शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
3
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
4
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
5
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
6
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
7
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
8
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
9
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
10
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
11
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
12
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
13
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
14
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
15
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
18
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
19
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
20
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन

शेतकरी अत्याचाराचा तो दिवस आजही स्मृतीत

By admin | Updated: September 5, 2015 00:22 IST

शेतकऱ्यांना भीक नको हवे घामाचे दाम, असे ब्रिद वाक्य घेऊन सतत दोन दिवस चाललेल्या त्या शेतकरी ...

धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांना भीक नको हवे घामाचे दाम, असे ब्रिद वाक्य घेऊन सतत दोन दिवस चाललेल्या त्या शेतकरी अत्याचारांच्या आठवणींना आजही उजाळा मिळत आहे़ दोन शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्यानंतरही त्यावेळी न्याय मिळाला नाही. अखेर शेतकरी आंदोलन शेवटच्या टप्प्यातही यशस्वी ठरले नसल्याची खंत आजही वृध्द शेतकरी व्यक्त करतात़धामणगाव तालुक्यात सन १९९७ मध्ये शेतकरी संघटनेचा मोठा प्रभाव होता़ शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकरी संघटना ही व्याख्या पुढे येताच सर्वसामान्य शेतकरी कोणत्याही आंदोलनात सहभागी होत असे. उत्पादित शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी १२ ते १४ डिासेंबर १९९७ असे तीन दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन छेडून शासनाविरुद्ध संघर्ष केला़ पाहिल्या दिवशी बोरगाव धांदे, देवगाव, उसळगव्हाण, तळेगाव दशासर, राजना, चांदूररेल्वे तर दुसरीकडे अंजनसिंंगी, कुऱ्हा, जुना धामणगाव या रस्त्यावर चक्काजाम करण्यात आला़ परंतु प्रशासनाच्या बेधुंद कारभारामुळे बळीराजाचा आवाज मुंबईच्या राजदरबारापर्यंत पोहोचू शकला नाही़ दुसऱ्या दिवशी चक्काजाम आंदोलन तीव्र करण्यात आले़ नागपूर, औरंगाबाद या राज्य मार्गावरील भातकुली रेणुकापूर हे गाव आंदोलनासाठी निश्चित करून व्यूहरचना आखण्यात आली़तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी भातकुली या गावात पोहोचले ़ दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलनाला सुरूवात झाली़ हजारो शेतकऱ्यांनी आपल्या बैलबंड्या रस्तावर उभ्या केल्यात़ दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाल्याने जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली़ परंतु शेतकऱ्यांनी अधिक आंदोलक पवित्रा घेतला़ मंगरूळ दस्तगीर, दत्तापूर, तळेगाव दशासर येथील पोलिसांनी लाठीमारास सुरूवात केली़ शेतकरी आंदोलनाला पोलीस प्रशासनानेच हिंसक वळण दिले़ हिरपूर येथील प्रमोद जवळकर व राजना येथील गणेश शिंदे हे दोन तरूण शेतकरी या आंदोलनात ठार झाले़ राज्य शासनापर्यंत हे वृत्त पोहोचले असले तरी दोन शेतकऱ्यांचा जीव या आंदोलनात गेला. आजही तालुक्यातील शेतकरी हिरपूर येथील प्रमोद जवळकर यांच्या मार्गावर जाऊन श्रध्दांजली वाहतात व आपल्या संवेदना व्यक्त करतात़