शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

दोन सख्ख्या चुलत बहिणीचा एकाच वेळी मृत्यू, अन्नातून विषबाधाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 10:18 IST

नंदिनी प्रवीण साव १० वर्ष, चैताली राजेश साव व ११ वर्ष अशा मृत्यू झालेल्या दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचे नाव आहे.

मोहन राऊत

धामणगाव - मुलींवर खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केला प्रकृती ठीक असल्याने रात्रीला घरी आणले मात्र पहाटे दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचा एका दहा मिनिट फरकाने मृत्यू झाल्याने संपूर्ण  वीरूळ रोंघे गाव हळहळले आहे. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन या घटनेमागील शोध घेत आहे. याच दरम्यान अन्नातून झालेल्या विषबाधामुळे हा प्रकार घडली असावी असा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

नंदिनी प्रवीण साव १० वर्ष, चैताली राजेश साव व ११ वर्ष अशा मृत्यू झालेल्या दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचे नाव आहे. चैताली ही गावातील माधवराव वानखडे विद्यालयात इयत्ता पाचवी शिक्षण घेत होती तर नंदिनी प्राथमिक मराठी जि. प. शाळेत इयत्ता चौथा वर्गात होती नंदिनी काल गुरुवारी शाळेत गेली नाही तर चैताली ही नेहमीप्रमाणे सकाळ सत्रात असलेल्या शाळेत गेली होती. दुपारी दोघी सख्ख्या चुलत बहिणी एकत्र खेळल्या मात्र अचानकपणे दोघींनाही पोटात दुखणे, ताप व हगवण लागल्याने धामणगाव रेल्वे येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दोघीची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी नेण्यात आली. मात्र अचानक रात्रीला दोघींची  प्रकृती बिघडली व पहाटे नंदिनी व चैताली यांच्या अवघ्या दहा मिनिटाच्या फरकाने मृत्यू झाला.

दोन सख्ख्या बहीण भावावर केलेले उपचारमृतक नंदिनीची मोठी बहीण भक्ती  वय १३ वर्ष व मृतक चैतालीचा लहान भाऊ देवांश  वय ३ वर्ष यांना रात्रीला पोटात दुखू लागल्याने दोघांनाही शुक्रवारी पहाटे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली.

विषबाधा झाल्याचा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाजविरूळ रोंघे  गावात एकाच घरा शेजारी  राहणाऱ्या साव कुटुंबातील  दोन्ही मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते असा प्राथमिक अंदाज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य विभागाने येथे तपासणी शिबिर लावण्यात आले आहे.  मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रा. प सदस्य मंगेश गुल्हाने यांनी केली आहे दरम्यान महसूल, पोलिस, आरोग्य प्रशासन  घटनास्थळी दाखल झाले आहे. दोन्ही मुलीचां मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शव विच्छेदानंतर उलगडा होणार आहे.संपूर्ण गाव हळहळले शेत मजुरीचे काम करणाऱ्या साव कुटुंबातील नंदिनी व चैताली या दोन्ही मुली जेवढ्या शांत तेवढ्या हुशार होत्या याच वर्षी चैताली ही पाचव्या वर्गात प्रवेश घेतला होता. तर नंदिनी ही चौथ्या वर्गात शिकत होती सख्या चुलत बहिणीचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळले आहे.