शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

४.४० लाख शेतकऱ्यांची पीक विम्यास ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST

गजानन मोहोड अमरावती : विभागात सलग चार वर्षांपासून दुष्काळसत्र सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भरपाई मिळत नसल्याने विमा कंपन्यांवरील ...

गजानन मोहोड

अमरावती : विभागात सलग चार वर्षांपासून दुष्काळसत्र सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भरपाई मिळत नसल्याने विमा कंपन्यांवरील शेतकऱ्यांचा विश्वास कमी झालेला आहे. त्याचा फटका यंदा कंपन्यांना चांगलाच बसला. गत वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ४,३९,९४१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यास नकार दर्शविला आहे.

पिकांना कशा पद्धतीने संरक्षण दिले जाते, याचा खुलासेवार तपशिलाचा गाजावाजा कृषी विभागाद्वारा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात हा विभाग कंपनीचे हातचे बाहुले बनल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. मागच्या खरीप हंगामात पश्चिम विदर्भात १४,८५,४२४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता व यासाठी १०९.९१ कोटींचा प्रीमियमदेखील भरला. याशिवाय केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५०० कोटींचा हप्ता गृहीत धरता मिळालेली २२९.५७ कोटींची भरपाई ही नगन्य व कंपन्यांचे चांगभलं करणारी ठरली आहे. नुकसान भरपाईचे सूत्र कंपनीच्या फायद्याचे व शेतकऱ्यांची फसगत करणारे असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

यंदा पीक विम्याची मुदतवाढीनंतरची अखेरची मुदत रविवारी संपली. पश्चिम विदर्भात यामध्ये १,१३,५८७ कर्जदार, ९,३१,८९५ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून ८,४०,०६९ हेक्टर संरक्षित केलेले आहे. या तुलनेत सन २०२०-२१ च्या खरीप हंगामासाठी १४,८५,४२४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. म्हणजेच यंदा ४,३९,९४१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नसल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

दोन वर्षांतील शेतकरी सहभागाची तुलनात्मक स्थिती

* यंदा बुलडाणा जिल्ह्यात २,२६,२०९, अकोला १,९०,२१०, वाशिम १४,१७९, अमरावती १,७३,११ व यवतमाळ जिल्ह्यात ३,१४,१७४ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढलेला आहे.

* गतवर्षी २,९६,२३१, अकोला २,६३,११७, वाशिम २,७२,५९७, अमरावती १,८५,६०१, यवतमाळ ४,६७,८७८ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

कोट

विम्याची नुकसान भरपाई ठरविण्याचे सूत्र कंपनीधार्जिणे आहे. त्यामुळे दुष्काळस्थितीत पीक विम्याचा लाभ मिळेल, यावरील शेतकऱ्यांचा आता विश्वास उडाला आहे.

- अरविंद नळकांडे,

अध्यक्ष, श्रमराज्य परिषद