शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२९८ एकरांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

मोठ्या प्रमाणात पेरणी केलेले महाबीज सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याची ओरड सर्वत्र असताना अचलपूर तालुक्यातील जवळपास ८८ शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये येवता, येसुर्ना, निंभारी, पथ्रोट, भूगाव, बोरगाव पेठ, नवापूर, जवळापूर, काकडा, रासेगाव, शिंदी, निजामपूर, बोरगाव दोरी, वासनी बु, इसापूर, कविठा बु, तालुक्यातील या गावांमधील प्रामुख्याने कृषी विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देसोयाबीन उगवलेच नाही : तक्रारींची बांधावर जाऊन पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील विविध शिवारात २९८ एकर शेतजमिनीवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तालुका तक्रार निवारण समिती व कृषी अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी स्वत: ६६ शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी केली.मोठ्या प्रमाणात पेरणी केलेले महाबीज सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याची ओरड सर्वत्र असताना अचलपूर तालुक्यातील जवळपास ८८ शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये येवता, येसुर्ना, निंभारी, पथ्रोट, भूगाव, बोरगाव पेठ, नवापूर, जवळापूर, काकडा, रासेगाव, शिंदी, निजामपूर, बोरगाव दोरी, वासनी बु, इसापूर, कविठा बु, तालुक्यातील या गावांमधील प्रामुख्याने कृषी विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन शहानिशा केली. जवळपास तीनशे एकरांवरील शेत जमिनीवर दुबार पेरणी करावी लागणार आहे. प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव घातखेड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मेंढे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अंकुश मस्के, तालुका तक्रार निवारण समितीचे सचिव, मंडळ अधिकारी पूजा गायकवाड रुपाली इंगळे तसेच महाबीज कंपनीचे आर. एस. पाथरे, ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी खचून न जाता उगवण समस्यांबाबतची तक्रार असल्यास तात्काळ अचलपूर पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे देण्याचे आवाहन तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.३५ हजार हेक्टरवर पेरणी, कापसाचा पेरा सर्वाधिकअचलपूर तालुक्यातील एकूण ४३ हजार हेक्टर जमिनीपैकी ३५ हजार हेक्टर जमिनीवर पेरणी करण्यात आली आहे. पेरणीचे प्रमाण हे जवळपास ८० टक्के आहे. त्यात ज्वारी दोन हजार हक्टर, बाजरी, मका, तीळ प्रत्यकी दोनशे हेक्टर, तूर ६४०० हेक्टर, सोयाबीन ८६४० हेक्टर, कपाशी १७३४७ हेक्टर, मूग उडीद इतर कडधान्य भुईमंूग अशी पेरणी आतापर्यंत झालेली आहे.अचलपूर तालुक्यातून एकूण ८८ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. ६६ बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली. २९८ एकरांवर उगवण न झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आहे.- प्रफुल्ल सातव,तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती