शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी : नेत्यांच्या कक्षात जमेना; आयुक्तांच्या दालनात आवेरना !

By admin | Updated: May 19, 2015 00:37 IST

अमरावती महापालिकेत जादू घडली आहे. महापालिकेच्या नेत्यांचे गर्दीने भरून वाहणारे कक्ष आता ओस पडले आहेत.

गणेश देशमुख अमरावतीअमरावती महापालिकेत जादू घडली आहे. महापालिकेच्या नेत्यांचे गर्दीने भरून वाहणारे कक्ष आता ओस पडले आहेत. महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कक्षातील गर्दी मात्र आवरेनासी झाली आहे. महापालिकेत महापौर, उपमहापौर, विरोधीपक्षनेता, पक्षनेता, गटनेता, पाच सभापती आणि स्थायी समितीचे सभापती यांची दालने आहेत. महापालिकेच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या महापालिका नेत्यांची ही दालने एरवी सामान्य जनतेच्या गर्दीने फुल्ल असायची. सत्ता कुणाचीही असो, आयुुक्त कुणीही असोत, महापालिकेत सहजगत्या कामे होत नसल्याचा अनुभव अमरावतीकरांच्या गाठीशी असल्याने कामे करवून घेण्यासाठी सामान्यजन महापालिका नेत्यांच्या दालनात सकाळपासून गर्दी करायचे. महापौरांचा मान सर्वोच्च असल्यामुळे थेट त्यांच्या दालनात नागरिक पोहोचत नसले तरी पक्षनेता, गटनेता, विरोधी पक्षनेता, यांची दालने लोकरेटा अनुभवायची. नेतृत्त्वाच्या नैसर्गिक तत्त्वानुसार, दालनात रोजच होणारी गर्दी बघून नेत्यांना त्यांचे नेतृत्त्व लोकोपयोगी असल्याची खात्री पटत असे. बहरलेल्या नेतृत्त्वाच्याच त्या खुणा होत्या. गर्दीमुळे नेत्यांना हुरूप यायचा. आपल्या दालनात आलेला प्रत्येक नागरिक समाधानी होऊनच परतावा, असा प्रामाणिक प्रयत्न हे महापालिका नेते करायचे. महापालिका राजकारणात मांड घट्ट करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असल्याचे महापालिकेतील नेत्यांनी हेरले होते. दालनात आलेल्या व्यक्तीचे काम व्हायलाच हवे, असा कटाक्ष ही नेतेमंडळी ठेवायची. काम झाले नाही तर प्रशासनाला ते जाबही विचारायचे. काम व्हायचे. 'भाऊचे महापालिकेत वजन आहे' अशी चर्चा मग सामान्यांमध्ये व्हायची. महापालिका राजकारणाचा हा रोजचा चेहरा होता. महिना झाला, चित्रच पालटले. नेत्यांची दालने सुनसान आहेत. सारी गर्दी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनाकडे चुंबकाप्रमाणे खेचली गेली. समस्या निवारणासाठी थेट महापालिका आयुक्तांना भेटण्याचा सामान्य माणसाने कधी विचारही केलेला नव्हता. महापालिकेचे अधिकारी, कारकूनच नीट बोलत नाहीत, मग आयुक्तांकडे नालीची, दिवाबत्तीची, जन्ममृत्यू प्रमाणपत्राची, रस्त्यावर म्हशी बांधल्याची तक्रार न्यायची तरी कशी? हाकलूनच लावतील ते, हीच सामान्यांची धारणा होती. मोठी समस्या घेऊन कधी कुणी आयुक्तांकडे जायची हिम्मत केलीच तर आयुक्तांच्या दालनाबाहेर बसणारा शिपाई प्रथम कामाची चौकशी करणार. त्याचा कवडीचाही संबंध नसताना त्याला माहिती द्यावी लागायची. नवख्या माणसाला तेथील रिवाज माहिती नसल्याने हा शिपाई नंतर त्याला आयुक्तांच्या स्वीय सहायकांकडे पाठविणार. चेहऱ्यावर जराही हास्य न ठेवणारी ही सहायकद्वय मंडळी 'कशालाच आला?' असा कटाक्ष आगंतुकावर टाकणार. त्यांना सविस्तर काम सांगायचे. शक्य झाले तर ते साहेबांकडे जाण्याची व्यवस्था करणार अन्यथा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याकडे रवानगी करणार. कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती नेहमीच कायम राहिल्याने आयुक्तांच्या दालनात जाणे म्हणजे जणू मोहीम सर करणेच होते. नसल्या भानगडीत पडण्याऐवजी नेत्यांकडून कामे करवून घेणेच सामान्यजन पसंत करायचे.