शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्हा बँकेचे स्वनिधीतून कर्जवाटप

By admin | Updated: July 19, 2016 00:17 IST

राज्य शासनाकडून कर्जाचा पुरवठा न झाल्याने जिल्ह्यातील कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये,

अंमलबजावणी सुरू : १५ शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण अमरावती: राज्य शासनाकडून कर्जाचा पुरवठा न झाल्याने जिल्ह्यातील कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, याकरिता जिल्हा मध्यवर्ती सहसारी बँकेने स्वनिधीतून कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सोमवारी बँकेच्या मुख्य शाखेत जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांना अर्ज पुनर्गठणाचे धनादेश बॅकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आले आहेत.जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी अडचणीत मदतीचा हात दिला आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचा भार कायम आहे. शेतकऱ्यांना शासनाने कर्ज माफी द्यावी, यासाठी सतत मागणी शासन दरबारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली. परंतु शासनाने कर्ज माफी न देता कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले. परिणामी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी करण्यात आल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. कुठलाही शेतकरी कर्जवाटपासून वंचित राहू नये. परिणामी वंचित शेतकऱ्यांचा पेरणीचा हंगाम निघून जाऊ नये याकरिता जिल्हा बँकेच्या स्वनिधीतून कर्जवाटपाचा निर्णय बँक व्यवस्थापनाने घेतला. बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख, बँकेचे संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठनाचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये अमोल जहाकर, भैया चौधरी, प्रदीप गतफणे, ज्ञानेश्र्वर चौधरी, श्रीकृष्ण कडू, ज्ञानेश्र्वर भारती, प्रणिता भारती, रमाकांत चोरपगार, ज्ञानेश्र्वर कुऱ्हेकर, प्रकाश यादगिरे, शाम अंबुलकर, आदी शेतकऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष अनंत साबळे, संचालक पी.बी. काळबांडे, सुधाकर भारसाकळे, प्रवीण काशिकर, पी.एन.निमकर, एस.टी. देशमुख, जे.डी.पटेल, संजय वानखडे, डी.एस. काळे, पी.बी. अलोणे, एस. जे. पावडे, बँक अधिकारी जे.सी.राठोड, डी.एस. आलेणे,डी. बी. देशमुख, एस के. चारथळ, सुभाष पाथरे उपस्थित होते.(प्रतिनिधी)