शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये केवळ ३८ टक्के जलसाठा

By जितेंद्र दखने | Updated: July 19, 2024 20:03 IST

हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी विभागातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

अमरावती: पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील अमरावती विभागातील लहान-मोठी धरणे व तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३८.६१ टक्केज,जलसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्प व सिंचन तलावांमध्येही समाधानकारक जलसाठा झालेला नाही.

यंदाच्या पावसाळ्यात सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार काय. यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या आहेत. विभागातील ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५४०.५० दशलक्ष घनमीटर म्हणजे ३८.६१ टक्के जलसाठा झाला असून एकूण २७ मध्यम प्रकल्पांमध्ये ३४९.८२ दलघमी (४५.३३ टक्के), तर २५३ लघुप्रकल्पांमध्ये २२२ दलघमी (२३.९४ टक्के) जलसाठा आहे.

हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी विभागातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सर्व लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा केवळ ३५.८८ टक्के एवढा आहे. गतवर्षी १५ जुलैअखेर मोठ्या प्रकल्पांमध्ये ६११ दलघमी व म्हणजे ४३.६९ टक्के जलसाठा झाला होता तर मध्यम प्रकल्पांमध्ये ३२२ दलघमी म्हणजे ४१.७८ टक्के पाण्याची साठवणूक झाली होती. सर्वच प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत पाच ते दहा टक्के जलसाठा कमी आहे.

विभागातील प्रकल्पातील सद्यःस्थितीअमरावती विभागातील अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या २६६ दलघमी (४७ टक्के), पूस ५३ दलघमी (५८ टक्के), अरुणावती ६१ दलघमी (३६ टक्के), बेंबळा ८३ दलघमी (४५ टक्के), काटेपूर्णा २४ दलघमी (२८ टक्के), वाण २१ दलघमी (२५ टक्के), नळगंगा २२ दलघमी (३२ टक्के), पेनटाकळी ७ दलघमी (१३ टक्के) तर खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती