शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये केवळ ३८ टक्के जलसाठा

By जितेंद्र दखने | Updated: July 19, 2024 20:03 IST

हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी विभागातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

अमरावती: पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील अमरावती विभागातील लहान-मोठी धरणे व तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३८.६१ टक्केज,जलसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्प व सिंचन तलावांमध्येही समाधानकारक जलसाठा झालेला नाही.

यंदाच्या पावसाळ्यात सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार काय. यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या आहेत. विभागातील ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५४०.५० दशलक्ष घनमीटर म्हणजे ३८.६१ टक्के जलसाठा झाला असून एकूण २७ मध्यम प्रकल्पांमध्ये ३४९.८२ दलघमी (४५.३३ टक्के), तर २५३ लघुप्रकल्पांमध्ये २२२ दलघमी (२३.९४ टक्के) जलसाठा आहे.

हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी विभागातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सर्व लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा केवळ ३५.८८ टक्के एवढा आहे. गतवर्षी १५ जुलैअखेर मोठ्या प्रकल्पांमध्ये ६११ दलघमी व म्हणजे ४३.६९ टक्के जलसाठा झाला होता तर मध्यम प्रकल्पांमध्ये ३२२ दलघमी म्हणजे ४१.७८ टक्के पाण्याची साठवणूक झाली होती. सर्वच प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत पाच ते दहा टक्के जलसाठा कमी आहे.

विभागातील प्रकल्पातील सद्यःस्थितीअमरावती विभागातील अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या २६६ दलघमी (४७ टक्के), पूस ५३ दलघमी (५८ टक्के), अरुणावती ६१ दलघमी (३६ टक्के), बेंबळा ८३ दलघमी (४५ टक्के), काटेपूर्णा २४ दलघमी (२८ टक्के), वाण २१ दलघमी (२५ टक्के), नळगंगा २२ दलघमी (३२ टक्के), पेनटाकळी ७ दलघमी (१३ टक्के) तर खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती