शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार न्यायालयाने फेटाळली

By admin | Updated: March 27, 2016 00:07 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावत परिवहन महामंडळाच्या बाजूने निकाल दिला.

निर्णय जाहीर : परिवहन महांडळाची बाजू भक्कममोर्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावत परिवहन महामंडळाच्या बाजूने निकाल दिला.येथील एसटी आगारात जय इंगोले आगार व्यवस्थापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी वाहतूकीसह कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्यासोबतच आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे महामंडळाचे कर्मचारी विशेषत: वाहक मोठ्या प्रमाणात दुखावले गेले आणि त्यांनी आगार व्यवस्थापकाविरुध्द आंदोलन केले होते. प्रकरण चिघळून प्रवाशांची गैरसोय होऊ नये या हेतूने महामंडळाने जयकुमार इंगोले यांची आगार व्यवस्थापक म्हणून दर्यापूरला तर दहा कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव अमरावती विभागात वेगवेगळया आगारात बदली केली होती. बदली विरोधात दहा कर्मचाऱ्यांनी अमरावतीच्या औद्योगिक न्यायालयात अंतरिम स्थगनादेश मिळावा म्हणून प्रकरण दाखल केले होते. २७ जुलै रोजी न्यायालयाने त्यांचा अर्ज खारीज केला होता. त्याविरुध्द या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात (रीट पीटिशन) याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याप्रकरणी औद्योगिक न्यायालयाने ६ महिन्यांच्या आत या प्रकरणाचा निपटारा करण्याचे शिवाय तोपर्यंत एसटी महामंडळाने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवण्याचे निर्देश ३१ आॅगस्ट रोजी दिले होते. औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि कागदोपत्री सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे कर्मचाऱ्यांची तक्रार फेटाळून लावली आहे.जिल्ह्यातच या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असताना आणि बदली झालेल्यांपैकी काही कर्मचारी तर कित्येक वर्षे मोर्शीलाच ठाण मांडून बसले होते, असे असताना बदली झाल्यानंतरही त्यांना मोर्शीचा मोह का आवरत नाही, हा प्रश्न मात्र येथे चर्चिल्या जात आहे. (शहर प्रतिनिधी)