शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

क्रीडा महोत्सवातून सुदृढ खेळाडू निर्माण करावे

By admin | Updated: February 2, 2017 00:07 IST

गुरु आणि शिष्य यांचे नाते अतुट असते. चागलं पेरलं तर चांगलंच उगवेल. विद्यार्थ्यात उर्जा शिक्षकच निर्माण करु शकतो.

जे.एन. आभाळे : जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवअमरावती : गुरु आणि शिष्य यांचे नाते अतुट असते. चागलं पेरलं तर चांगलंच उगवेल. विद्यार्थ्यात उर्जा शिक्षकच निर्माण करु शकतो. शिक्षणाने कुटूंब सुखी होईल. पण देशाचे रक्षण करण्यासाठी देशभक्त व सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी जे.एन. आभाळे यांनी केले. ते मंगळवारी नांदगावपेठ येथे जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय कला, क्रीडा व आनंद जत्रा महोत्सवाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी डेप्युटी सीईओ (मनरेगा) माया वानखडे, प्राथमिक शिक्षण अधिकारी, श्रीराम पानझाडे, उपशिक्षणाधिकारी जयसिंग राऊत, बिडीओ भाऊसाहेब अकलाडे, निरंतर शिक्षणाधिकारी प्रदीप अभ्यंकर, माजी उपशिक्षणाधिकारी पंडित पंडागडे आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्याच्या हस्ते क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण व क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवास सुरूवात करण्यात आली. यावेळी धारणी पंचायत समिती येथील गोबरगहू शाळेची लेझिम कवायत, आष्टी, शिराळा, अंजनगांव सुर्जी, पथ्रोट येथील शाळांनी निदर्शने सादर केलीत. उद्घाटनीय कबड्डी सामना माध्यमिक मुलांच्या मोर्शी व भातकुली संघात घेण्यात आला.या महोत्सवात प्रथमच शिक्षण विभागाने विविध तालुक्यातील ज्ञानरचनावादी व ई-लर्निंग उपक्रमाचे सुमारे २० स्टॉल लावले. तसेच अखिल भारतीय शिक्षक संघाच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच उर्दू शिक्षक संघटना व संघातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी केले.संचालन वैशाली ढाकुलकर, आभार प्रदर्शन जयश्री राऊत यांनी केले. सर्व पंचायत समितीमधून ४००० विद्यार्थी खेळाडू व शिक्षकवृंद उपस्थित होते. या तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये सांघिक स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे राजेश सावरकर यांनी सांगीतले आहे.