शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शासन खरेदी केंद्रावर मरण यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:29 IST

बाजार समितीमध्ये शेतकºयांचा मालाचा दर्जा निकृष्ट ठरविण्याचा प्रकार नाफेडचे अधिकारी करीत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचा आंदोलनाचा इशारा : बाजार समिती, खरेदी विक्री संघाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : बाजार समितीमध्ये शेतकºयांचा मालाचा दर्जा निकृष्ट ठरविण्याचा प्रकार नाफेडचे अधिकारी करीत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला आहे. दुसरीकडे बाजार समितीचे पदाधिकारीदेखील बाजार समितीच्या या कारभाराला कंटाळले आहेत. नाफेडच्या या मनमानी कारभारविरुद्ध शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला असून बाजार समिती व खरेदी विक्री संघानेही त्यास पाठिंबा जाहीर केला आहे.बाजार समितीमध्ये शेतमालाची पाहणी करण्यासाठी नाफेडच्यावतीने ग्रेडर नेमला आहे, तर एक अधिकारी बाजार समितीचा आहे. बाजार समितीचा अधिकारी हा शेतकºयांचा माल तपासणी करून नाफेडच्या ग्रेडरकडे पाठवितो. मात्र, नाफेडचा ग्रेडर माल खराब असल्याचे सांगून रद्द करत आहे. यामुळे शेतकºयांना आपला माल परत घेऊन जावा लागतो किंवा कमी किमतीत व्यापाºयांना विकावा लागतो.बाजार समितीमध्ये शुक्रवारी शेतकरी व नाफेडच्या ग्रेडरमध्ये मालाच्या दर्जावरून तणाव निर्माण झाला. बाजार समितीच्या सभापती बाबाराव बरवट, संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या.आॅनलाईन नोंदणी होणार कशी ?आधारभूत दराने एफएक्यू प्रतिचे मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरू आहे. यासाठी शेतकºयांना मालाची आॅनलाईन नोंदणी करावी लागते. यानंतर एसएमएसच्या माध्यमातून खरेदीबाबतची माहिती देण्यात येते. मात्र, ज्या शेतकºयाला साधा मोबाईल कळत नाहीत, त्यांना एसएमएस कसा कळणार, हादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.असे पाडले जातात भावखरेदी केंद्रावर शेतमाल आणल्यास व मशीनचे तपासणी केल्यावर माल ओला आहे. मालात खडे, माती कचरा आहे. माल बारीक आहे. या सबबी पुढे करून मालाचे भाव पाडले जात आहेत. सोयाबीनला प्रतीक्विंटल १८00 ते २६00 रुपये भाव मिळत आहे. खर्चाच्या तुलनेत हा मिळणारा भाव नगण्यच असल्याने शेतकरी सध्यातरी वैतागले आहे.नाफे डचा ग्रेडर शेतकºयांच्या मालाची तपासणी करतो व तो खराब आहे असेच सांगत आहे, त्यामुळे शेतकºयांना माल विकताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या शेतकºयांजवळ पैशा नसल्याने त्यांना माल विकणे हाच पर्याय आहे. मात्र भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकºयांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला असून आमचाही पाठिंबा त्यांना आहे.- बाळासाहेब हिंगणीकर,संचालक, बाजार समिती दर्यापूर