शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

समाजशील माणूस घडवा

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

केवळ कायदा आणि कार्यपद्धतीवर व्यवस्था चालत नाही. मूल्य आणि तत्त्वांचीही व्यवस्था चालविण्यात समावेश असणे फार आवश्यक आहे

मुख्यमंत्री : डॉ.पंजाबराव देशमुख प्रबोधिनीच्या प्रशिक्षण इमारतीचे लोकार्पणअमरावती : केवळ कायदा आणि कार्यपद्धतीवर व्यवस्था चालत नाही. मूल्य आणि तत्त्वांचीही व्यवस्था चालविण्यात समावेश असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून मूल्य आणि तत्त्वांचे प्रशिक्षण देऊन सामान्य जनतेला उत्तरदायी असेल, असा माणूस घडला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीच्या विस्तारित प्रशिक्षण इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री रणजित पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, रवी राणा, रमेश बुंदिले, अनिल बोंडे, महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते.खासगी क्षेत्रात सातत्याने प्रशिक्षण दिले जाते. शासनात मात्र कामातूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित व्हावे लागते. जनतेला उत्तरदायी आणि त्यांच्याप्रती व्यवस्थेत आत्मियता निर्माण करण्यासाठी व्यवस्थेतील लोकांना प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. केवळ कायदे व शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीवर व्यवस्था चालू शकत नाही. सामान्यांच्या कल्याणासाठी काम करताना मूल्य आणि तत्त्वही जोपासणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशिक्षणाच्या माध्यमातून कायदे आणि शासन कार्यपध्दतीसोबतच मूल्यांचेही प्रशिक्षण दिली गेले पाहिजे. व्यवस्थेतील मूल्य आणि तत्त्व संपल्यास आपण सामान्य माणसाला न्याय देऊ शकणार नाही, ही भावना व्यवस्थेतील प्रत्येकाची असावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.समाजाने व्यवस्था निर्माण केली आणि व्यवस्थेने समाजाची सेवा करण्याची संधी आपणास दिल्याची जाणीव प्रत्येकात असावी. समाजाचे आपण काही देणे लागतो. या भावनेतून प्रत्येकाने काम केले पाहिजे. डॉ.पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून समाजासाठी काम करणारे अधिकारी, कर्मचारी निर्माण होतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी प्रशिक्षणातून समाजाचे दु:ख समजून घेणारे अधिकारी तयार व्हावे, असे सांगितले. अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भावना आणि समाजाप्रती सातत्याने काम करण्याची तयारी असावी, असे ते म्हणाले. यावेळी प्रबोधिनीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक प्रबोधिनीचे संचालक संजय बाहेकर यांनी केले. संचालन उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के यांनी केले, तर आभार विवेक काळेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)मार्चच्या अंदाजपत्रकात होणार तुरतूदडॉ.पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रबोधिनी मध्ये आवश्यक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी मार्चच्या अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.प्रबोधिनीत अशा आहेत सुविधा प्रबोधिनीच्या आवारात बांधण्यात आलेल्या या विस्तारीत प्रशिक्षण इमारतीवर ५ कोटी ८९ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रशिक्षण कक्षांसह ई-ग्रंथालय व अन्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. प्रशिक्षणाचे महत्त्व विशद करताना प्रबोधिनीने शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे कशी पोहचविता येतील, यादृष्टीने प्रशिक्षण द्यावे, असे यावेळी मनोगत व्यक्त करताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले.