शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
Delhi Blast : "आम्ही गेट उघडला आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
4
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
5
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
8
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
9
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
10
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
11
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
12
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
13
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
14
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
15
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
16
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
17
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
18
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
19
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
20
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

विद्यापीठात मूल्यांकनासाठी परीक्षकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा आटोपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याची नियमावली आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयात समन्वयाचा अभाव असल्याने गत तीन ते चार वर्षांपासून ऑनलाइन, ऑफलाइन निकालाची बोंबाबोंब कायम आहे. हल्ली हिवाळी परीक्षेत ऑनलाइन कामकाजाला तूर्तास फाटा देण्यात आला आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमुळे हिवाळी २०१९ परीक्षांमध्ये फेररचना करण्यात आली.

ठळक मुद्देदंडात्मक कारवाईचा परिणाम : परीक्षा विभागात मूल्यांकनाला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मूल्यांकनासाठी परीक्षकांनी एकच गर्दी केली आहे. परीक्षा विभागात शुक्रवारी मूल्यांकनासाठी ३०० पेक्षा अधिक परीक्षकांनी हजेरी नोंदविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एरवी परीक्षकांना मूल्यांकनासाठी पाठवा, अशी विनंती परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांना बरेचदा करावी लागतोे. मात्र, उन्हाळी २०१९ परीक्षेत मूल्यांकनासाठी टाळाटाळ करणाऱ्या परीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने ही गर्दी होत असल्याचे वास्तव आहे.सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा आटोपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याची नियमावली आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयात समन्वयाचा अभाव असल्याने गत तीन ते चार वर्षांपासून आॅनलाइन, आॅफलाइन निकालाची बोंबाबोंब कायम आहे. हल्ली हिवाळी परीक्षेत ऑनलाइन कामकाजाला तूर्तास फाटा देण्यात आला आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमुळे हिवाळी २०१९ परीक्षांमध्ये फेररचना करण्यात आली. ३१ ऑक्टोबरपासून बॅकलॉग विषयाच्या परीक्षांना प्रारंभ झाला असून, १४ नोव्हेंबरपासून नियमित परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यापीठ अंतर्गत १५२ महाविद्यालयातील केंद्रावर परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा आणि मूल्यांकन एकाच वेळी सुरू करण्यात आले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशानुसार मूल्यांकनासाठी नियोजित वेळेत परीक्षकांनी हजर राहावे, यासाठी प्राचार्य, विषय प्राध्यापकांना ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे. मूल्यांकनासाठीचे पत्रसुद्धा पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबरपासून मूल्यांकनास प्रारंभ झाले आहे. मध्यंतरी दिवाळी सुट्यांमुळे मूल्यांकनासाठी परीक्षकांची हजेरी अत्यल्प होती. आता ही गर्दी वाढू लागली आहे. परीक्षा विभागात मूल्यांकनासाठी जागा कमी पडत असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत परीक्षकांची संख्या वाढणार आहे. मात्र, हा बदल परीक्षकांवर दंडात्मक कारवाई आणि सेवापुस्तिकेत नोंद यामुळे झाल्याची चर्चा जोरात आहे.मूल्यांकनासाठी परीक्षकांनी वेळेत हजर राहावे, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्राचार्यासोबत संवाद आणि परीक्षकांना पत्र पाठविण्यात आले आहे. मेलद्वारे नियुक्ती आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा परीक्षकांची मूल्यांकनासाठी गर्दी वाढत आहे. निर्धारित कालावधीत मूल्यांकन होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ

टॅग्स :universityविद्यापीठ