शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वस्तीतील मोबाईल टॉवर ठरताहेत धोकादायक

By admin | Updated: March 16, 2015 00:21 IST

स्थानिक रहिवाशांचा विरोध असतानाही नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे जुळ्या शहरात मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.

लोकमत विशेषसुनील देशपांडे  अचलपूरस्थानिक रहिवाशांचा विरोध असतानाही नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे जुळ्या शहरात मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. जीवनपुऱ्यातील रहिवाशांनी नगरपालिकेकडे तक्रार केल्यावरही काम थांबले नाही तर ब्राम्हणसभा येथील टॉवर उभारणीच्या कामाबद्दल लोकांनी पालिकेत धाव घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. रायपूरा येथील मोबाईल टॉवर कोसळला होता हे विशेष. जीवनपुऱ्यातील विश्वनाथ धनवंत यांच्या खासगी जागेत नगरपालिकेची परवानगी घेतली नसताना मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. टॉवरच्या पूर्वेकडे माध्यमिक शाळा, उत्तरेकडे खंडेझोड तर दक्षिणेकडे बाहेकर यांचे घर आहे. टॉवरच्या बांधकामासाठी आजूबाजूच्या शेजाऱ्यांची परवानगी न घेता बिनदिक्कतपणे टॉवर उभारले जात आहे. या टॉवरच्या रेडीशनमुळे भविष्यात येथील नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागेल. हे टॉवर मानवी वस्तीपासून दूर एखाद्या शेतात उभारण्यात यावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून बळीराम बाहेकर, दिलीप जिराफे, अमोल माळवे, गणेश मेटकर, अजीजखाँ पठाण, मंदा भारती, नीलेश वऱ्हेकर आदींनी दिला होता. हे निवेदन देऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाल्यावरही टॉवर उभारणीचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. लोकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून २४ जून २०१४ रोजी मुख्याधिकाऱ्यांनी येथील टॉवर उभारणीस परवानगी दिली. उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांच्या पत्रालाही पालिकेने केराची टोपली दाखवून टॉवर उभारणीला अनुमती दर्शविली होती, हे उल्लेखनीय. पर्यावरण संरक्षण कायदा १९६६ नुसार मोबाईल टॉवर उभारण्यासाठी आवश्यक आहे. परंतु हे टॉवर उभारताना हेतूपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. संबंधित अधिकारी आपले हात ओले करून टॉवर उभारणीला मूकसंमती देतात, असे जनतेचे म्हणणे आहे. यापूर्वी रायपुरा येथील विजय टेंभरे यांच्या जागेत मोबाईल टॉवर उभारण्यात आले होते. मागील १७ फेब्रुवारीला हा टॉवर उभारताच पडला होता. सुदैवाने प्राणहानी टळली. तीव्र आंदोलनाचा इशारापरतवाडा येथील ब्राह्मण सभेत मोबाईल टॉवरचा मुद्दा पुन्हा गरम झाला. येथील मोबाईल टॉवर उभारणीचे काम स्थानिक रहिवाशांचा विरोध झुगारून सुरू आहे. लोकांनी हे काम बंद पाडून नगरपालिकेत धाव घेतली होती. पुन्हा काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान काही विपरीत घडल्यास मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा श्याम क्षीरसागर, अतुल देशमुख, रवी पिदडी, किशोर कासार, वानखडे, नशिबकर यांनी दिला आहे. जे मोबाईल टॉवर अवैध आहेत त्यांना आम्ही नोटीसी बजावली आहेत. नोटीसला ते जुमानत नसतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करू.- धनंजय जावळीकरमुख्याधिकारी, अचलपूर न. प.