शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

४.४० लाख शेतकऱ्यांची पीक विम्यास ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST

गजानन मोहोड अमरावती : विभागात सलग चार वर्षांपासून दुष्काळसत्र सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भरपाई मिळत नसल्याने विमा कंपन्यांवरील ...

गजानन मोहोड

अमरावती : विभागात सलग चार वर्षांपासून दुष्काळसत्र सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भरपाई मिळत नसल्याने विमा कंपन्यांवरील शेतकऱ्यांचा विश्वास कमी झालेला आहे. त्याचा फटका यंदा कंपन्यांना चांगलाच बसला. गत वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ४,३९,९४१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यास नकार दर्शविला आहे.

पिकांना कशा पद्धतीने संरक्षण दिले जाते, याचा खुलासेवार तपशिलाचा गाजावाजा कृषी विभागाद्वारा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात हा विभाग कंपनीचे हातचे बाहुले बनल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. मागच्या खरीप हंगामात पश्चिम विदर्भात १४,८५,४२४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता व यासाठी १०९.९१ कोटींचा प्रीमियमदेखील भरला. याशिवाय केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५०० कोटींचा हप्ता गृहीत धरता मिळालेली २२९.५७ कोटींची भरपाई ही नगन्य व कंपन्यांचे चांगभलं करणारी ठरली आहे. नुकसान भरपाईचे सूत्र कंपनीच्या फायद्याचे व शेतकऱ्यांची फसगत करणारे असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

यंदा पीक विम्याची मुदतवाढीनंतरची अखेरची मुदत रविवारी संपली. पश्चिम विदर्भात यामध्ये १,१३,५८७ कर्जदार, ९,३१,८९५ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून ८,४०,०६९ हेक्टर संरक्षित केलेले आहे. या तुलनेत सन २०२०-२१ च्या खरीप हंगामासाठी १४,८५,४२४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. म्हणजेच यंदा ४,३९,९४१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नसल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

दोन वर्षांतील शेतकरी सहभागाची तुलनात्मक स्थिती

* यंदा बुलडाणा जिल्ह्यात २,२६,२०९, अकोला १,९०,२१०, वाशिम १४,१७९, अमरावती १,७३,११ व यवतमाळ जिल्ह्यात ३,१४,१७४ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढलेला आहे.

* गतवर्षी २,९६,२३१, अकोला २,६३,११७, वाशिम २,७२,५९७, अमरावती १,८५,६०१, यवतमाळ ४,६७,८७८ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

कोट

विम्याची नुकसान भरपाई ठरविण्याचे सूत्र कंपनीधार्जिणे आहे. त्यामुळे दुष्काळस्थितीत पीक विम्याचा लाभ मिळेल, यावरील शेतकऱ्यांचा आता विश्वास उडाला आहे.

- अरविंद नळकांडे,

अध्यक्ष, श्रमराज्य परिषद