शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शिराळा येथील दोन कृषिसेवा केंद्र संचालकांविरुद्ध पोलिसात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST

पोलीस सूत्रांनुसार, शिराळा येथील भारत कृषिसेवा केंद्र व शौर्य कृषिसेवा केंद्राच्या संचालकांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात अनिल ऊर्फ राजू भगवंतराव गंधे (५०, रा. शिराळा) या शेतकऱ्याने वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांनी शेतीत पेरणीकरिता भारत कृषिसेवा केंद्रातून १५ जून रोजी ३० किलोच्या २३,०३० रुपयांच्या १० बॅग तसेच १७ जून रोजी एक बॅग असे एकूण २६,०३० रुपयाचे सोयाबीन खरेदी केले होते.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिलीच घटना । बोगस बियाणे विक्री, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांनी कृषिसेवा केंद्रांतून विकत घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी शिराळा येथील दोन कृषिसेवा केंद्र संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी नोंदविला. अशा प्रकारचा गुन्हा नोंदविण्याची ही जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील ही पहिलीच घटना आहे. फसवणुकीची ही घटना ७ जून ते १२ जुलै दरम्यान घडल्याची पोलीसदप्तरी नोंद आहे.पोलीस सूत्रांनुसार, शिराळा येथील भारत कृषिसेवा केंद्र व शौर्य कृषिसेवा केंद्राच्या संचालकांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात अनिल ऊर्फ राजू भगवंतराव गंधे (५०, रा. शिराळा) या शेतकऱ्याने वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांनी शेतीत पेरणीकरिता भारत कृषिसेवा केंद्रातून १५ जून रोजी ३० किलोच्या २३,०३० रुपयांच्या १० बॅग तसेच १७ जून रोजी एक बॅग असे एकूण २६,०३० रुपयाचे सोयाबीन खरेदी केले होते.गावातील अन्य शेतकरी सूरज बोरकर यांनी १२ जून रोजी शौर्य कृषिसेवा केंद्रातून ८८०० रुपयांच्या सोयाबीन बियाण्याच्या चार बॅग विकत घेतल्या. याशिवाय नीलेश तऱ्हेकर यांनी तीन बॅग, राजेंद्र लव्हाळे यांनी १४ बॅग, कृष्णराव देवे यांनी आठ बॅग यांच्यासह तसेच अन्य शेतकऱ्यांनी दोन्ही कृषि केंद्रांतून लाखो रुपयांचे बियाणे विकत घेतले.खरीप हंगामात शेतकºयांनी पेरलेले बियाणे जमिनीतून वर आलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची रक्कम व परिश्रम वाया गेले. त्याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी रीतसर पंचनामा केला होता. सदर कृषिसेवा केंद्राच्या संचालकांनी निकृष्ट बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी भादंविचे कलम ४२०, सहकलम ७, १९ सीड्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल पांडुरंग दंडारे करीत आहेत.शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. ज्या कंपनीचे बियाणे कृषिसेवा केंद्राच्या संचालकांनी शेतकऱ्यांना विकले, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही यामध्ये आरोपी करण्यात येणार आहे.- आसाराम चोरमलेवरिष्ठ पोलीस निरीक्षक, वलगाव

टॅग्स :agricultureशेती