शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डेडलाईन संपली २७ टक्केच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:21 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना ३० सप्टेंबर या ‘डेडलाईन’पूर्वी केवळ ४१ हजार ११३ शेतकºयांना ४२६ कोटी ९२ लाखांचे वाटप केले.

ठळक मुद्देबँकांचा खो : खरिपाच्या ११०० कोटींचे कर्जवाटपच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना ३० सप्टेंबर या ‘डेडलाईन’पूर्वी केवळ ४१ हजार ११३ शेतकºयांना ४२६ कोटी ९२ लाखांचे वाटप केले. ही केवळ २७ टक्केवारी आहे. अद्याप १,१६६ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या घोळात बँकांनी शेतकºयांना माघारी धाडत खरिपाचे कर्जवाटप गुडांळल्याचे वास्तव आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात दोन लाख ४१ हजार ४१० शेतकरी पात्र होते. हे नियमित व नवीन खातेदार वगळता उर्वरित शेतकरी थकबाकीदार असल्याने त्यांना बँकांनी कर्ज नाकारले. मात्र जे शेतकरी पात्र होते त्यांनाही बँकांनी कर्ज दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी बँकांना यंदापेक्षा अधिक २,१४५ कोटी ६८ लाखांचे लक्ष्यांक असताना एक लाख ६५ हजार ६३७ शेतकºयांना १,४१२ कोटी ८२ लाख रूपयांचे कर्जवाटप केले. ही ६६ टक्केवारी आहे. यंदा मात्र हंगामाच्या सुरूवातीपासूनच कर्जवाटपास बँकांची नकारघंटा होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे.राज्य शासनाद्वारा यंदा जूनअखेर शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांचा कर्ज वाटपाचा टक्का माघारला. एकीकडे शेतकºयांना बँकाद्वांरा खरिपाचे कर्जवाटप करण्यात आलेले नाही, तर दुसरीकडे तीन महिन्यांपासून कर्जमाफीचा घोळ अजून निस्तरला नाही. अजूनही २०० वर गावांत चावडीवाचन झालेले नाही. त्यामुळे शेतकºयांची कर्जमाफी यंदाच्या वर्षात होणार की नाही, याबाबत शंकाच आहे. मात्र शासनस्तरावरील घोळाचा नेमका फायदा घेत बँकांनी खरिपाच्या अंतिम मुदतीपर्यंत केवळ २७ टक्क्यांवरच वाटप गुंडाळले. या बँकांवर शासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.असे आहे खरिपासाठी बँकांचे कर्जवाटपयंदाच्या खरिपासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना १,०६२ कोटी ६ लाख रूपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात २४६ कोटी ३६ लाख रूपयांचे कर्जवाटप केले, ही २३ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना १३ कोटी ८८ लाख रूपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात दोन कोटी ८० लाख रूपयांचे कर्जवाटप केले, ही २० टक्केवारी आहे. जिल्हा बँकेला ५१६ कोटी ६० लाख रूपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना १७७ कोटी २३ लाख रूपयांचे कर्ज वाटप केलेले आहेत, ही ३४ टक्केवारी आहे.