शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा; ३८ हजार शेतकऱ्यांनी टाळला सहभाग; ३१ जुलै रोजी संपली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:12 IST

Amravati : यंदा ४.७३ लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पीकविमा योजनेत एक रुपयात सहभाग घेता येत असल्याने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी अंतिम दिवशी म्हणजेच ३१ जुलैपर्यंत ४७३२४५ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग नोंदविला आहे. त्यातुलनेत गतवर्षी ५,१०,०३३ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग घेतला होता. परतावा टाळाटाळ होत असल्याने देण्यात ३२,५७४ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग टाळला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येतो. योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपया भरून पीकविमा संरक्षण प्राप्त होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबींचा पीकविम्यात समावेश करण्यात आला आहे. योजनेची मुदत १५ जुलै होती. मात्र, याचदरम्यान लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी केंद्रांमध्ये गर्दी होती व अनेक सेतू चालकांनी सीएससी केंद्रांचे परवाने घेतले आहेत. त्यामुळे केंद्रातील गर्दीमुळे योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ८९.२१ टक्के शेतकऱ्यांनी पीकविम्यात सहभाग घेतला आहे.

पीकविमा जिल्हास्थिती                                                २०२३                    २०२४शेतकरी संख्या                         २,३४,५२५               २,६७,०९९                       कर्जदार शेतकरी                          ४००९                   ४,२१९बिगर कर्जदार                           ४,६९,२३६             ५,०५,८१४एकूण अर्ज प्राप्त                        ५,१०,०३३              ४,७३,२४५

पीकविमा काढलेले तालुकानिहाय शेतकरीअचलपूर तालुक्यात २६,०७५, अमरावती ३५,७२३, अंजनगाव सुर्जी ३५,६३४, भातकुली ४३१७३, चांदूर रेल्वे ३२,८६३, चांदूरबाजार ३२,१६२, चिखलदरा ६७६७, दर्यापूर ६३.५७३, धामणगाव रेल्वे ३७,२०९, धारणी १३,७८९, मोर्शी ३६,४४३, नांदगाव खंडेश्वर ६१,७१३, तिवसा २७,५५८ व वरुड तालुक्यात २०,५७३ जणांनी खरिपाचा पीकविमा काढला आहे. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAmravatiअमरावती