अमरावती : विनामास्क बाहेर फिरणे, वाहन चालविताना मास्क न लावणे तसेच संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन आठवड्यांत शहरातील १० पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २८७ जणांवर भादंविचे कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले.
७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान सदर कारवाई करण्यात आली. यात मास्क न लावणे २५८ गुन्हे, सामाजिक अंतर न पाळणे २१ गुन्हे, लोकांनी एकत्र जमा होणे ५ गुन्हे, तसेच इतर ३ असे एकूण २८७ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून कारवाईंचा बडगा उगारला.
कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर कारवाई करण्यात आली.
बॉक्स
आस्थापनाच्या ठिकाणी गर्दी टाळा
सर्व आस्थापनाच्या चालक, मालक, व्यवस्थापकांनी आस्थापनाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे तसेच शासनाकडून पारित केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोर जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिला. तशा सूचनादेखील सर्व ठाणेदारांना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.