शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

अग्रीमचे समायोजन टाळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी

By admin | Updated: September 13, 2016 00:20 IST

महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल ८७ लाख रुपये अग्रीम (अ‍ॅडव्हांस) घेऊन त्या रकमेचे समायोजन न करणाऱ्या...

अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती : आर्थिक अनियमितताअमरावती : महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल ८७ लाख रुपये अग्रीम (अ‍ॅडव्हांस) घेऊन त्या रकमेचे समायोजन न करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर फौजदारीची टांगती तलवार आहे. अग्रीम रकमा रोखीने प्रदान केल्यामुळे आर्थिक अनियमितता होते व त्या रकमेचा योग्य विनियोगही होत नाही. त्यामुळे अग्रीम मंजूर करणारे व घेणारे कर्मचारी फौजदारी कारवाईस पात्र ठरतात. महाराष्ट्र नगरपरिषद लेखासंहितेमध्ये अशा कर्मचाऱ्यांंवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आहेत. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सन २०११-१२ च्या लेखापरीक्षणाअंती महापालिकेतील ६४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविले आहे. या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी ८६.६१ लाख रुपयांच्या अग्रीम रकमेचे समायोजन चार वर्षांनंतरही केले नाही. या अग्रीम राशीचे समायोजन १५ दिवसांत करावे, संबंधिताना नोटीस द्याव्यात, त्यांचे वेतन रोखावे, असे दिशानिर्देश लेखा विभागाला देण्यात आले आहे. अग्रीम मंजुरीमुळे वित्तीय अनियमितता तसेच वेळेवर अग्रीम समायोजन न झाल्याने या रकमेचा तात्पुरता अपहार होतो, असा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवल्याने फौजदारीची शक्यता अधिक वाढली आहे. विहित मुदतीत आणि वेतन थांबूनही अग्रीम रकमाचे समायोजन न झाल्यास शेवटचा पर्याय म्हणून फौजदारीची मात्रा लागू पडेल, असा यंत्रणेचा शेरा आहे. लेखापरीक्षण अहवालानुसार, ससन २०११-१२ या आर्थिक वर्षात ८३ लाख ७४.४०१ रुपये अग्रीम प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्र नगरपरिषद लेखासंहितानुसार अग्रीम रक्कम धनादेशाद्वारेच देणे बंधनकारक असताना कर्मचाऱ्यांना रोख अग्रीम देण्यात आले. ठेकेदारांना अग्रीम देण्याची तरतूद नसतानाही कर्मचाऱ्यांच्या नावे अग्रीम रकमा देण्यात आल्या. त्यामुळे ती आर्थिक अनियमितता ठरते. त्याआधारे यंत्रणेच्या पुढील कारवाईकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.असे आहेत निर्देश महानगरपालिकेस अत्यंत तातडीची गरज म्हणून साहित्य खरेदी करायचे असेल तर कमाल १० हजार रुपये अग्रीम मंजूर करणे अभिप्रेत आहे. अग्रीम समायोजनासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे व संबंधित खातेप्रमुखांवर लेखी जबाबदारी सोपवावी, ही महापालिकेची आर्थिक हानी समजून सक्तीच्या उपाययोजना करून वसुली करावी. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियमाचे कलम १९६५ नुसार संबंधिताना नोटीस देऊन १२ दिवसांत रक्कम जमा न झाल्यास चक्रवाढ व्याजाची आकारणी करून व्याजासह सर्व रक्कम वसूल करावी. वसूल न केल्यास ती रक्कम संबंधितांच्या वेतनातून वसूल करण्याचे निर्देश दिले आहे. हिशेब जुळेना २०११-१२ वर्षात ८३,७४,४०१ रुपयांपैकी ४१,१९६६१ निवडणूक खर्चासाठी ६,६०,००० अतिक्रमण काढण्यासाठी अग्रीम देण्यात आले. मात्र या अग्रीमातून किती अतिक्रमणने काढली. संबंधित अतिक्रमणधारकांकडून दंडाची रक्कम वसूल केली, याचा कुठलाही हिशेब नाही. निवडणूक खर्चासाठी दिलेल्या अग्रीमाचे समायोजन झाले नाही. २०११-१२ पूर्वी कुठल्या विभागाकडे किती अग्रीम प्रलंबित होते, याची नोंदही नोंदवहीत नसल्याने अपहाराचीच शक्यात बळावली आहे. त्यामुळे २०११-१२ च्या लेखापरीक्षण अहवालात ६०,८४,५८६ अग्रीमची समायोजनाची वसुली करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत.