शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

न्यायालयाच्या स्थगितीने रेतीघाट लिलावास ‘ब्रेक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 21:17 IST

पर्यावरण मानकांचे पालन हवे : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

अमरावती : पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) व पर्यावरणीय व्यवस्थापन योजना (ईएमपी) यांच्या शिवाय वाळू लिलावाची सुरू असलेली प्रक्रिया राबविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. याविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अवर सचिवांनी बुधवारी विभागीय आयुक्त व  जिल्हाधिका-यांना दिल्या. यामुळे जिल्ह्यासह राज्यातील रेतीघाटांच्या ई-लिलावाच्या दुसºया टप्प्यातील प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे. 

रेतीघाटांची ई-लिलाव प्रक्रिया प्रचलित १२ मार्च २०१३ च्या परिपत्रकान्वये सुरू करण्यात आली. जिल्ह्यात यंदा १०५ रेतीघाटांचा लिलाव होणार आहे. यामध्ये ४९ रेतीघाटांची ई-लिलावाची प्रक्रिया न्यायालयाच्या स्थगनादेशापूर्वी झालीत. यामधून महसूल विभागाला ८ कोटी ६१ लाख रुपये मिळाले. सध्या ५६ रेतीघाट ई-लिलावाच्या प्रक्रियेत आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक यांनी ‘लोकमत’सी बोलताना सांगितले.

 जिल्ह्यात ज्या रेतीघाटांचा लिलाव झाला आहे, त्यामध्ये  पर्यावरण आघात मूल्यांकन (एन्व्हायर्न्मेंट इम्पॅक्ट असेसमेंट) ची प्रक्रिया करण्यात आली. मात्र, पर्यावरण व्यवस्थापन योजना (एन्व्हायर्न्मेंट मॅनेजमेंट प्लॅन) ही प्रक्रिया आता राबविण्यात येणार आहे. यामध्ये गौण खनिजाचे उत्खनन करीत असताना आगामी पाच वर्षांसाठी अ‍ॅक्शन प्लॉन काय आहे, याचा अहवाल  द्यावा लागणार आहे. त्यानंतरच न्यायालयाच्या पुढील आदेशाने रेतीघाटांच्या ई-लिलावाची प्रक्रिया होणार आहे. 

दरम्यान, शासनाने  ३ जानेवारीला रेती निर्गतीसंदर्भात सुधारित धोरण जाहीर केले. याचाही अवलंब आता नव्याने रेतीघाटांच्या लिलावप्रक्रियेत करावा लागणार आहे.

रेतीचे सुधारित निर्गती धोरण* पर्यावरणाचा संतुलन राखत समतोल व स्थायी विकास साधणे. प्रक्रियेत अधिकाधिक लोकांचा सहभाग घेणे.* रेती उत्खननाचा पारंपरिक व्यवसाय करणा-यांच्या हिताचे रक्षण करणे व लिलावप्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे.* अवैध उत्खनन व वाहतुकीच्या घटनांना प्रभावीपणे आळा घालून राज्याच्या महसूलात वाढ करणे.

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दुसºया लॉटमधील रेतीघाटांच्या ई-लिलावाच्या  प्रक्रियेला  स्थगिती देण्यात आली. ‘इआयए’ची प्रक्रिया यापूर्वीच करण्यात आली; आता ‘ईएमपी’चा अहवाल शासनाला देणार आहोत. - शिरीष नाईक, जिल्हा खनिकर्म अधिकारी