शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 00:14 IST

जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन (ग्रामीण) मार्फत जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायती पहिल्या टप्यात हगणदारी मुक्त करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद : ५८९ ग्रामपंचायतीत १६ जानेवारीपासून अंमलबजावणी अमरावती : जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन (ग्रामीण) मार्फत जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायती पहिल्या टप्यात हगणदारी मुक्त करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने येत्या १६ जानेवारीपासून जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन कक्ष व सर्व विभागाच्या समन्वयातून धडक मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी ४१४ ग्रामपंचायतीमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. सध्यास्थितीत २५० ग्रामपंचायती हगणदारी मुक्त झाल्या आहेत. तर उर्वरित ५८९ ग्रामपंचायती मार्च २०१८ पूर्वी हगणदारी मुक्त करण्यासाठी गावागावांत जनजागृतीचे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. परंतु अद्यापही बऱ्याच गावातील ग्रामस्थांमध्ये अपेक्षित असलेला बदल दिसून येत नाही. त्यामुळे गृहविभागाच्या २००८-०९ मधील परिपत्रकानुसार उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ ते ११७ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत. याशिवाय संबंधित दोषी व्यक्तीला सहा महिन्याचा कारावास व प्रति दिवस बाराशे रूपये दंड आकारण्याची तरतूद आहे.यानुसार १६ जानेवारी पासून उघडयावर शौचास बसणाऱ्या विरोधात धडक कारवाईची मोहीम जिल्हाभरात राबविली जाणार आहे. स्वच्छता मिशन अभियान जिल्हा परिषदेत गांभीर्याने राबविले जात आहे. (प्रतिनिधी) १४ पथके देणार आकस्मिक भेट जिल्हास्तरावरून गाव पातळीवर पहाटे आकस्मिक भेटीसाठी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली १४ पथकांचे गठन केले आहे. या मोहीमेसाठी सीईओ किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन विभागाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे व त्याचे सहकारी या मोहीमेचे नियोजन करत आहेत.