शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

एक कोटी रुपयांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:13 IST

डेंग्यूच्या राक्षसाच्या पायांचे ठसे दिसूनही त्याकडे महापालिका आयुक्तांनी आश्चर्यकारक दुर्लक्ष केल्यामुळे या बकासुराने अमरावती महानगरातील चिमुकल्यांचा अन् मोठ्यांचाही घास घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत चार जणांना या राक्षसाने गिळंकृत केले आहे.

ठळक मुद्दे२८,००० मनुष्यदिवस नष्ट

डेंग्यूच्या राक्षसाच्या पायांचे ठसे दिसूनही त्याकडे महापालिका आयुक्तांनी आश्चर्यकारक दुर्लक्ष केल्यामुळे या बकासुराने अमरावती महानगरातील चिमुकल्यांचा अन् मोठ्यांचाही घास घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत चार जणांना या राक्षसाने गिळंकृत केले आहे.डेंग्यू तसा जीवघेणा आजार असला तरी सहज नियंत्रणात आणता येऊ शकेल इतका तो मानवी मर्यादेत आहे. डेंग्यूचा फैलाव करणारे माध्यम म्हणजे स्वच्छ पाण्यावर आढळणारे डास. सकाळी सक्रिय होणारे हे डास नियंत्रणात आणणे हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. त्यानंतरही डेंग्यू झालाच, तर वैद्यकीय चिकित्सकाच्या देखरेखीत तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.महापालिका आयुक्तपदाच्या अधिकाऱ्याने प्रशासन कौशल्य वापरून वेळोवेळी योग्य ते आदेश देणे आणि आदेशांचे पालन झाले की नाही, याची खातरजमा करणे इतकेदेखील काम न चुकता रोज केले तरी डासांवर नियंत्रण मिळविणे आणि डेंग्यूरूपी राक्षसाचा नायनाट करणे शक्य आहे. तथापि, आयुक्त संजय निपाणे यांनी गरजेपेक्षा जास्त सोज्वळपणा दाखविल्याने त्यांचे हे प्रशासकीय वागणे आता अमरावतीकरांच्या प्राणांवर बेतू लागले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे भारत दौºयावर असताना त्यांच्या वास्तव्यादरम्यान येथील प्रदूषणाने त्यांचे तीन दिवसांचे आयुष्य कमी झाल्याचा निष्कर्ष काढण्याइतपत आरोग्यक्षेत्र विकसित झाले आहे. इकडे केवळ डासांची पैदास न रोखल्यामुळे महानगरातील लोक पटापट मरून पडले. किमान एक कोटी रुपयांचे आणि २८ हजार मनुष्यदिवसांचा चुराडा असे राष्ट्राचे नुकसान झाले. लक्षावधी लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाºया पदावर विराजमान प्रमुख अधिकारी संवेदनशील आणि निर्णयक्षम असल्यास सामान्यजनांना त्याचा लाभ आणि निर्णयक्षमता नसलेला असल्यास त्याचा तोटा किती, या दोन्ही बाबी यातून स्पष्ट व्हाव्यात.शहरात किमान हजार स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली. महापालिका, शासन आकडे लपवित असली तरी 'लोकमत'ने शोधमोहीम राबवून शहरातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चेअंती हा आकडा मिळविला आहे. खरे तर डॉक्टरांच्या मते हा आकडा याहीपेक्षा बराच जास्त आहे. तथापि, बाधितांची किमान संख्या केवळ हजारच गृहीत धरली तरी प्रत्येक रुग्णाला औषधी, चाचण्या, इस्पितळाचे, डॉक्टरांचे शुल्क असा कमीत कमी १० हजार रुपये खर्च येतो. हजार लोकांसाठी एक कोटी रुपये व्यर्थ गेलेत. डेंग्यूबाधित रुग्णाला किमान १४ दिवस विश्रांती घ्यावीच लागते. याप्रमाणे हजार रुग्णांचे १४ हजार दिवस आणि देखभालीसाठी असलेली एका रुग्णामागे एक व्यक्ती याप्रमाणे हजार रुग्णांमागे हजार व्यक्तींचे १४ हजार दिवस असे एकूण २८ हजार मनुष्यदिवस असे राष्ट्राचे नुकसान झाले. हजारपैकी गंभीर रुग्णांची आकडेवारी पाच टक्के इतकी आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू