शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

डेडलाईन संपली २७ टक्केच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:21 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना ३० सप्टेंबर या ‘डेडलाईन’पूर्वी केवळ ४१ हजार ११३ शेतकºयांना ४२६ कोटी ९२ लाखांचे वाटप केले.

ठळक मुद्देबँकांचा खो : खरिपाच्या ११०० कोटींचे कर्जवाटपच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना ३० सप्टेंबर या ‘डेडलाईन’पूर्वी केवळ ४१ हजार ११३ शेतकºयांना ४२६ कोटी ९२ लाखांचे वाटप केले. ही केवळ २७ टक्केवारी आहे. अद्याप १,१६६ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या घोळात बँकांनी शेतकºयांना माघारी धाडत खरिपाचे कर्जवाटप गुडांळल्याचे वास्तव आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात दोन लाख ४१ हजार ४१० शेतकरी पात्र होते. हे नियमित व नवीन खातेदार वगळता उर्वरित शेतकरी थकबाकीदार असल्याने त्यांना बँकांनी कर्ज नाकारले. मात्र जे शेतकरी पात्र होते त्यांनाही बँकांनी कर्ज दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी बँकांना यंदापेक्षा अधिक २,१४५ कोटी ६८ लाखांचे लक्ष्यांक असताना एक लाख ६५ हजार ६३७ शेतकºयांना १,४१२ कोटी ८२ लाख रूपयांचे कर्जवाटप केले. ही ६६ टक्केवारी आहे. यंदा मात्र हंगामाच्या सुरूवातीपासूनच कर्जवाटपास बँकांची नकारघंटा होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे.राज्य शासनाद्वारा यंदा जूनअखेर शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांचा कर्ज वाटपाचा टक्का माघारला. एकीकडे शेतकºयांना बँकाद्वांरा खरिपाचे कर्जवाटप करण्यात आलेले नाही, तर दुसरीकडे तीन महिन्यांपासून कर्जमाफीचा घोळ अजून निस्तरला नाही. अजूनही २०० वर गावांत चावडीवाचन झालेले नाही. त्यामुळे शेतकºयांची कर्जमाफी यंदाच्या वर्षात होणार की नाही, याबाबत शंकाच आहे. मात्र शासनस्तरावरील घोळाचा नेमका फायदा घेत बँकांनी खरिपाच्या अंतिम मुदतीपर्यंत केवळ २७ टक्क्यांवरच वाटप गुंडाळले. या बँकांवर शासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.असे आहे खरिपासाठी बँकांचे कर्जवाटपयंदाच्या खरिपासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना १,०६२ कोटी ६ लाख रूपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात २४६ कोटी ३६ लाख रूपयांचे कर्जवाटप केले, ही २३ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना १३ कोटी ८८ लाख रूपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात दोन कोटी ८० लाख रूपयांचे कर्जवाटप केले, ही २० टक्केवारी आहे. जिल्हा बँकेला ५१६ कोटी ६० लाख रूपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना १७७ कोटी २३ लाख रूपयांचे कर्ज वाटप केलेले आहेत, ही ३४ टक्केवारी आहे.