शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सततच्या पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे केव्हा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:04 IST

Amravati : यापूर्वी शासन मदत, यंदा मात्र पडला विसर, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यंत्रणेद्वारा फक्त अतिवृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे करण्यात आले. यापूर्वी २०२२-२३ च्या खरिपात शासनाने सततच्या पावसाने झालेल्या बाधित पिकांचे पंचनामे करून 'एनडीआरएफ'च्या निकषाने मदत दिली होती. यंदा मात्र शासनाला विसर पडला आहे.

यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला, त्यानंतर वाटचाल मंदावली व जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केली ती अजूनही सुरूच आहे. यादरम्यान ३२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. नदी नाल्यांना पूर आल्याने पिके खरडली गेली. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी यंत्रणेद्वारा करण्यात आले. मात्र, दोन महिन्यांपासून सतत पाऊस असल्याने पिकांची वाढ खुंटली काही भागांत पिके पिवळी पडली. ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव व पाऊस यामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. अतिवृष्टी नसली तरी सततच्या पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी येण्याची शक्यता आहे. या बाधित पिकांसाठी शासनस्तरावरून कोणतेही निर्देश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सोयाबीन पिवळे, तुरीवर मर सततच्या पावसामुळे काही भागात सोयाबीनची कायिक वाढ झाली. तर काही भागात वाढ खुंटून पिवळे पडले आहे. अशीच स्थिती कपाशीची आहे. याशिवाय कीड व रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झालेला आहे. तुरीवर बुरशीजन्य रोगामुळे 'मर' रोग आलेला आहे. अनेक भागातील तुरी जागेवरच सुकत असल्याने सरासरी उत्पादनात कमी येणार असल्याचे वास्तव आहे.

जिल्हास्थिती (हेक्टरमध्ये) खरिपाचे पेरणी क्षेत्र : ६.३५ लाख सोयाबीनचे क्षेत्र : २.५१ लाख कपाशीचे क्षेत्र : २.२३ लाख तुरीचे क्षेत्र : १.१२ लाख

अतिवृष्टीच्या नुकसानीपेक्षा बाधित क्षेत्र जास्त जून व जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे ३७५ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी ३२.२८ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त नुकसान सततच्या पावसाने झालेले आहे. या नुकसानीसाठी शासनाच्या कोणत्याही सूचना नाही. शिवाय या बाधित पिकांना विम्याचा परतावादेखील मिळत नाही. 

टॅग्स :Amravatiअमरावती