शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

उपचाराअभावी शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: November 10, 2014 22:35 IST

नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली.

अमरावती : नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. याप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सोमवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. तसेच मृतदेहही आरोग्य केंद्रासमोर ठेवला होता.शिराळा येथील सुरेश शंकरराव समरीत (४५), असे मृताचे नाव आहे. केवळ दीड एकर शेती असलेल्या सुरेश समरीत यांना यावर्षी एकरी एक पोते सोयाबीन झाले. पीक पेरणीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. परंतु उत्पादन न झाल्याने हताश झालेल्या सुरेशने राहत्या घरी रविवारी सायंकाळी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने शिराळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. परंतु आरोग्य केंद्रात वैद्यकीय अनुपस्थित होते. याचवेळी पंचायत समिती सदस्य राजू गंधे येथे पोहोचले. त्यांनी लगेच वैद्यकीय अधिकारी भगत यांच्याशी संपर्क साधला. परंतु आता ड्युटी डॉ. चव्हाण यांची असल्याची माहिती भगत यांनी दिली. त्यामुळे चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही आपली ड्युटी नसून सध्या पुलगाव येथे असल्याचे पंचायत समिती सदस्य गंधे यांना दूरध्वनीवरुन सांगितले.एक तास हा घटनाक्रम सुरु असताना विष प्राशन केलेला शेतकरी सुरेश समरीत यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्यांना उपचार मिळावे म्हणून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी शवविच्छेदनानंतर दुपारी १२ वाजता मृतदेह शिराळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आणून ठेवला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नापिकीने त्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली होती. तब्बल चार तास मृतदेह आरोग्य केंद्रात ठेवला होता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी एन. एन. भालेराव यांनी येथे भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आपल्या मागण्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी यांच्यापर्यंत पोहोचून तेच आरोग्य उपसंचालकाकडे प्रस्ताव पाठवितील, असे आश्वासन दिले. परंतु संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहिल, अशी भूमिका आंदोलनाचे नेतृत्व करणारे पंचायत समिती सदस्य राजू गंधे यांनी घेतली होती. वृत्तलिहिस्तोवर आंदोलन सुरुच होते.या आंदोलनात जयंत आमले, प्रकाश अजमिरे, मुसाफीर खाँ पठाण, पद्माकर हटवार, रईस खॉ पठाण, प्रभाकर भागवत, प्रल्हाद गभने आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.