शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

शासन खरेदी केंद्रावर मरण यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:29 IST

बाजार समितीमध्ये शेतकºयांचा मालाचा दर्जा निकृष्ट ठरविण्याचा प्रकार नाफेडचे अधिकारी करीत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचा आंदोलनाचा इशारा : बाजार समिती, खरेदी विक्री संघाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : बाजार समितीमध्ये शेतकºयांचा मालाचा दर्जा निकृष्ट ठरविण्याचा प्रकार नाफेडचे अधिकारी करीत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला आहे. दुसरीकडे बाजार समितीचे पदाधिकारीदेखील बाजार समितीच्या या कारभाराला कंटाळले आहेत. नाफेडच्या या मनमानी कारभारविरुद्ध शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला असून बाजार समिती व खरेदी विक्री संघानेही त्यास पाठिंबा जाहीर केला आहे.बाजार समितीमध्ये शेतमालाची पाहणी करण्यासाठी नाफेडच्यावतीने ग्रेडर नेमला आहे, तर एक अधिकारी बाजार समितीचा आहे. बाजार समितीचा अधिकारी हा शेतकºयांचा माल तपासणी करून नाफेडच्या ग्रेडरकडे पाठवितो. मात्र, नाफेडचा ग्रेडर माल खराब असल्याचे सांगून रद्द करत आहे. यामुळे शेतकºयांना आपला माल परत घेऊन जावा लागतो किंवा कमी किमतीत व्यापाºयांना विकावा लागतो.बाजार समितीमध्ये शुक्रवारी शेतकरी व नाफेडच्या ग्रेडरमध्ये मालाच्या दर्जावरून तणाव निर्माण झाला. बाजार समितीच्या सभापती बाबाराव बरवट, संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या.आॅनलाईन नोंदणी होणार कशी ?आधारभूत दराने एफएक्यू प्रतिचे मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरू आहे. यासाठी शेतकºयांना मालाची आॅनलाईन नोंदणी करावी लागते. यानंतर एसएमएसच्या माध्यमातून खरेदीबाबतची माहिती देण्यात येते. मात्र, ज्या शेतकºयाला साधा मोबाईल कळत नाहीत, त्यांना एसएमएस कसा कळणार, हादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.असे पाडले जातात भावखरेदी केंद्रावर शेतमाल आणल्यास व मशीनचे तपासणी केल्यावर माल ओला आहे. मालात खडे, माती कचरा आहे. माल बारीक आहे. या सबबी पुढे करून मालाचे भाव पाडले जात आहेत. सोयाबीनला प्रतीक्विंटल १८00 ते २६00 रुपये भाव मिळत आहे. खर्चाच्या तुलनेत हा मिळणारा भाव नगण्यच असल्याने शेतकरी सध्यातरी वैतागले आहे.नाफे डचा ग्रेडर शेतकºयांच्या मालाची तपासणी करतो व तो खराब आहे असेच सांगत आहे, त्यामुळे शेतकºयांना माल विकताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या शेतकºयांजवळ पैशा नसल्याने त्यांना माल विकणे हाच पर्याय आहे. मात्र भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकºयांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला असून आमचाही पाठिंबा त्यांना आहे.- बाळासाहेब हिंगणीकर,संचालक, बाजार समिती दर्यापूर