शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार न्यायालयाने फेटाळली

By admin | Updated: March 27, 2016 00:07 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावत परिवहन महामंडळाच्या बाजूने निकाल दिला.

निर्णय जाहीर : परिवहन महांडळाची बाजू भक्कममोर्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावत परिवहन महामंडळाच्या बाजूने निकाल दिला.येथील एसटी आगारात जय इंगोले आगार व्यवस्थापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी वाहतूकीसह कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्यासोबतच आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे महामंडळाचे कर्मचारी विशेषत: वाहक मोठ्या प्रमाणात दुखावले गेले आणि त्यांनी आगार व्यवस्थापकाविरुध्द आंदोलन केले होते. प्रकरण चिघळून प्रवाशांची गैरसोय होऊ नये या हेतूने महामंडळाने जयकुमार इंगोले यांची आगार व्यवस्थापक म्हणून दर्यापूरला तर दहा कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव अमरावती विभागात वेगवेगळया आगारात बदली केली होती. बदली विरोधात दहा कर्मचाऱ्यांनी अमरावतीच्या औद्योगिक न्यायालयात अंतरिम स्थगनादेश मिळावा म्हणून प्रकरण दाखल केले होते. २७ जुलै रोजी न्यायालयाने त्यांचा अर्ज खारीज केला होता. त्याविरुध्द या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात (रीट पीटिशन) याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याप्रकरणी औद्योगिक न्यायालयाने ६ महिन्यांच्या आत या प्रकरणाचा निपटारा करण्याचे शिवाय तोपर्यंत एसटी महामंडळाने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवण्याचे निर्देश ३१ आॅगस्ट रोजी दिले होते. औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि कागदोपत्री सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे कर्मचाऱ्यांची तक्रार फेटाळून लावली आहे.जिल्ह्यातच या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असताना आणि बदली झालेल्यांपैकी काही कर्मचारी तर कित्येक वर्षे मोर्शीलाच ठाण मांडून बसले होते, असे असताना बदली झाल्यानंतरही त्यांना मोर्शीचा मोह का आवरत नाही, हा प्रश्न मात्र येथे चर्चिल्या जात आहे. (शहर प्रतिनिधी)