शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे पिके संकटात

By admin | Updated: October 20, 2014 23:05 IST

विधानसभा निवडणूक संपताच वरुड तालुक्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु झाले असून शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही.

वरुड : विधानसभा निवडणूक संपताच वरुड तालुक्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु झाले असून शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही. कृषिपंपांचे भारनियमन वाढले असल्याने खरीप हंगामातील कपाशी, मिरचीसह संत्रा पिकेसुद्धा धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांना नियमित वीज देण्याची मागणी केली जात आहे.कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा संकटाने शेतकरी पूर्णत: खचला आहे. संत्रा आंबिया बहरावर संत्रा उत्पादकांनी समाधान मानले. परंतु पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने शेतातील कपाशी, मिरची, सोयाबीन, तूर सुकायला लागली तसेच संत्रा फळे गळू लागली आहे. नर्सरीमध्ये ेकेलेली जंभेरीची रोपटे सुकू लागली. विहिरीत पाणी आहे. परंतु वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. यासंदर्भात वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही. अभियंते म्हणतात, 'भारनियमनाचे अधिकार आमच्याकडे नाही' यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील गाडेगाव, शेंदूरजनाघाट, पुसलासह आदी वीज कार्यालयांवर शेतकऱ्यांनी धडक देऊन तातडीने वीज भारनियमन कमी करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही भारनियमन कमी झाले नाही. तालुक्यात कृषी पंपाकरिता असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित असतो. भारनियमन वाढल्याने अनेकांना भरनियमनाचा फटका बसायला लागला आहे. काही भागांत विद्युत रोहित्रांत बिघाड तर काही भागांत वीजपुरवठा खंडित करावा अशी अवस्था असल्याने कपाशी, मिरची, संत्रा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. वरुड तालुक्यात पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार हे निश्चित. एकीकडे निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उधळण तर दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची च्ािंता आहे. वरुड तालुक्यात संत्रा, मिरची आणि कपाशी उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून डौलदार पिकांना ओलीत करण्याची गरज असताना विजेअभावी ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता असल्याने पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (प्रतिनिधी)