शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पालापाचोळ्याच्या आगीत हिरवेगार वृक्षांचे नुकसान

By admin | Updated: March 28, 2016 00:04 IST

शेतकरी शेतानजीकच्या धुऱ्यावरील पालापाचळा व वाढलेला गवत जाळण्यासाठी आगी लावत आहे.

अमानुषपणे कत्तल : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षअमरावती : शेतकरी शेतानजीकच्या धुऱ्यावरील पालापाचळा व वाढलेला गवत जाळण्यासाठी आगी लावत आहे. या मध्ये चांगली वृक्षसुध्दा जळून खाक होत आहे. परंतु या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. दर्यापूर - अमरावती मार्गावर असेच रोज शेताशेजारील धुऱ्यावरील वाढलेले गवत व पाला पेटविण्यात येत आहे. या मार्गावर वनविभागाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्ष लावली आहेत. काही झाडे मोठी झाली तर काही वृक्ष लहान आहेत. आगीमुळे झाडांचे बुंदे जळतात. यामुळे अनेक झाडे नष्ट होत आहेत. काही ठिकाणी उन्हळयात झाडांना आगी लावणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. झाडांना आगी लावल्या जातात त्यामुळे वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नंतर अर्धवट जळालेले खोड नाट्यमयरीत्या कापून नेण्यात येते हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातून त्यांना भरमसाठ पैसे मिळतो. मात्र या गंभीर प्रश्नांची फारशी दखल घेण्यात येत नाही. शासन वृक्ष लावण्यावर लाखो रुपये खर्च करते व रस्त्याच्या दोन्ही कळेला वृक्ष लावते व त्याचे संवर्धन करते मात्र झाडी मोठी झाल्यानंतर त्याची अमानुषपणे कत्तल करण्यात येत आहे. वृक्षतोड क रणाऱ्या टोळयांनी नविन फंडे वापरणे सुरू केला आहे. रात्री झाडांच्या बुंद्यांना आगी लावायच्या, असा धंदा सुरू आहे. त्यांमुळे काय करतात सार्वजनिक बांधकाम व वनविभागाचे अधिकारी, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. जिल्हाभर असा प्रकार सर्वच तालूकयात होताना आढळत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवरची झाडे सुध्दा अश्याच प्रकारे जाळण्यात येतात रविवारीसुध्दा अशा प्रकारे दर्यापूर-अमरावती मार्गावर पालापाचोळा पेटवून रस्त्यालगतची वृक्ष जाळण्यात आली आहे. (प्रतिनिधी)