शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये केवळ ३८ टक्के जलसाठा

By जितेंद्र दखने | Updated: July 19, 2024 20:03 IST

हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी विभागातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

अमरावती: पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील अमरावती विभागातील लहान-मोठी धरणे व तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३८.६१ टक्केज,जलसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्प व सिंचन तलावांमध्येही समाधानकारक जलसाठा झालेला नाही.

यंदाच्या पावसाळ्यात सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार काय. यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या आहेत. विभागातील ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५४०.५० दशलक्ष घनमीटर म्हणजे ३८.६१ टक्के जलसाठा झाला असून एकूण २७ मध्यम प्रकल्पांमध्ये ३४९.८२ दलघमी (४५.३३ टक्के), तर २५३ लघुप्रकल्पांमध्ये २२२ दलघमी (२३.९४ टक्के) जलसाठा आहे.

हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी विभागातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सर्व लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा केवळ ३५.८८ टक्के एवढा आहे. गतवर्षी १५ जुलैअखेर मोठ्या प्रकल्पांमध्ये ६११ दलघमी व म्हणजे ४३.६९ टक्के जलसाठा झाला होता तर मध्यम प्रकल्पांमध्ये ३२२ दलघमी म्हणजे ४१.७८ टक्के पाण्याची साठवणूक झाली होती. सर्वच प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत पाच ते दहा टक्के जलसाठा कमी आहे.

विभागातील प्रकल्पातील सद्यःस्थितीअमरावती विभागातील अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या २६६ दलघमी (४७ टक्के), पूस ५३ दलघमी (५८ टक्के), अरुणावती ६१ दलघमी (३६ टक्के), बेंबळा ८३ दलघमी (४५ टक्के), काटेपूर्णा २४ दलघमी (२८ टक्के), वाण २१ दलघमी (२५ टक्के), नळगंगा २२ दलघमी (३२ टक्के), पेनटाकळी ७ दलघमी (१३ टक्के) तर खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती