शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

आरटीओत पुन्हा ‘दलालराज’

By admin | Updated: October 12, 2015 00:32 IST

अगदी अर्ज उपलब्धतेपासून ते भरण्यापर्यंतची योग्य माहिती नागरिकांना मिळत नसल्याने कोणतेही काम असो ‘एजंटविना कागद हलेना’ ...

पहिले पाढे पंचावन्न : अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण मौन, सर्वसामान्यांची होतेय लूट प्रदीप भाकरे अमरावतीअगदी अर्ज उपलब्धतेपासून ते भरण्यापर्यंतची योग्य माहिती नागरिकांना मिळत नसल्याने कोणतेही काम असो ‘एजंटविना कागद हलेना’ अशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थिती आहे. जानेवारी २०१५ मधील काही दिवस वगळता आता पुन्हा एकदा आरटीओची स्थिती ‘दलालयुक्त’ झाली आहे. राज्यातील सर्व आरटीओ कार्यालये दलालयुक्त करण्याचा आदेश तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी जानेवारी २०१५ मध्ये दिला होता. त्यानंतर काही ठिकाणी अगदी पोलीस बंदोबस्तात एजंटसना आरटीओमधून बाहेर काढण्यात आले. मात्र त्याविरुद्ध एजंटच्या संघटना उच्च न्यायालयात गेल्या. दरम्यानच्या काळात राज्यातील सर्व आरटीओंची स्थिती ‘पहिले पाढे पंचावन्न’ झाली. आज येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुठलेही काम एजंट वा दलालाविना होत नाही. अगदी प्रवेशद्वारापासून ससेमिराप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाय ठेवताच नागरिकांच्या पाठीमागे दलालांचा ससेमिरा लागतो. प्रत्येक कामाचे दर न विचारताही सांगितले जातात. सर्व संगणकीकरण आणि आॅनलाईन प्रक्रिया असताना वाहनचालक आणि काम करण्यास आलेल्या नागरिकांना अधिक मेहनताना घेऊन लुबाडले जाते.दलालामार्फत गेल्यास तुमचे काम लवकर होते. मात्र तेच काम वाहनधारक स्वत: करायला गेल्यास जाणूनबुजून उशीर केला जातो, असा येथील अनुभव आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दुसऱ्या माळ्यावर विविध प्रकारची कामे खिडक्यांवरून केली जाते. खिडक्यांवर नागरिकांची रांग असताना आतून मात्र दलाल आपले काम बिनदिक्कतपणे करून निघून जातात. एकंदरीतच प्रादेशिक परिवहन कार्यालय आता दलालयुक्त झाल्याचा अनुभव पदोपदी येतो. त्यावर कुठल्याही अधिकाऱ्यांचे नियंत्रण उरलेले नाही. ३० रुपयांच्या शिकाऊ परवान्यासाठी २०० रूपये आकारले जातात. उल्लेखनीय म्हणजे त्यासाठी संबंधित वाहन चालकालाच आॅनलाईन प्रक्रिया करावी लागते. तरीही येथे काम लवकर करून देण्याच्या नावावर मोठी रक्कम उकळली जाते. येथे कार्यालयाबाहेर असो की आत गर्दी दलालांची असते. या सर्व फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष चालविल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झालेला आहे.या संपूर्ण कार्यालयात एजंट वा दलाल हाती कागदे घेवून मुक्तसंचार करीत असतात. २३ खिडक्यांच्या सभोवताली त्यांचेच राज्य असल्याचे आज पुन्हा एकदा प्रत्ययास आले. वर्षानुवर्ष अनुभव घेवून थकलेल्या नागरिकांकडूनही या वर्षानुवर्षाच्या अनुभवावरून कागद हलवायचा असेल तर एजंटाकडे जा, अशी सर्वसामान्यांची दृढ मानसिकता बनली आहे. स्वत:हून खिडक्यांवर विचारत अर्ज भरला तरी कोणतीही त्रुटी न काढता आपला अर्ज स्वीकारला जाईल, तसेच आपले काम लवकर पूर्ण होईल याची सर्वसामान्य नागरिकांना शाश्वती उरलेली नाही आणि त्यामुळेच ५० रुपयांच्या कामासाठी नागरिकांना ५०० रूपये मोजावे लागत आहे. फक्त तिघांना मान्यताअगदी प्रवेशद्वारापासून सुरू झालेला दलालांचा ससेमिरा प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातील वरच्या मजल्यावरील खिडक्यांपर्यंत सुरू राहतो. यातही ‘भाव’ केले जातात. अर्ज भरून देण्यासाठी फक्त तीन व्यक्तींची अधिकृत नेमणूक केली असताना हे तिघे वगळता येथे शेकडो दलालांची उठ-बैस सारखी सुरू असते. गौतम सोनाजी मेश्राम, गजानन राजाराम मसराम आणि राजकुमार माधवराव तायडे अशी मान्यताप्राप्त अर्ज भरणाऱ्या व्यक्तीचे नावे असून त्यांचे अर्ज भरण्याचे शुल्क केवळ ५ आणि १० रुपये आहे. वरील तिघांचा या कार्यालयात शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नाहीत.