शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

पालापाचोळ्याच्या आगीत हिरवेगार वृक्षांचे नुकसान

By admin | Updated: March 28, 2016 00:04 IST

शेतकरी शेतानजीकच्या धुऱ्यावरील पालापाचळा व वाढलेला गवत जाळण्यासाठी आगी लावत आहे.

अमानुषपणे कत्तल : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षअमरावती : शेतकरी शेतानजीकच्या धुऱ्यावरील पालापाचळा व वाढलेला गवत जाळण्यासाठी आगी लावत आहे. या मध्ये चांगली वृक्षसुध्दा जळून खाक होत आहे. परंतु या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. दर्यापूर - अमरावती मार्गावर असेच रोज शेताशेजारील धुऱ्यावरील वाढलेले गवत व पाला पेटविण्यात येत आहे. या मार्गावर वनविभागाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्ष लावली आहेत. काही झाडे मोठी झाली तर काही वृक्ष लहान आहेत. आगीमुळे झाडांचे बुंदे जळतात. यामुळे अनेक झाडे नष्ट होत आहेत. काही ठिकाणी उन्हळयात झाडांना आगी लावणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. झाडांना आगी लावल्या जातात त्यामुळे वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नंतर अर्धवट जळालेले खोड नाट्यमयरीत्या कापून नेण्यात येते हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातून त्यांना भरमसाठ पैसे मिळतो. मात्र या गंभीर प्रश्नांची फारशी दखल घेण्यात येत नाही. शासन वृक्ष लावण्यावर लाखो रुपये खर्च करते व रस्त्याच्या दोन्ही कळेला वृक्ष लावते व त्याचे संवर्धन करते मात्र झाडी मोठी झाल्यानंतर त्याची अमानुषपणे कत्तल करण्यात येत आहे. वृक्षतोड क रणाऱ्या टोळयांनी नविन फंडे वापरणे सुरू केला आहे. रात्री झाडांच्या बुंद्यांना आगी लावायच्या, असा धंदा सुरू आहे. त्यांमुळे काय करतात सार्वजनिक बांधकाम व वनविभागाचे अधिकारी, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. जिल्हाभर असा प्रकार सर्वच तालूकयात होताना आढळत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवरची झाडे सुध्दा अश्याच प्रकारे जाळण्यात येतात रविवारीसुध्दा अशा प्रकारे दर्यापूर-अमरावती मार्गावर पालापाचोळा पेटवून रस्त्यालगतची वृक्ष जाळण्यात आली आहे. (प्रतिनिधी)