शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
4
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
5
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
6
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
7
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
8
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
9
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
10
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
11
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
12
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
13
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
14
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
15
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
16
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
17
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
19
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
20
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

तोड न झाल्यास संत्र्याचे ३०० कोटींवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

सद्यस्थितीत तोडणीला आलेल्या संत्राबागांची विक्री झालेली आहे. दोन ते तीन आठवड्यांत ती संपणार आहे. जिल्ह्यात साडेतीन लाख टन संत्रांचे उत्पादन आहे. यापैकी एक लाख टन संत्रा सद्यस्थितीत झाडावर आहे. तिवसा, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये ३० टक्के म्हणजेच एक लाख टन संत्री सध्या झाडावरच आहेत. याची टेबल परपज व प्रक्रिया १५ ते २० दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यता मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झालेली आहे.

ठळक मुद्देकलम १४४ मध्ये शिथिलता हवी : संत्रा उत्पादकांची पालकमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात मृगबहराचा किमान एक लाख टन संत्रा झाडावर शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात कलम १४४ जारी केलेले आहे. या पार्श्वभूमीवर झाडावरील संत्र्याची दोन आठवड्यात तोड न झाल्यास संत्रा उत्पादकांचे ३०० कोटी रुपयांवर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचारबंदीच्या कायद्यात संत्रा उत्पादकांना शिथिलता देण्याची मागणी राज्य संत्रा उत्पादक संघाद्वारा पालकमंत्र्यांकडे सोमवारी करण्यात आली.सद्यस्थितीत तोडणीला आलेल्या संत्राबागांची विक्री झालेली आहे. दोन ते तीन आठवड्यांत ती संपणार आहे. जिल्ह्यात साडेतीन लाख टन संत्रांचे उत्पादन आहे. यापैकी एक लाख टन संत्रा सद्यस्थितीत झाडावर आहे. तिवसा, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये ३० टक्के म्हणजेच एक लाख टन संत्री सध्या झाडावरच आहेत. याची टेबल परपज व प्रक्रिया १५ ते २० दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यता मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झालेली आहे. एक ट्रक संत्री तोडणीसाठी किमान २० ते २५ मजूर एका बागेत लागतात. त्यामुळे कलम १४४ मध्ये संत्रा उत्पादकांना शिथिलता मिळणे महत्त्वाचे आहे. सिट्रस प्रोसेसिंग इंडस्ट्री नांदेड व जैन फार्मा फ्रेस जळगाव येथे अनुक्रमे २०० ते १५० टन संत्र्यांची ‘इंडस्ट्री ग्रेड’ प्रक्रिया केली जाते. ही दोन्ही कारखाने सुरू राहिल्यास २५ ते ३० टन संत्र्याची प्रक्रिया होईल, त्या दृष्टीने शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी संत्रा उत्पादक संघ वरूडचे उपाध्यक्ष रमेशपंत वडस्कर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.संत्राफळ हे नाशवंत आहे. त्यामुळे देशांतर्गत वाहतुकीमध्ये अडथळा नको, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे.येत्या १५ दिवसांत संत्राझाडावरील शिल्लक राहिलेले एक लाख टन संत्राची काढणी व विल्हेवाट न केल्यास नैसर्गिक व माशीच्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना ३०० कोटींच्यावर नुकसान होऊ शकते, ही बाब संत्रा उत्पादक संघाद्वारा पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणण्यात आली आहे. 'लॉकडाऊन'च्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखाने सुरूच राहतील. कारखाण्यांनी ऊसाचे गाळप करण्यात शिथिलता दिली आहे. मग संत्राबाबत दुजाभाव का, असा संत्रा उत्पादकाचा सवाल आहे.संत्रा उत्पादकांचा प्रश्न तत्काळ सोडवू - पालकमंत्रीमध्यप्रदेश व इतर काही राज्यांत सीमा बंद करण्यात आल्याने संत्रा उत्पादकांना संत्रा नेण्यास अडथळे येत असल्याची तक्रार आहे. ही बाब तत्काळ शासनाच्या निदर्शनास आणली जाईल. जळगाव व नांदेड येथील संत्रा प्रक्रिया युनिटबाबत संत्रा उत्पादकांना येणाऱ्या अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून तत्काळ प्रश्न सोडवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मदर डेअरी दूध संकलन केंद्रांबाबत दुग्ध उत्पादकांच्या मागणीनुसार आवश्यक कार्यवाही व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

टॅग्स :agricultureशेती