शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सततच्या पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे केव्हा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:04 IST

Amravati : यापूर्वी शासन मदत, यंदा मात्र पडला विसर, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यंत्रणेद्वारा फक्त अतिवृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे करण्यात आले. यापूर्वी २०२२-२३ च्या खरिपात शासनाने सततच्या पावसाने झालेल्या बाधित पिकांचे पंचनामे करून 'एनडीआरएफ'च्या निकषाने मदत दिली होती. यंदा मात्र शासनाला विसर पडला आहे.

यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला, त्यानंतर वाटचाल मंदावली व जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केली ती अजूनही सुरूच आहे. यादरम्यान ३२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. नदी नाल्यांना पूर आल्याने पिके खरडली गेली. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी यंत्रणेद्वारा करण्यात आले. मात्र, दोन महिन्यांपासून सतत पाऊस असल्याने पिकांची वाढ खुंटली काही भागांत पिके पिवळी पडली. ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव व पाऊस यामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. अतिवृष्टी नसली तरी सततच्या पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी येण्याची शक्यता आहे. या बाधित पिकांसाठी शासनस्तरावरून कोणतेही निर्देश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सोयाबीन पिवळे, तुरीवर मर सततच्या पावसामुळे काही भागात सोयाबीनची कायिक वाढ झाली. तर काही भागात वाढ खुंटून पिवळे पडले आहे. अशीच स्थिती कपाशीची आहे. याशिवाय कीड व रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झालेला आहे. तुरीवर बुरशीजन्य रोगामुळे 'मर' रोग आलेला आहे. अनेक भागातील तुरी जागेवरच सुकत असल्याने सरासरी उत्पादनात कमी येणार असल्याचे वास्तव आहे.

जिल्हास्थिती (हेक्टरमध्ये) खरिपाचे पेरणी क्षेत्र : ६.३५ लाख सोयाबीनचे क्षेत्र : २.५१ लाख कपाशीचे क्षेत्र : २.२३ लाख तुरीचे क्षेत्र : १.१२ लाख

अतिवृष्टीच्या नुकसानीपेक्षा बाधित क्षेत्र जास्त जून व जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे ३७५ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी ३२.२८ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त नुकसान सततच्या पावसाने झालेले आहे. या नुकसानीसाठी शासनाच्या कोणत्याही सूचना नाही. शिवाय या बाधित पिकांना विम्याचा परतावादेखील मिळत नाही. 

टॅग्स :Amravatiअमरावती