शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 00:14 IST

जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन (ग्रामीण) मार्फत जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायती पहिल्या टप्यात हगणदारी मुक्त करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद : ५८९ ग्रामपंचायतीत १६ जानेवारीपासून अंमलबजावणी अमरावती : जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन (ग्रामीण) मार्फत जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायती पहिल्या टप्यात हगणदारी मुक्त करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने येत्या १६ जानेवारीपासून जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन कक्ष व सर्व विभागाच्या समन्वयातून धडक मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी ४१४ ग्रामपंचायतीमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. सध्यास्थितीत २५० ग्रामपंचायती हगणदारी मुक्त झाल्या आहेत. तर उर्वरित ५८९ ग्रामपंचायती मार्च २०१८ पूर्वी हगणदारी मुक्त करण्यासाठी गावागावांत जनजागृतीचे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. परंतु अद्यापही बऱ्याच गावातील ग्रामस्थांमध्ये अपेक्षित असलेला बदल दिसून येत नाही. त्यामुळे गृहविभागाच्या २००८-०९ मधील परिपत्रकानुसार उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ ते ११७ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत. याशिवाय संबंधित दोषी व्यक्तीला सहा महिन्याचा कारावास व प्रति दिवस बाराशे रूपये दंड आकारण्याची तरतूद आहे.यानुसार १६ जानेवारी पासून उघडयावर शौचास बसणाऱ्या विरोधात धडक कारवाईची मोहीम जिल्हाभरात राबविली जाणार आहे. स्वच्छता मिशन अभियान जिल्हा परिषदेत गांभीर्याने राबविले जात आहे. (प्रतिनिधी) १४ पथके देणार आकस्मिक भेट जिल्हास्तरावरून गाव पातळीवर पहाटे आकस्मिक भेटीसाठी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली १४ पथकांचे गठन केले आहे. या मोहीमेसाठी सीईओ किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन विभागाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे व त्याचे सहकारी या मोहीमेचे नियोजन करत आहेत.