शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

तोड न झाल्यास संत्र्याचे ३०० कोटींवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

सद्यस्थितीत तोडणीला आलेल्या संत्राबागांची विक्री झालेली आहे. दोन ते तीन आठवड्यांत ती संपणार आहे. जिल्ह्यात साडेतीन लाख टन संत्रांचे उत्पादन आहे. यापैकी एक लाख टन संत्रा सद्यस्थितीत झाडावर आहे. तिवसा, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये ३० टक्के म्हणजेच एक लाख टन संत्री सध्या झाडावरच आहेत. याची टेबल परपज व प्रक्रिया १५ ते २० दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यता मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झालेली आहे.

ठळक मुद्देकलम १४४ मध्ये शिथिलता हवी : संत्रा उत्पादकांची पालकमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात मृगबहराचा किमान एक लाख टन संत्रा झाडावर शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात कलम १४४ जारी केलेले आहे. या पार्श्वभूमीवर झाडावरील संत्र्याची दोन आठवड्यात तोड न झाल्यास संत्रा उत्पादकांचे ३०० कोटी रुपयांवर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचारबंदीच्या कायद्यात संत्रा उत्पादकांना शिथिलता देण्याची मागणी राज्य संत्रा उत्पादक संघाद्वारा पालकमंत्र्यांकडे सोमवारी करण्यात आली.सद्यस्थितीत तोडणीला आलेल्या संत्राबागांची विक्री झालेली आहे. दोन ते तीन आठवड्यांत ती संपणार आहे. जिल्ह्यात साडेतीन लाख टन संत्रांचे उत्पादन आहे. यापैकी एक लाख टन संत्रा सद्यस्थितीत झाडावर आहे. तिवसा, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये ३० टक्के म्हणजेच एक लाख टन संत्री सध्या झाडावरच आहेत. याची टेबल परपज व प्रक्रिया १५ ते २० दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यता मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झालेली आहे. एक ट्रक संत्री तोडणीसाठी किमान २० ते २५ मजूर एका बागेत लागतात. त्यामुळे कलम १४४ मध्ये संत्रा उत्पादकांना शिथिलता मिळणे महत्त्वाचे आहे. सिट्रस प्रोसेसिंग इंडस्ट्री नांदेड व जैन फार्मा फ्रेस जळगाव येथे अनुक्रमे २०० ते १५० टन संत्र्यांची ‘इंडस्ट्री ग्रेड’ प्रक्रिया केली जाते. ही दोन्ही कारखाने सुरू राहिल्यास २५ ते ३० टन संत्र्याची प्रक्रिया होईल, त्या दृष्टीने शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी संत्रा उत्पादक संघ वरूडचे उपाध्यक्ष रमेशपंत वडस्कर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.संत्राफळ हे नाशवंत आहे. त्यामुळे देशांतर्गत वाहतुकीमध्ये अडथळा नको, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे.येत्या १५ दिवसांत संत्राझाडावरील शिल्लक राहिलेले एक लाख टन संत्राची काढणी व विल्हेवाट न केल्यास नैसर्गिक व माशीच्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना ३०० कोटींच्यावर नुकसान होऊ शकते, ही बाब संत्रा उत्पादक संघाद्वारा पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणण्यात आली आहे. 'लॉकडाऊन'च्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखाने सुरूच राहतील. कारखाण्यांनी ऊसाचे गाळप करण्यात शिथिलता दिली आहे. मग संत्राबाबत दुजाभाव का, असा संत्रा उत्पादकाचा सवाल आहे.संत्रा उत्पादकांचा प्रश्न तत्काळ सोडवू - पालकमंत्रीमध्यप्रदेश व इतर काही राज्यांत सीमा बंद करण्यात आल्याने संत्रा उत्पादकांना संत्रा नेण्यास अडथळे येत असल्याची तक्रार आहे. ही बाब तत्काळ शासनाच्या निदर्शनास आणली जाईल. जळगाव व नांदेड येथील संत्रा प्रक्रिया युनिटबाबत संत्रा उत्पादकांना येणाऱ्या अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून तत्काळ प्रश्न सोडवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मदर डेअरी दूध संकलन केंद्रांबाबत दुग्ध उत्पादकांच्या मागणीनुसार आवश्यक कार्यवाही व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

टॅग्स :agricultureशेती