शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

पीकविमा; ३८ हजार शेतकऱ्यांनी टाळला सहभाग; ३१ जुलै रोजी संपली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:12 IST

Amravati : यंदा ४.७३ लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पीकविमा योजनेत एक रुपयात सहभाग घेता येत असल्याने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी अंतिम दिवशी म्हणजेच ३१ जुलैपर्यंत ४७३२४५ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग नोंदविला आहे. त्यातुलनेत गतवर्षी ५,१०,०३३ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग घेतला होता. परतावा टाळाटाळ होत असल्याने देण्यात ३२,५७४ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग टाळला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येतो. योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपया भरून पीकविमा संरक्षण प्राप्त होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबींचा पीकविम्यात समावेश करण्यात आला आहे. योजनेची मुदत १५ जुलै होती. मात्र, याचदरम्यान लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी केंद्रांमध्ये गर्दी होती व अनेक सेतू चालकांनी सीएससी केंद्रांचे परवाने घेतले आहेत. त्यामुळे केंद्रातील गर्दीमुळे योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ८९.२१ टक्के शेतकऱ्यांनी पीकविम्यात सहभाग घेतला आहे.

पीकविमा जिल्हास्थिती                                                २०२३                    २०२४शेतकरी संख्या                         २,३४,५२५               २,६७,०९९                       कर्जदार शेतकरी                          ४००९                   ४,२१९बिगर कर्जदार                           ४,६९,२३६             ५,०५,८१४एकूण अर्ज प्राप्त                        ५,१०,०३३              ४,७३,२४५

पीकविमा काढलेले तालुकानिहाय शेतकरीअचलपूर तालुक्यात २६,०७५, अमरावती ३५,७२३, अंजनगाव सुर्जी ३५,६३४, भातकुली ४३१७३, चांदूर रेल्वे ३२,८६३, चांदूरबाजार ३२,१६२, चिखलदरा ६७६७, दर्यापूर ६३.५७३, धामणगाव रेल्वे ३७,२०९, धारणी १३,७८९, मोर्शी ३६,४४३, नांदगाव खंडेश्वर ६१,७१३, तिवसा २७,५५८ व वरुड तालुक्यात २०,५७३ जणांनी खरिपाचा पीकविमा काढला आहे. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAmravatiअमरावती