर, भैया चौधरी, प्रदीप गतफणे, ज्ञानेश्र्वर चौधरी, श्रीकृष्ण कडू, ज्ञानेश्र्वर भारती, प्रणिता भारती, रमाकांत चोरपगार, ज्ञानेश्र्वर कुऱ्हेकर, प्रकाश यादगिरे, शाम अंबुलकर, आदी शेतकऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष अनंत साबळे, संचालक पी.बी. काळबांडे, सुधाकर भारसाकळे, प्रवीण काशिकर, पी.एन.निमकर, एस.टी. देशमुख, जे.डी.पटेल, संजय वानखडे, डी.एस. काळे, पी.बी. अलोणे, एस. जे. पावडे, बँक अधिकारी जे.सी.राठोड, डी.एस. आलेणे,डी. बी. देशमुख, एस के. चारथळ, सुभाष पाथरे उपस्थित होते.(प्रतिनिधी)