शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

वस्तीतील मोबाईल टॉवर ठरताहेत धोकादायक

By admin | Updated: March 16, 2015 00:21 IST

स्थानिक रहिवाशांचा विरोध असतानाही नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे जुळ्या शहरात मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.

लोकमत विशेषसुनील देशपांडे  अचलपूरस्थानिक रहिवाशांचा विरोध असतानाही नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे जुळ्या शहरात मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. जीवनपुऱ्यातील रहिवाशांनी नगरपालिकेकडे तक्रार केल्यावरही काम थांबले नाही तर ब्राम्हणसभा येथील टॉवर उभारणीच्या कामाबद्दल लोकांनी पालिकेत धाव घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. रायपूरा येथील मोबाईल टॉवर कोसळला होता हे विशेष. जीवनपुऱ्यातील विश्वनाथ धनवंत यांच्या खासगी जागेत नगरपालिकेची परवानगी घेतली नसताना मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. टॉवरच्या पूर्वेकडे माध्यमिक शाळा, उत्तरेकडे खंडेझोड तर दक्षिणेकडे बाहेकर यांचे घर आहे. टॉवरच्या बांधकामासाठी आजूबाजूच्या शेजाऱ्यांची परवानगी न घेता बिनदिक्कतपणे टॉवर उभारले जात आहे. या टॉवरच्या रेडीशनमुळे भविष्यात येथील नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागेल. हे टॉवर मानवी वस्तीपासून दूर एखाद्या शेतात उभारण्यात यावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून बळीराम बाहेकर, दिलीप जिराफे, अमोल माळवे, गणेश मेटकर, अजीजखाँ पठाण, मंदा भारती, नीलेश वऱ्हेकर आदींनी दिला होता. हे निवेदन देऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाल्यावरही टॉवर उभारणीचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. लोकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून २४ जून २०१४ रोजी मुख्याधिकाऱ्यांनी येथील टॉवर उभारणीस परवानगी दिली. उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांच्या पत्रालाही पालिकेने केराची टोपली दाखवून टॉवर उभारणीला अनुमती दर्शविली होती, हे उल्लेखनीय. पर्यावरण संरक्षण कायदा १९६६ नुसार मोबाईल टॉवर उभारण्यासाठी आवश्यक आहे. परंतु हे टॉवर उभारताना हेतूपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. संबंधित अधिकारी आपले हात ओले करून टॉवर उभारणीला मूकसंमती देतात, असे जनतेचे म्हणणे आहे. यापूर्वी रायपुरा येथील विजय टेंभरे यांच्या जागेत मोबाईल टॉवर उभारण्यात आले होते. मागील १७ फेब्रुवारीला हा टॉवर उभारताच पडला होता. सुदैवाने प्राणहानी टळली. तीव्र आंदोलनाचा इशारापरतवाडा येथील ब्राह्मण सभेत मोबाईल टॉवरचा मुद्दा पुन्हा गरम झाला. येथील मोबाईल टॉवर उभारणीचे काम स्थानिक रहिवाशांचा विरोध झुगारून सुरू आहे. लोकांनी हे काम बंद पाडून नगरपालिकेत धाव घेतली होती. पुन्हा काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान काही विपरीत घडल्यास मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा श्याम क्षीरसागर, अतुल देशमुख, रवी पिदडी, किशोर कासार, वानखडे, नशिबकर यांनी दिला आहे. जे मोबाईल टॉवर अवैध आहेत त्यांना आम्ही नोटीसी बजावली आहेत. नोटीसला ते जुमानत नसतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करू.- धनंजय जावळीकरमुख्याधिकारी, अचलपूर न. प.