शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

समाजशील माणूस घडवा

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

केवळ कायदा आणि कार्यपद्धतीवर व्यवस्था चालत नाही. मूल्य आणि तत्त्वांचीही व्यवस्था चालविण्यात समावेश असणे फार आवश्यक आहे

मुख्यमंत्री : डॉ.पंजाबराव देशमुख प्रबोधिनीच्या प्रशिक्षण इमारतीचे लोकार्पणअमरावती : केवळ कायदा आणि कार्यपद्धतीवर व्यवस्था चालत नाही. मूल्य आणि तत्त्वांचीही व्यवस्था चालविण्यात समावेश असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून मूल्य आणि तत्त्वांचे प्रशिक्षण देऊन सामान्य जनतेला उत्तरदायी असेल, असा माणूस घडला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीच्या विस्तारित प्रशिक्षण इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री रणजित पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, रवी राणा, रमेश बुंदिले, अनिल बोंडे, महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते.खासगी क्षेत्रात सातत्याने प्रशिक्षण दिले जाते. शासनात मात्र कामातूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित व्हावे लागते. जनतेला उत्तरदायी आणि त्यांच्याप्रती व्यवस्थेत आत्मियता निर्माण करण्यासाठी व्यवस्थेतील लोकांना प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. केवळ कायदे व शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीवर व्यवस्था चालू शकत नाही. सामान्यांच्या कल्याणासाठी काम करताना मूल्य आणि तत्त्वही जोपासणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशिक्षणाच्या माध्यमातून कायदे आणि शासन कार्यपध्दतीसोबतच मूल्यांचेही प्रशिक्षण दिली गेले पाहिजे. व्यवस्थेतील मूल्य आणि तत्त्व संपल्यास आपण सामान्य माणसाला न्याय देऊ शकणार नाही, ही भावना व्यवस्थेतील प्रत्येकाची असावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.समाजाने व्यवस्था निर्माण केली आणि व्यवस्थेने समाजाची सेवा करण्याची संधी आपणास दिल्याची जाणीव प्रत्येकात असावी. समाजाचे आपण काही देणे लागतो. या भावनेतून प्रत्येकाने काम केले पाहिजे. डॉ.पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून समाजासाठी काम करणारे अधिकारी, कर्मचारी निर्माण होतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी प्रशिक्षणातून समाजाचे दु:ख समजून घेणारे अधिकारी तयार व्हावे, असे सांगितले. अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भावना आणि समाजाप्रती सातत्याने काम करण्याची तयारी असावी, असे ते म्हणाले. यावेळी प्रबोधिनीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक प्रबोधिनीचे संचालक संजय बाहेकर यांनी केले. संचालन उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के यांनी केले, तर आभार विवेक काळेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)मार्चच्या अंदाजपत्रकात होणार तुरतूदडॉ.पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रबोधिनी मध्ये आवश्यक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी मार्चच्या अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.प्रबोधिनीत अशा आहेत सुविधा प्रबोधिनीच्या आवारात बांधण्यात आलेल्या या विस्तारीत प्रशिक्षण इमारतीवर ५ कोटी ८९ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रशिक्षण कक्षांसह ई-ग्रंथालय व अन्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. प्रशिक्षणाचे महत्त्व विशद करताना प्रबोधिनीने शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे कशी पोहचविता येतील, यादृष्टीने प्रशिक्षण द्यावे, असे यावेळी मनोगत व्यक्त करताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले.