शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

उपचाराअभावी शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: November 10, 2014 22:35 IST

नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली.

अमरावती : नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. याप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सोमवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. तसेच मृतदेहही आरोग्य केंद्रासमोर ठेवला होता.शिराळा येथील सुरेश शंकरराव समरीत (४५), असे मृताचे नाव आहे. केवळ दीड एकर शेती असलेल्या सुरेश समरीत यांना यावर्षी एकरी एक पोते सोयाबीन झाले. पीक पेरणीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. परंतु उत्पादन न झाल्याने हताश झालेल्या सुरेशने राहत्या घरी रविवारी सायंकाळी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने शिराळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. परंतु आरोग्य केंद्रात वैद्यकीय अनुपस्थित होते. याचवेळी पंचायत समिती सदस्य राजू गंधे येथे पोहोचले. त्यांनी लगेच वैद्यकीय अधिकारी भगत यांच्याशी संपर्क साधला. परंतु आता ड्युटी डॉ. चव्हाण यांची असल्याची माहिती भगत यांनी दिली. त्यामुळे चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही आपली ड्युटी नसून सध्या पुलगाव येथे असल्याचे पंचायत समिती सदस्य गंधे यांना दूरध्वनीवरुन सांगितले.एक तास हा घटनाक्रम सुरु असताना विष प्राशन केलेला शेतकरी सुरेश समरीत यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्यांना उपचार मिळावे म्हणून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी शवविच्छेदनानंतर दुपारी १२ वाजता मृतदेह शिराळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आणून ठेवला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नापिकीने त्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली होती. तब्बल चार तास मृतदेह आरोग्य केंद्रात ठेवला होता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी एन. एन. भालेराव यांनी येथे भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आपल्या मागण्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी यांच्यापर्यंत पोहोचून तेच आरोग्य उपसंचालकाकडे प्रस्ताव पाठवितील, असे आश्वासन दिले. परंतु संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहिल, अशी भूमिका आंदोलनाचे नेतृत्व करणारे पंचायत समिती सदस्य राजू गंधे यांनी घेतली होती. वृत्तलिहिस्तोवर आंदोलन सुरुच होते.या आंदोलनात जयंत आमले, प्रकाश अजमिरे, मुसाफीर खाँ पठाण, पद्माकर हटवार, रईस खॉ पठाण, प्रभाकर भागवत, प्रल्हाद गभने आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.