शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 7, 2023 16:41 IST

महिनाभरात ९९ रुग्णांची नोंद

अमरावती : दोन आठवड्यांपासून कोरोनाने डोके वर काढले आहे. सध्या ३७ सक्रिय रुग्ण आहेत. रोज पाच ते दहा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत असताना जिल्ह्यात सर्व लसींचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प आहे. त्यामुळे कसे लढणार कोरोनासी, असा नागरिकांचा सवाल आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महिनाभरात ९९ रुग्णांची नोंद झाली. नमुन्यांमध्ये पॉझिटिव्हिटीदेखील वाढती आहे. कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे बहुतेक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात दोन महापालिका क्षेत्रात ३५ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे शासन, प्रशासन व आरोग्य विभागाद्वारे लसीकरणावर जोर आहे.

जिल्ह्यात १७ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले आहे. अद्याप ५० टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतलेला नाही. लसीकरणासाठी शहरात १२ ते १५ व ग्रामीणमध्ये प्रत्येक तालुक्यात व मोठ्या पीएचसीमध्ये लसीकरण होत आहे. सध्या बूस्टर डोसवर जास्त जोर आहे. विशेष म्हणजे लसीकरण झालेल्या नागरिकांना संसर्ग झाला तरीही लक्षणे सौम्य असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस