लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : लॉकडाऊनमध्ये अडकलेले मजूर, विद्यार्थ्यांना बडनेऱ्याहून रेल्वे गाडी सुटणार असल्याची बुधवारी माहिती मिळाली. गावाकडे जाण्याच्या ओढीने अमरावतीहून बडनेरा रेल्वे स्थानक त्यांनी पायी गाठले. मात्र, कुठलीही रेल्वे गाडी सुटत नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी समजूत घालून त्यांना परत पाठविले. अखेर या मजूर, विद्यार्थ्यांना पुन्हा पायी अमरावती गाठावे लागले, हे विशेष.कृषिउत्पन्न बाजार समितीच्या मंडईत आणि शासकीय मुलींचे वसतिगृहात बिहार येथील १५० मजूर, विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनी मूळ गावी परत जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर नोंदणी केली आहे. कोणी तरी बुधवारी रेल्व सुटत असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानुसार मजूर, विद्यार्थी बडनेऱ्यात पायी पोहोचले.पायी येणाऱ्यांचा मोठा समूह बघून पोलिसांना कळविण्यात आले. बडनेराचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी विचारपूस केली. रेल्वे स्थानकाहून बिहारसाठी रेल्वे जाणार असल्याचे मजुरांनी सांगितले. तथापि, रेल्वे स्थानकावरून कोणतीही गाडी सुटणार नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक वंजारी यांना मिळाली. समूह रेल्वे फलाटावर पोहोचण्यापूर्वीच ठाणेदारांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर हे मजूर, विद्यार्थी पुन्हा क्वारंटाइन ठिकाणाकडे पायी रवाना झाले. त्यांनी आरोग्य तपासणी झाल्याची माहिती यावेळी दिली.
बडनेराहून रेल्वे सुटणार म्हणून मजूर, विद्यार्थ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST
कृषिउत्पन्न बाजार समितीच्या मंडईत आणि शासकीय मुलींचे वसतिगृहात बिहार येथील १५० मजूर, विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनी मूळ गावी परत जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर नोंदणी केली आहे. कोणी तरी बुधवारी रेल्व सुटत असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानुसार मजूर, विद्यार्थी बडनेऱ्यात पायी पोहोचले.
बडनेराहून रेल्वे सुटणार म्हणून मजूर, विद्यार्थ्यांची गर्दी
ठळक मुद्देपोलिसांकडून समजूत : अमरावतीला पुन्हा परत पायी रवाना, १५० नागरिकांचा समावेश