शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दोन सख्ख्या चुलत बहिणीचा एकाच वेळी मृत्यू, अन्नातून विषबाधाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 10:18 IST

नंदिनी प्रवीण साव १० वर्ष, चैताली राजेश साव व ११ वर्ष अशा मृत्यू झालेल्या दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचे नाव आहे.

मोहन राऊत

धामणगाव - मुलींवर खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केला प्रकृती ठीक असल्याने रात्रीला घरी आणले मात्र पहाटे दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचा एका दहा मिनिट फरकाने मृत्यू झाल्याने संपूर्ण  वीरूळ रोंघे गाव हळहळले आहे. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन या घटनेमागील शोध घेत आहे. याच दरम्यान अन्नातून झालेल्या विषबाधामुळे हा प्रकार घडली असावी असा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

नंदिनी प्रवीण साव १० वर्ष, चैताली राजेश साव व ११ वर्ष अशा मृत्यू झालेल्या दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचे नाव आहे. चैताली ही गावातील माधवराव वानखडे विद्यालयात इयत्ता पाचवी शिक्षण घेत होती तर नंदिनी प्राथमिक मराठी जि. प. शाळेत इयत्ता चौथा वर्गात होती नंदिनी काल गुरुवारी शाळेत गेली नाही तर चैताली ही नेहमीप्रमाणे सकाळ सत्रात असलेल्या शाळेत गेली होती. दुपारी दोघी सख्ख्या चुलत बहिणी एकत्र खेळल्या मात्र अचानकपणे दोघींनाही पोटात दुखणे, ताप व हगवण लागल्याने धामणगाव रेल्वे येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दोघीची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी नेण्यात आली. मात्र अचानक रात्रीला दोघींची  प्रकृती बिघडली व पहाटे नंदिनी व चैताली यांच्या अवघ्या दहा मिनिटाच्या फरकाने मृत्यू झाला.

दोन सख्ख्या बहीण भावावर केलेले उपचारमृतक नंदिनीची मोठी बहीण भक्ती  वय १३ वर्ष व मृतक चैतालीचा लहान भाऊ देवांश  वय ३ वर्ष यांना रात्रीला पोटात दुखू लागल्याने दोघांनाही शुक्रवारी पहाटे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली.

विषबाधा झाल्याचा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाजविरूळ रोंघे  गावात एकाच घरा शेजारी  राहणाऱ्या साव कुटुंबातील  दोन्ही मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते असा प्राथमिक अंदाज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य विभागाने येथे तपासणी शिबिर लावण्यात आले आहे.  मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रा. प सदस्य मंगेश गुल्हाने यांनी केली आहे दरम्यान महसूल, पोलिस, आरोग्य प्रशासन  घटनास्थळी दाखल झाले आहे. दोन्ही मुलीचां मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शव विच्छेदानंतर उलगडा होणार आहे.संपूर्ण गाव हळहळले शेत मजुरीचे काम करणाऱ्या साव कुटुंबातील नंदिनी व चैताली या दोन्ही मुली जेवढ्या शांत तेवढ्या हुशार होत्या याच वर्षी चैताली ही पाचव्या वर्गात प्रवेश घेतला होता. तर नंदिनी ही चौथ्या वर्गात शिकत होती सख्या चुलत बहिणीचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळले आहे.